whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आपल्या RU-vid चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद 🙏
नितीन पवार सर, तुमच्या दिग्दर्शनाला सलाम, प्रत्येकाची प्रेम कथा पूर्ण होतं नसते. पण ती मुलगी आपल्या आयुष्यात एक चांगली मैत्रीण म्हणून आहे. ही काय कमी ग्रेट फिलिंग आहे. शेवट आवडला, "तुम्ही यायच्या अगोदरही अनाथ होतो, आणि आताही अनाथ आहे. फक्त फरक इतकाच आधी सोबत कोणी नव्हतं आता तुमच्या आठवणी सोबत राहतील..!"😢
नितीन अभ्यासू वृत्तीला मनापासून सलाम आणि या वेब सिरीज मुळे बरेच काही शिकायला भेटले आणि अनुभवही आले खरंच असे काही असते किंवा होऊ शकते हे पण समजले खूप खूप सर्व कलाकारांचे अभिनंदन आता 10 वी अ वेब सिरीज चालू करा लवकरात लवकर
सायली म्हणते कि मी शब्द दिला तर जिव गेला तरी माग हटत नसते आणि ती प्रेमासाठी वर्ष भर थांबू शकली नाही आणि तो रोहित तिला म्हणाला कि तुमची इच्छा असेपर्यंत आपल्यात काहीच होणार नाही आणि तोही प्रेमासाठी वर्ष भर थांबू शकला नाही, म्हणजे वास्तव इतक भयानक आहे...
माझ्या मते नितीन पवार सर ला खऱ्या आयुष्यात खर प्रेम भेटल नाही वाटते त्यांचा प्रेम भंग झालेल आहे म्हणून ते त्यांच्या सर्व कथेत शेवट खूप वाईट करत असतात. त्यांना प्रेक्षकांच्या भावनांची कदर नाही कोण कोण यास सहमत असतील त्यांनी लाईक करा कारण ही पोस्ट नितीन सर पर्यंत पोहचवा ते इथून पुढे येणाऱ्या कथेत तरी असा प्रेमभंग करणार नाहीत. नितीन सर आपणास विनंती आहे तुम्ही खर सांगा तुमच्या खऱ्या आयुष्यात प्रेमभंग झालेला आहे म्हणून तुम्ही अस करत आहेत
खूप छान पाऊस सिरीस पाहून लय इमोशनल झालो, कारण मी पण विशाल सारखं खर प्रेम केल होत, ते पण 15 वर्ष केल पण मला माज प्रेम भेटलं नाही, अन तिचे लग्न झाले अन मी तिच्या आठवणीत दिवस काडत आहे प्रेम काय अस्त ते जो मना पासून करतो ते त्यालाच माहित अस्त जगणं मरण काय अस्त तर पाऊस खुप मस्त आहे ह्या सिरीस ची मी खूप वाट पाहत अस्तो .. ❤️❤️😌😌👌🌹💐
आज मन खुप सुन्न झालं. नितीन सर तुमच्या दिग्दर्शनाला सलाम.....प्रेम हे अयशस्वी झाल्या नंतर देखील त्या व्यक्ती बद्दलचां प्रेमाचा असलेला आदर, प्रामाणिकपणा हे विशाल खरंच जगला. विशाल सारखी मुल फक्त प्रेम नाही करत ते प्रेम जगतात यालाच तर प्रेम म्हणतात. अयशस्वी ठरलेल्या गोष्टीचा स्वीकार हा आपल्या दुःखाचा पाझर सारून हसतमुख मनाने स्वीकृत करण्यासाठी पण खूप मोठी ताकद लागते. माझा दृष्टीतून अशा व्यक्ती खरंच खूप महान आहेत. .....❤❤
कोणाकोणाला वाटते its majja नी अशा अर्धवट love 💔 story वेबसीरीज नाय काढायला पाहिजे🙏 कारण मग सिरीज बघायला फिलिंग आणि मजा येत नाही😢 आणि its majja ला विनंती आहे की येणारे 10वी❤️ अ या सिरीज मधे अर्धवट 💔 love story नाय पाहिजे 🙏👍
