महाराष्ट्र संतांची तपोभूमी अनेक संतांची पार्श्वभूमी आपल्या देशाला आहे. त्यातल्या भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, शाक्त संप्रदाय, महानुभाव, गणेश संप्रदाय, धारकरी संप्रदाय असे विविध संप्रदाय साधकांना भक्तीच्या वाटा दाखवित उपासनेचे सामर्थ्य उभे करीत आहेत. हे सारे त्यांच्या त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित भक्तिप्रबोधनाचे काम करीत आहेत. लोकमानसावर अशा भक्तिसंप्रदायांचा फार मोठा प्रभाव आहे. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमच्या हाती । ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती ।। ग्रंथ हा संत परंपरेतील खूप मोठा ठेवा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचन दुर्लभ आहे म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक संतांच्या कीर्तनातून आणि प्रवचनातून बोधपर विचार आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