मराठी भाषेतून सामाजिक, वैचारिक, राजकीय, साहित्यिक आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रातला संग्राह्य असा ऐवज आम्ही द पोस्टमन या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या साठी घेऊन आलो आहोत. आमचे व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. धन्यवाद
तुमचा अभ्यास खूप चांगला आहे सर, परंतु मला एक साधा प्रश्न आहे तुम्हाला, जे लोक मार्क्सवादी असून सुद्धा समाजात सामान्य लोकांचे छळ किंवा गुन्हे करतात आणि एका विशिष्ट धर्मालाच target करतात त्यावर आपले काय म्हणने आहे ? मार्क्सवाद चळवळीची, अन्याया च्या विरोधातली शिकवण देतो पण तोच मानवतेची आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण का देत नाही. ?
तुमचा अभ्यास खूप चांगला आहे सर, परंतु मला एक साधा प्रश्न आहे तुम्हाला, जे लोक मार्क्सवादी असून सुद्धा समाजात सामान्य लोकांचे छळ किंवा गुन्हे करतात आणि एका विशिष्ट धर्मालाच target करतात त्यावर आपले काय म्हणने आहे ? मार्क्सवाद चळवळीची, अन्याया च्या विरोधातली शिकवण देतो पण तोच मानवतेची आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण का देत नाही. ?
मला तर या माणसाची फारच किळस येते इतका कारस्थानी दुसरा नसेल यानं पूर्ण महाराष्ट्र जाती पातीत पेटवून दिला आणि आता मणिपूर करायला बघतो याचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे . देवा विठ्ठला महाराष्ट्राला सोडव गा याच्या पाताळयंत्री कुकर्मातून.
संजय सोनवनी आपण इतिहासकार कमी पण राजकारणी माणसाला खुश करण्यासाठी हा आपला आटा पिटा आहे कोणकोणत्या कोणाच्या कादंबरीत मल्हारराव होळकर पळून गेले असा उल्लेख आहे त्यांची नावे तरी सांगायला हवी होती
इथले कॅशीव बिस्किट खूप म्हणजे खूपच छान आहेत...... बाकी सलामत भाईंच (जिंदादिल माणूस)मिश्किल बोलणं, अधूनमधून त्यांनी वापरलेल्या आणि वस्तुस्थितीशी अगदी समर्पक वाटणाऱ्या इंग्रजी म्हणी.....सगळंच खोल !!
येथे कॉम्रेड अभ्यंकर हे फक्त शब्दांच्या कसरती करून कम्युनिझमला ओढूनताणून राष्ट्रवाद निषिद्ध नाही असे प्रतिपादन करू पाहत आहेत. वास्तविकतः कोमिन्टर्न किंवा कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या संकल्पनेत राष्ट्रवादाला स्थान नाही.
आता सर्व महाराष्ट्र राज्यातील कारखाने हिच परस्तीती आहे, चोर हि माहित आहे पण या दुष्ठ चक्रातून बाहेर कस निघायच. कारण भाजप पण भ्रष्टाचारी ना पाठीशी घालत आहे, विश्वास कोनावर ठेवून मार्ग क्रमन कसे करायचे. हा एक जटील प्रश्न आहे. तरी या साठी परत एकदा कामगार व शेतकरी चळवळ ऊभा करावी लागेल.
सर आज पहायला गेले तर. या लोकांनी सहकारला हरताळ पासुन, शेतकरी, अन सहकारी कामगार ना देशोधडीला लावले आण सत्ता आणि राजकीय पोळी भाजून घेत आहेत या गोष्टी ला सरकार न्याय देऊ शकेल का. आज जास्तीत जास्त वाताहत कामगारां ची झालि आहे. त्याना पगार पण मिळत नाही. त्यांच भविष्य आणि भवितव्य. आंधारात आहे.
छ.संभाजी महाराज यांना मुकरब खानने पकडल्यावर वृध्द सेनापती मल्होजी घोरपडे प्रतिकार न करता पळून गेले हे सोनवणी यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे.मोजक्या सैनिकासह ते लढले आणि शत्रूकडून मारले गेले असे इतिहास सांगतो.ते पळून जात असता घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला असे कोणत्या पुराव्यावरून तुम्ही सांगता?ही इतिहासाची मोडतोड नाही का?लाडक्या छ.संभाजीमहाराज यांच्यासाठी जीव देणाऱ्या सेनापतींची ही अवहेलना आहे.जणू त्या घटनेचे साक्षीदार असल्याचा आव सोनवणी यांनी आणला आहे.मल्होजी सह त्यांचा पुत्र संताजी सैन्यासह पळून गेला असे म्हणणे तितकेच संतापजनक आहे. या प्रतिकार वेळी कवी कलश यांना बाण लागला असे म्हणता. म्हणजे प्रतिकारझाला होता.त्यात मल्होजी मारले गेले.त्यांची समाधी संगमेश्वर जवळ आहे.तेथे बोर्ड वर तो रोमांचक इतिहास लिहिलेला आहे. नवीन मांडणी करण्याच्या नादात काहीतरी बुद्धिभेद करणे शोभत नाही.
सर राजाराम महाराजांनी कडेलोट केलेल्या संभाजी महाराजांचे विश्र्वानिय माणसाची नावे जरा सांगा कारण आपण जे शिदोजी किंवा हिरोजी फर्जंद असे काही सांगितले त्याच्या मृत्यु कसा झाला याच व्हिडियो काही सापडत नाही.
संशोधनाची एक पद्धत असते त्यामुळे तर्कशुद्ध पाने स्टी शिधता येते. सोनवणी यांनी Ph.D. केली नसल्यामुळे त्यांना संशोधनाची ओढत माहीत नाही आणि म्हणून ते वाटेल तशी विधाने करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र महाराष्ट्रात किती लोकांनी लिहिले आणि ते कोण हे सोनवणी यांनी माहीत करून घ्यावे. याचे उत्तर मिळाले तर सोनवणी किती खोटे बोलत आहे हे कळून येईल.
सोनवणी Ph.D. ना मिळविता इतिहास संशोधक झाले आहेत त्या मुळेच ते मनुस्मृती शुद्रांसाठी नाही असे म्हणत आहे. शूद्र हे वैदिकांचे गुलाम होते की नाही ? गुलामी ही लादलेली असते. चातुर्वर्ण्या वर आधारित समाज हा मनुस्मृती द्वारे नियंत्रित हित होता. अमानवीय आणि विषमता मूलक रूढींना मनुस्मृतीचा आधार होता. हिंदु आणि वैदिक याना बांधणारी कोणती गोष्ट आहे? याच गोष्टीमुळे हिंदू है वैदिक वेगळे आहेत या सिद्धांताचा फोलपणा सिद्ध होतो. इतके व्यापक आणि काळजी पूर्वक लिहिलेले कायदे मग कुणासाठी होते? आम्ही अन्याय कारक विषमता वादी रूढी मानत नाही असे म्हणण्याची किती लोकांची प्राज्ञा होती?