संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपले स्वागत. नुकतीच ११एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली. अलीकडे, सर्वच थोर लोकांबद्दल सर्वच सामान्यलोक समाज माध्यमांतून बोलत असतात. त्यांच्या भावना आपण समजून घेऊ शकतो. पण, थोर लोकांबद्दल ऐकण्या-वाचण्यापेक्षात्यांनी नेमके काय लिहिले आहे? लोकांचेत्यांच्याबद्दल काय विचार होते त्यापेक्षा त्यांचे विचार नेमके काय होते हे जाणणेसर्वच जिज्ञासूंना आवश्यक आहे. त्यांचे विचार आत्मसात करणे राहो पण पचणारे आहेत कायाचाही विचार करायला हवा. आज आपण महात्मा ज्योतिबा फुले लिखित गुलामगिरीया पुस्तकाबद्दल बोलू. ह्या पुस्तकाविषयी आपण खूप ऐकलेलं आहे. पण वाचलं फारथोड्यांनी असावं. या महत्वाच्या पुस्तकाची आजच्या काळात अतिशय गरज आहे असंवाटल्यामुळंही मी हे पुस्तक निवडलंय. पुस्तक विनाशुल्क ऑनलाईन वाचता येत. त्यावेबसाईटची लिंक कंमेंट बॉक्स मध्ये पाहू शकता. ज्योतीबांनी हे पुस्तक लिहिले तोकाळ कंपनी सरकार जाऊन ब्रिटिश सरकार आपलं भारतात बस्तान बसवतानाचा. याची प्रथमआवृत्ती १८७३ ची. नवशिक्षणाचं वारं नुकतंच कुठे सुरु झालेलं त्यामुळे शतकानुशतकेबंद असलेली ज्ञानाची दारे सर्वाना खुली होण्याची शक्यता असलेला तो काळ.
Learn about books in Marathi language every Saturday. Subscribe now to / @sanjeevanisbookreview
Bookreview, Bookreviewinmarathi
Instagram: / sanjudidmishe
Facebook: / sanjeevani.didmishe
Twitter: / thefrontpage123
4 окт 2024