नाटकात समोरील पात्राची बौध्दीक योग्यता लक्षात घेऊन जुगलबंदी करावी .. कारण हा एकपात्री प्रयोग नसून सर्वांना सांभाळून घेऊन संवादफेक करायला हवी .. स्वतःच्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडून कमी अभ्यास असलेल्यांना कोंडीत पकडुन टाळ्या मिळवणे योग्य नाही .. शेवटी नाटक महत्वाचे , एखादे पात्र नाही .. ज्या प्रश्नांचा कथानकाशी संबंध नाही असे प्रश्न विचारून काय साध्य होणार ??
नवलगुरु रायाची धन्य आरती ब्राह्म विष्णु रुद्र जय जय, जय जय म्हणती...ll चार वेद, सहा शास्त्रे अठरा पुराणे सद्गुरु ची आरती ना कळे कोणा..... ll सिद्ध साधू, महंत मुनींजन तटस्थ पाहती ना करीत विरोध जय जय सांब वदती...ll रमावल्लभ दास म्हणे अलभ्य प्राप्ती सकळीक मिळुनी जय जय, जय जय म्हणती...ll
अप्रतिम सादरीकरण , खरंच एक नवीन सोनेरी पर्व उदयाला आलेले आहे,या निमित्ताने अनेक चुकीचे सादरीकरण जसे नारद कळलाव्या , रागिष्ट कोपिष्ट देव,ऋषी. मुनी,ब्राह्मण, स्त्रीची अगतीगता आणि असे अनेक जुने पायंडे सप्रमाण मोडून काढायला हवेत, दर्जेदार संवादफेक आणि अभिनयाने मंत्रमुग्ध करतच आहात,खुप खुप शुभेच्छा