माझे आजोबा श्री. रामदास सिताराम जोशी यांनी माझ्या लहानपणी देवपूजा कशी करावी हे मला वारंवार समजावून सांगितले होते. त्यांचे शब्द विचार संकल्पना आज पुन्हा आपल्याकडुन ऐकायला मिळाल्या.......योगायोग
नोकरी निमित्त शहरात राहतो व गावाकडच्या घरी पण अधूनमधून जातो . शेतीवाडी आहे. तर मला विचारायचे आहे . आमचे सध्या वास्तव्य आहे तिथे सर्व देवधर्म करतो पण गावाकडे देव्हा-यात देव स्थापन करावे का ? व ३ , ५ महिन्यातून ८दिवस १५ दिवस मुक्काम असतो मग गावाकडचे देवांचें पूजन करावे की कसे ? कृपया मार्गदर्शन करावे
खुप सुंदर माहिती आहे.पण हल्ली TV किंवा पेपर मध्ये रोजची शुभ वेळ दीली जाते त्यावेळेस देवपूजा करावी का.परंतु ती आपण सांगीतल्या प्रमाणे नसते कधी दुपारी किंवा अकरा नंतर असते त्या बद्दल काय सांगाल.त्या वेळी पुजा करणे योग्य आहे का. 🙏
गुरूजी सुंदर कथन केले आहे . एक शंका आहे देव पाण्याने स्वच्छ केलेनंतर श्री विष्णूची 24 नावे घेतले नंतर सुर्यदेवाला 12 नांवे घेवून अर्घ्य दिलेनतर देवांची उर्वरित पुजा करणे उचित आहे का? तसेच श्री अन्नपुर्णा देवी चांदीच्या वाटी/ ताटलीत तांदुळावर ठेवणे दर शुक्रवारी पूजेचे वेळी तांदुळ बदलणे उचित आहे का? देवाना प्रसादाला दुधसाखर ठेवणे हे चांगले की नुसती साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवले तरी चालेल? कृपया सविस्तर तपशिल दिलेस सर्नाना अभिप्राय समजतील तरी आपले अभिप्राय द्यावेत हि विनंती.