भाषाशैली,आवाज,आणि निसर्गाची असलेली ओढ,महत्वाचे म्हणजे कोकण जपण्याचा त्याचा अट्टहास,नवनवीन गोष्टी Explore करुन आपल्या पुढ्यात मांडण्याची शैली...सगळच अप्रतिम..घर बसल्या कोकणाचा स्वर्गीय प्रवास प्रसाद दादा च्या प्रयत्नातून आपणास अनुभवता येतो 😊Thnk u dada
प्रसाद मस्तच आंबोलीतला नाईट ट्रेल तुझ्यामुळे अनुभवता येतो जो आम्हाला शक्य नाही आभारी आहे मस्त कॉटेजेस आहेत काय तो कोकण काय तो अनुभव आणि काय तो प्रसाद धन्यवाद असेच चालू राहू दे
खरंय, कोकणात फक्त पर्यटक म्हणून येवू नका तर पर्यटणासोबत कोकणच्या निसर्गाचं संरक्षण, संवर्धन करायच्या उद्देशाने या कारण कोकण आणि पश्चिम घाट जपला, वाचवला तरचं महाराष्ट्राला पाऊस मिळेल...
दादा अप्रतिम मला तूझा नेहमीच अभिमान वाटतो ,कारण माझे तरुण पण यामुळे आठवत राहते मी अशी ठिकाण भरपूर पाहिली आहेत .पण त्या वेळी असे साधने उपलब्ध नव्हती .तुला धन्यवाद .आजची चित्र फित अप्रतिमच 👌..👌..👌..👌.. 👍
खरच तुम्ही खूप महान आहात. कोकणातील निसर्ग सौंदर्य , बेडूक , साप आणि त्यांच्या बद्दल दिलेली माहिती खूप छान आहे. तुम्ही बनवलेला हा माहितीपट डिसकवरी चँनलला पाठवा. तुम्हाला हया क्षेत्रात खूप यश मिळो ही परमेश्वराकडे प्रार्थना. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
🙏 दादा.अप्रतिम आहे कोकण.खूपच छान निवेदन व पर्यावरणाची तळमळ.निसर्गरम्य परिसराची जपणूक करून काळजी घेणारे आपण व आपले सहकारी व हा अनमोल ठेवा माहिती स्वरुपात या विदियोतून दाखविला यासाठी खूप खूप धन्यवाद...👌👌👍👍
रानमाणूस हा व्हिडिओ खरंच खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाची माहिती देणारा होता आणि आहे , व्हिडिओ च्या शेवटी अतिशय महत्त्वाचा संदेश आणि आव्हान केलात ते फार आवडलं आणि खूप गरजेचं ही होता..!!! ❤️❤️😊👌🏻👌🏻👌🏻गजानन दादा ने ही खूप महत्त्वाची, निसर्ग रम्य आणि निसर्गाच्या जीवांच्या अद्भुत बाजूची आमची ओळख करून दिली..!!!👌🏻👌🏻👏👍 मला हा व्हिडिओ पाहून किंबहूना तुमचे सर्वच व्हिडिओ आणि vlog पाहून कोकणी माणूस असल्याचा अभिमान, आनंद आणि कायम हा अभूतपूर्व निसर्गाचा ठेवा जपण्याची / सौवर्धन करण्याची जबाबदारी वाटते आणि जाणीव होत असे!!! 👌🏻👌🏻👏👏कोकण म्हणजे ❤️❤️😍😍
नमस्कार, प्रसाद दादा, आम्ही पण गुहागर हुन 2 जुलै ला आंबोली ला आलो होतो, आंबोली चा धबधबा, हिरण्यकेशी मंदिर, कवळेशाद पॉईंट ई. निसर्गरम्य परिसर, खरोखर स्वर्गसुखाचा आणि कोकणसुखाचा अनुभव!!!
