नमस्कार......मी प्राध्यापक सुरज आवताडे (Master Engineer) "शेतकरी मित्र" हा चॅनेल चालू करण्या पाठीमागचा माझा उद्देश हा स्वतः प्रकाशझोतात येणे हा नसून शेतकऱ्यांची मदत करणे हा आहे.कारण एक शेतकरीच दुसऱ्या शेतकऱ्याची चांगली मदत करू शकतो, माझा माहिती प्रमाणे जर एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या गोष्टीचा चांगला फायदा झाला आणि जर त्याने ती गोष्ट दुसऱ्या शेकऱ्याला सांगितली तर त्या गोष्टीचा दुसऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, याच्याउलट समज एखाद्या गोष्टीमुळे एखाद्याला तोटा अथवा नुकसान झाले आणि ती गोष्ट त्याने सर्वांना सांगितली तर बाकीचे तसे सावध होतील म्हणतात ना पुढच्यास ठेच मागचा शहाणा तस आणि ह्या सगळ्यात पहिल्या शेतकऱ्याचा काहीच तोटा नसणार आहे त्यामुळे मी ठरवलं की चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या शेतकऱ्यांजवळ पोहोचवायच्या. सदर चॅनेल वर मी स्वतःच्या अनुभवाचे तसेच इतर शेकर्यांचे अनुभवाचे व्हिडिओ अपलोड करत असतो आणि माझे जे स्वतःचे अनुभव आहेत ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे ..यामध्ये कोणालाही फसवण्याचा अथवा कोणाचे नुकसान करण्याचा माझा कसलाही मानस नाहीये. तरी यामध्ये सर्वांची साथ मिळेल ही अपेक्षा.धन्यवाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी मागणी करणार आहे की बोगस कृषी अधिकारी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील अशा शिक्षकांची निवड करून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे अशी विनंती करणार आहे संपादक साप्ताहिक नांदगाव दर्पण
माझे गाव उत्तूर हे कोकण - गोव्या पासून 100 किमी अंतरावर आहे . मला माझ्या शेतजमिनीत आंबा रोपे लावायची आहेत . त्याकरिता मला आपले मार्गदर्शन करावे ही विनंती