I think जे झालं ते चांगलच झालं आणि कोणीच व्यक्ती जास्तीत जास्त दिवस एकटी नाय राहू शकत विशाल नक्कीच लग्न करेल आणि राहिला विषय सायलीचा तिने जर रोहित सोबत लग्न नसत केलं तर तिच्या घरच्यांनी विशाल तर स्विकरल नसतच 😢 पूर्ण life तिची क्रिटिकल झाली असती आणि या पूर्ण सिरीज मधे एक वाक्य रोहित ने खर सांगितल आहे "निरोप दिला की आठवणी कमी येतात"😢❤️ I always agree your dissition nitin sir ❤❤ Ha आम्ही सगळे इतके अडकलो होतो की आज पुर्ण सिरीज बघताना स्वतःच्या डोळ्यातील अश्रू नाहि थांबवू शकलो 🥺🥺
Mala vatate.. tumhi chukatay.. PS. Rohit cha hatat khup kahi hot, sayalicha gharchani svikarle asate Vishal la, Karan , Nana Ani aaji sobat hote ticha. Sayali kuthech chukali nahi, she is absolutely right at every situation. Pan sagalyat shevati maran tichach aahe.. samor Rohit Ani rudayat Vishal..sanga bar kase jagayche tine. Ekikade guilt Ani dusarikade chukichi vyakti samor asun pan sagale svikarayche.
Vishal chi ekach mothi chuk jhali ni mhanje tyani Saylicha cha number lakshat thevla nahi kiwa note sudha nahi kela ani Ani mitranna shapat deyun Gela tya baddal sangaycha nahi mhanun.Sayli ne khup diwas tyachi vat baghitli pan Ghar che pan Tila lagna sathi mage lagle hote
मुळात म्हणजे सातारा कडच्या वेबसिरीस आणि त्यात नितीन सर शब्द नाही यार..... सर मी... मी तुमच्या वेबसिरीस खूप मन लावून पाहत असतो... सायली आणि रोहित व त्यांची फॅमिली हाटेल ला गेले होते त्या एपिसोड ला कॉमेंट केली होती कि हॉटेल मध्ये रोहित ला विशाल चा call आला होता आणि ते खरं ठरलं शेवटी माणूस आहे रोहित ने ही त्याचा स्वार्थ पाहिला पण तो सायली वर प्रेम ही करतो.. पण न भेटलेले प्रेम खूप काही सांगून जात.... विशाल च्या सायली च्या मनाची अवस्था काय असेल ते समजू शकतो.... ही वेबसिरीस इथेच संपली सर्व team चे खरंच कौतुक.. खूप कमी भागात आख्या जीवनाचा सारांश मांडला.... पाऊस हा खरंच प्रत्येकाच्या जीवनातील नक्कीच प्रेम असतो.... ग्रेट work टीम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
ही वेबसिरीज बघून कुणाच्या डोळ्यात पाणी आल त्यांनी लाईक करा आणि ही वेबसिरीज अशीच पुढे चालू राहावी आस ज्याला ज्याला वाटत त्यांनी कॉमेंट करा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नितीन सर, आज परत एकदा तुम्ही चालू परिस्तिथी वर ही वेब सिरीज घेवून गेलात अणि मनाला कुठे तरी जुन्या आठवणी चा घाव ताजा केलात. पण वास्तव्यात रोहित ला जस दाखवलाय तसं खरय आयुष्यात शक्य नाही... ही सिरीज होती म्हणून तो घेवून गेला खरोखर चा जिवंणात अस होत नाय... पण सिरीज खूप छान होती. तेच आपले गावा कडे चे लोकं निसर्ग अणि सर्व काही... अप्रतिम मस्त❤🎉😘
लेखकाला ही वास्तव स्थिती दाखवायची आहे की....आजच्या जगात खर प्रेम मिळत नाही...तो गरीब आहे त्याची फक्त इच्छा होती की सायली घरात आली तर तिला काही कमी नको पडायला म्हणून जॉब साठी गेला तो....त्याच्या कडे सर्व आहे त्यालाच सगळं भेटत...आणि जो अनाथ आहे पोरका आहे त्याचा या जगात कोणीच विचार करत नाही...खऱ्या प्रेमाचा शेवट च होत असतो...आणि जबरदस्ती च नात आयुषयभरासाठी निभवाव लागत.....😢