जेथे क्षणभरही पाऊस थांबत नाही, असे जिल्ह्यात एक गाव आहे. नुसता पाऊसच नाही तर पावसाबरोबर घोंगावणारा वारा आणि धुक्याचे ढग आहेत. पाऊस, वारा धुक्यामुळे गारठून गेलेल्या आख्ख्या गावाने प्रत्येक घरात ऊबदार शेकोटी करून स्वतःला कोंडून घेतले आहे. पावसाळ्याच्या या काळात दिवस मावळला की घराबाहेर कोणी पडायचे नाही, असा या गावाचा अलिखित नियम आहे. कारण बिबट्याचा वावरही गावात ठरलेला. महाराष्ट्राचे चेरापुंजी अशी ओळख असलेल्या किटवडे (ता. आजरा) या गावाची ही स्थिती आहे. आजरा-आंबोली रस्त्यावर आंबोलीच्या अलिकडे दहा किलो मीटरवर हे गाव आहे. गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कोकणात उतरणारी खोल दरी आहे. त्यामुळे कोकणातून येणारे ढग एका घळीतून थेट या गावावरच येतात आणि गावाला चिंब चिंब करून जातात. ढगाबरोबरच दरीतून उसळणारे वारेही किटवडे गावाला अक्षरशः घुसळवून टाकते. त्यामुळे पावसाळ्यात किमान तीन महिने क्षणभराचीही उघडीप मिळत नाही. इथल्या पर्जन्य मापन केंद्रात सर्वाधिक पावसाची नोंद होते आणि महाराष्ट्राचे ‘चेरापुंजी’ अशीच ओळख अधिक गडद होते. गावात केवळ दीडशे घरे आहेत. गावाच्या टोकाला दोन किलोमीटरवर दरी सुरू होते व ही दरी कोकणात शिवापूर या गावाला जाऊन भिडते. या दरीतूनच पावसाचे ढग घाटमाथ्यावर येतात आणि दरीलगत असलेल्या किटवडे गावावरच पहिल्यांदा कोसळतात. यामुळे पावसाळ्यात किमान तीन महिने तेथे अखंड पाऊस सुरू राहतो. गावात सततच्या पावसाने शेतीचे स्वरूपही बदलले आहे. येथे भात, नाचणा व ऊस ही पिके आहेत. पण भाताची लावण झाल्यावर पावसाच्या माऱ्यामुळे कुजते. खतेही वाहून जातात. त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन निम्मावर येते. तरीही अन्य पर्याय नसल्याने लोकांना शेतीत राबावे लागते. भाताच्या खाचरांना नदीचेच स्वरूप येते. गावाभोवती जंगल असून बिबट्याचा वावर नित्याचा आहे. दिवस मावळला की लोक शेतीची कामे आटोपून घरी येतात. कारण बिबट्या व गव्यांची भीती आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुंडलिक पाटील यांच्या घराच्या कट्ट्यावर बसलेले कुत्रे बिबट्याने उचलून नेले. गव्यांचा कळप तर बिनधास्त फिरत असतो. उगवलेल्या भाताचाच नव्हे तर लावण केलेल्या रोपांचाही फडशा पाडतो. पिढ्यान्पिढ्या अनुभव वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या गावाने मुसळधार पाऊस अनुभवला आहे. एकट्या या गावात जितका पाऊस वर्षाला पडतो, तितका पाऊस उर्वरित राज्यात पडतो. रोजच अतिवृष्टी १९९४ साली ८ हजार ९९७ मिलिमीमटर पाऊस फक्त किटवड्यात झाला. राज्यात पडलेल्या एकूण पावसाच्या दुप्पट पाऊस या एकाच गावात झाला. गेल्यावर्षी ७ हजार ६२३ मिलिमीटर पाऊस झाला. या वर्षी काल एका दिवसात २७० मिलिमीटर पाऊस झाला. ६५ मि.मी.च्या वर म्हणजे अतिवृष्टी मानली जाते. किटवड्यात अशी रोजच अतिवृष्टी होते.
सह्याद्री चे आपल्या वर असलेले अनंत उपकार , त्यातून काही प्रमाणात का होईना उतराई होण्यासाठी या. आभार मानायला या. प्रसाद दादा मस्त माहिती नेहमी प्रमाणे. विडीओ एक नंबर. देव बरे करो.
Old memories got refresh.We had visited 37years back.I was very small.That time all this cottages were not there only MIDC and Tata's cottages were there.For more details you meet Mr.Anthon who is local. His father was hunter. Originally this village consisted of only 19 families.
Video अप्रतिम,homestay देखील खूप छान आहे.अगदी निसर्गाच्या सानिध्यात.👌 पण अतिशय सुंदर अशा evergreen forest मधील homestay च नांव मृगया ? मृगया म्हणजे वन्यप्राण्यांची शिकार . ...... .. पक्षी ,प्राणी ,जैवविविधता यांविषयी इतकी माहिती असून असं नांव याचं आश्चर्य वाटतं.
तुमचा content खूप भारी आणि प्रोफेशनल असतो.....तुमची भाषा खूप छान आहे .....फक्त request आहे की ह्या सर्वांबरोबर जर लोकल फूड (जेवण) पण add केलं तर खूप बरं वाटेल
🙏 Prasad You are Great & Hardworking, Your exploration shows us what we never Dreamt. I have great wish & desire to meet you and THANK YOU WITH HEART.🙌✌One day ?