👍अतिशय सुंदर आमच्या शाळेची तर आठवण झालीच पण घरातील वातावरण आणि आई वडिलांची परिस्थिती याचं भान आपण ठेऊनच प्रत्येक गोष्ट स्वतःहून समजून तें करायचो आत्ता प्रत्येक क्षण आठवतोय...... खूप छान...... 👍
विधवा प्रथा बंद केली हेरवाड ग्रामपंचायतीचे अभिनंदन. या सुशिक्षित जमान्यात विधवा प्रथा बंद होईल. परंतु विधवा महिलांचे प्रापंचिक प्रश्न सोडविले पाहिजेत. पूर्णागीणी महिलेवर मुलांच्या आईची आणि वडीलांची ह्या दोन्ही जबाबदाऱ्या पडलेल्या असतात. ती महीला रू.200 रोजगार करून मुलांचे शिक्षण व त्यांचे पालनपोषण करू शकत नाही. तरी अशा महिलांना सरकारने सर्वप्रथम अग्रहक्काने नोकरी दिली पाहिजे.तसेच त्यांच्या मुलांना इ.1 ली ते उच्च शिक्षण मोफत दिले पाहिजे त्यांना एसटी प्रवास, पाणीपट्टी , लाईट बिल, गॅस या सुविधा मोफत दिल्या पाहिजेत.त्यांना घरकुल दिले पाहिजे या व इतर अनेक सुविधा त्यांना मिळाव्यात म्हणून हेरवाड ग्रामपंचायतीने सरकार दरबारी प्रयत्न करावेत सरकारकडून तसा ठराव सर्व विधवा महिलांनी करून घ्यावा. हे काम विधवा महिला व हेरवाड ग्रामपंचायतीने करावे.