नमस्कार ! मला दिनांक २१/०४/२०२४ रोजी महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे " करून गेलो गाव " चा प्रयोग पाहण्याचा योग्य आला. नाटक खूपच छान आहे. मनोरंजन सोबतच सामाजिक जीवनावर वर चांगले भाष्य केले गेलं आहे. प्रत्येक नाट्य रसिकाने हे नाटक जरूर पाहावे. भाऊ कदम , ओंकार भोजने आणि इतर कला कलाकारांनी छान काम केले आहे. आपण केलेल्या पैसे वसूल मनोरंजना बद्दल आपले आभारी आहोत.
सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वच कलाकारांचा अप्रतिम सहज स्वाभाविक अभिनय, प्रवाही, ओघवती भाषाशैली. प्रत्यक्ष प्रसंग जीवंत करणारी वातारणनिर्मिती, पात्राची योजना सगळं सगळं मनाला संमोहित करणारे.
One of the best Marathi drama on the after effects of the massive, bloody, painful 18 days battle of Kurukshetra between 100 Kauravas and 5 Pandavas. Brilliantly written and highly talentedly performed by Ravi Patwardhan and Dilip Prabhavalkar. Great epic drama.❤
महाभारतानंतरच्या वृद्ध महानुभावांच्या जीवनातील गुंतागुंत आणि जीवनातील नश्वरता भावूक करून गेली. नेत्र ओलावले, उर्वरित जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कथानक सांगून गेला. सहभागी सर्व नाटय कलावंतांना मनःपूर्वक धन्यवाद!........ 🙏🙏
असे सुंदर नाटक की कितीही वेळा बघितले तरी मन भरणार नाही. आपल्या डोळ्यांना चकवा देणाऱ्या स्पेशली श्रेष्ठ कलाकार भरत जाधव च्या नकला/अक्टिंग प्रशंसनीय आहेत.
संपूर्ण नाटकाला मराठी सब टायटल दिले तर आमच्या सारख्या कर्णबधीर लोकांना संवाद सब टायटल समजण्यास सोपे जाईल आणि नाटक थोडे फार का होईना समजायला लागेल. कर्णबधीर मंडळीसाठी थोडा खारीचा / मदतीचा वाटा म्हणून मराठी सब टायटल दिले तर आम्हास खूप आनंद होईल. - मी एक कर्णबधीर