राजे मोरे हे आपला संबंध सम्राट चंद्रगुप्त मोर्य,यांचेशी लावायचे त्यांना आपला पूर्वज मानायचे असा इतिहास मी वाचला आहे अखंड भारत हा मोर्य साम्राटानंचे वेळेस होता मोर्य शब्दा वरून मोरे आडनाव झाले आहे,
नमस्कार, मी प्रथमेश खोचरे... आम्ही पण मोरे कुटुंबातले आमचे खापर पणजोबा आजोबा यांनी त्याकाळी नाव बदलून भीती पोटी खोचरे केलं असं मला अजून तरी माहीत आहे .....आम्ही खेड तालुक्यात अंजनी गावात खोचरे वाडीत राहतो हे पूर्वीची जावळी प्रांतामधला एक भाग होता असा मी ऐकलं आहे ....आणि मला या सर्व इसितीहासाबद्दल अजून खूप जाणून घ्यायला आवडेल.
चंद्रराव मोरे यांची कुलस्वामी श्री निरपजी देवी माता जील चंद्रराव राजांनी निरोप देऊन बोलवले म्हणून ती निरपजी देवी माता, बाजूला चंद्रराव मोरे यांचा दुसरा वाडा सहा भाऊ होते त्यांना त्यांचा वाडा ,गाव उचाट ,ता महाबळेश्वर ,येथे तपोला वरून बोटीने नंतर रस्ता 12 km नंतर उचाट या गावात मंदिर आहे दगडी कोरीव काम ,जवळ कुल पुरुषाची समधी आणि वाडा आहे...
राम राम सर्व मोरे मंडळी व इतर मंडळींना भावांनो आमचे गाव खादगाव ता.बदनापुर जी.जालना पुर्वीचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मराठवाडा मंडळी आमचे पुर्ण गाव पुर्वी मोरेपाटील कंपनीचे गाव नंतर बाहेरुन येणाऱ्या सोयरे नातेवाईक जात भाई व ईतर समाजाची आज याच्यात भर पडली. नाही तर येथील मौर्य वंशीय मोरेपाटील कंपनीचा पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.हा इतिहास जुने पारंपरिक भाटा कडे सुध्दा आज लेखी उपलब्ध आहे. आपले खादगाव येथील मोरेंनी देव देश आणि धर्मासाठी बरेच कठीण असे योगदान दिले आहे. निजामशाही विरोधात पण या गावाचे बरेच योगदान आहे.पण आता या लोकशाही मधे मागच्या इतिहासाकडे कोणाचेच लक्ष नाही त्यामुळे हा विषय कालबाह्य होत चालला आहे. पाचशे पुर्वी येथील मोरे कंपनी पण काहीतरी कारणास्तव जावळी हुनच इकडे स्थलांतरित झाले असे पुर्वी चे लोक गावचा इतिहास सांगतात.
हर हर महादेव🙏 हे मंदिराची माझी आजी पुजा करण्यास येत असे. आम्ही पण यायचो तीच्या बरोबर... खुप आध्यात्मिक एनर्जी आहे. इथे. तेथील अनुभूती पण खुप आल्या होत्या आजीला. ती दर सोमवारी जायची पुजा करायला. छोटे छोटे पातेले असायचे स्वयंपाक करायला. आजी त्यातच बनवत असे पण कोणी आले तेथील राहणारे रहिवासी तर चार की दहा पण तोच प्रसाद पुरुन शिल्लक पण राहायचा. पण तीच्या साठी तेथील लोक दही आणायचे एवढ चवदार असायच की छोटी छोटी माठ खास भोले बाबासाठी असावे ते घेऊन येत असत. ते दही एवढ मधूर लागायच की अजून आठवण येते मी खाल्ल आहे . मग आजी त्यातीलच दही साखर टाकून पंचामृत करायची... अख्या दोन गावत घरो घरी दिल्या शिवाय केव्हा च घरी यायची नाही.. खुप रात्र व्हायची आम्ही त्या पंचामृताची वाट पाहत असतो सर्व मुल. विशेष म्हणजे हे पंचामृताचे पात्र एवढ छोट असतांना ही ते केव्हा च खाली होत नव्हत. शेवट घरी आल्यावर च ते आम्ही संपवाचो.😊 एक विशेष घटना म्हणजे आजीला पेंशन असायची पण ती जेव्हा पंढरपूर ला निघाली तेव्हा पेंशन आलीच नाही. तर ती तीच्या देवाला सांगितले बघ रे मला पंढरपूर ला जायच आहे पण पैसे नाही कशी जाऊ बर ते तुच बघ हो... अस बोली आणि मंदिरा बाहेर आली. सांभार-भातच करायची नैवैद्य ते करण्यास बाहेर आली... आश्चर्य म्हणजे ती जेव्हा मंदिरात आत गेली तेव्हा नाव पिंडीवर तीला लाल कपड्या मध्ये काय तरी दिसले. तीने ती गाठोड खोल तर आश्चर्य चक्क चिल्लर होती त्यात. ही शिव लिलाव प्रंचड आनंद झाला होता तीला.... ती सर्वांना सांगत आली पंढरपूर ला जायची सोय केली हो माझ्या शंकराने. हे मंदिर पुर्वी आत जातांना वाकून जाव लागत असे. खुप चैतन्यमयी वातावरण, एकांत, निसर्गरम्य ठिकाण आहे हे. खुप खिसे आहेत आजीचे... एकदा खुप मोठ वादळ आले होते त्यातील खुप खुप वयस्कर होती. आम्ही बोलो तीला आज नको आजू ग.. पण तीने ऐकल म्हणजे ती आजी नव्हे हो.. मला काही होत नाही हो तो बसलायना माझ बाप तो बघून घेईल.. ती गेली येतांना वारवादळ एवढ की भलेभले तरुण उडून जातील... तसच झाले पंडीआजी वाऱ्या बरोबर एका खड्डात पडली पण जशी होती तशीच उभी होती पाठीला बाक (वाकलेली असतांना हातात एक काठी टेकत टेकत )पण जायची ती.. तीला काही म्हणजे काहीच झाल नाही... तेथील काही ग्रामस्थ होते. त्यांना माहित होते म्हातारी गेलीय व्यवस्थित जाईल ना म्हणून मागोमाग आले बघितले तर पंडीआजी खड्डा त दिसली... मग त्यांनी घरा पर्यंत तुळशी खुर्द कासारवाडी पर्यंत सोडले. ही तीची शेवटची भेट होती महादेवाला.. नंतर ती आजारी पडली ती शेवटच्या श्वासापर्यंत😢😢 ही माझ्या आईची आत्या. पण खुप खुप एनर्जी होती तीच्या मध्ये फक्त आणि फक्त या देवाच्या डोंगरावरील महादेवा मुळेच. वारली पण मोडली नाही शेवटपर्यंत भक्ती अफाट होती तीची. खुप खिसे आहेत या महादेवा बद्दल. अनुभव खुप आहेत. असाच तो सर्वांना या श्रृष्ठीचा सांभाळ करत रहावा हीच प्रार्थना त्याच्या चरणी🙏🙏🙏 हर हर महादेव🙏🙌🙌