सायलीच्या प्रेमाच्या लायकीचे दोघेही नाहीत.ना विशाल ना रोहित..तिच्या भावनांचा नुसता बाजार केला दोघांनी पण.. निःस्वार्थ प्रेम होते तिचे पण विशाल दुबळा निघाला ...रोहित बोलला म्हणून सायलीला भेटला नाही. भेटूच शकला असता.खरे काय ते जाणून घेण्यासाठी. सायलीवर विश्वास होताच ना तितका त्याचा. सतत खाली कोसळून दुबळे पण दिसते हळवे पण नाही.रोहित सायलीने नकार देवून संधीचा फायदा घ्यायला चुकला नाही. स्वार्थी कुठला...! या सगळ्यात सायलीची होरपळ झाली.दोन्ही बाजूने..लग्न केले तरी नवऱ्याच्या नजरेत पहिले प्रेम विसरू न शकणारी प्रेयसी आणि प्रियकराच्या नजरेत अशी विवाहिता जी थांबली नाही त्याच्यासाठी...घरच्यांवा समाजाचा विचार करणारी..तिचा विचार नाही झाला कुठेच.आणि रोहित सायलीला जिंकणारा अहंकारी पुरुष.. साम, दाम,दंड ,भेद वापरणारा. ( सायलीच्या घरच्यांची वागणूक दंड या प्रकारात मोडते रोहितच्या प्रभावामुळे ) विशालला खोटे बोलणे हा भेद त्याच्या मनातला.प्रेमाने बोलत राहिला तो साम, आर्थिक परिस्थितीचा प्रभाव टाकत राहिला तो दाम...एक त्यागाची मूर्ती बनतोय तो विशाल सतत सहानुभूतीची काठी घेत...आणि दुसरा महान बनतोय तो रोहित...कपट करून सायलीला मिळवणारा...पहिल्यांदाच अशा कथेत इतकी गुंतले...आजचा भाग खूप रडवून गेला...मला या पात्रांचा मनापासून राग येतोय म्हणजे ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना पावती आहे नैसर्गिक अभिनयाची. सर्व कलाकारांचे काम मनापासून आवडले हे मात्र नक्की.
शेवट बघून रडू आवरलं नाही.... 😭 पण प्लिज हे विशाल किव्वा सायली मधून एकाला स्वप्न असावं... आणि सीरिअल चा शेवट विशाल आणि सायलीची लव्ह स्टोरी पूर्ण झाल्याची दाखवा... 😭🙏🏻🙏🏻
खूपच छान ,तुमची वेबसेरी होती ... सगळे एपिसोड बागितले ... खूपच सुंदर ... इमोशनल जोडली गेली होती मी ह्या वेब सिरीज मध्ये..❤😢 प्लीज एक रिक्वेस्ट आहे... अशीच वेब सिरीज पुन्हा एकदा घेऊन या आणि त्या वेब सिरीज मध्ये सुध्दा हेच कॅरॅक्टर असुदे ...सायाली, विशाल,रोहित ... खूप मिस करणार ही वेब सिरीज....खूप आतुरतेने वाट बगयची मी आणि माझी फॅमिली..... खरंच खूप मिस करणार 😢😢😢😢😭❤️❤️❤️.....खूप छान, इमोशनल आणि सुंदर अशी वेब सिरीज होती ... प्लीज एक रिक्वेस्ट आहे...हीच पात्रता असुदे ...विशाल ,सायली आणि रोहित ..ह्याच तिघांना असू दे ... असा वाटा नातं जोडलं गेलं ह्या वेब सिरीज मध्ये... ❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤
Kharach vishal ch mn khupch vishal aahe ya webseries cha ha episode bghaychi himmat ch nvti ardhi series pahilyanatr band keli aani vichar kela khar prem krnarya sobatch as ka hote tyalach prem ka nahi midat aani khup rdu aal jivacar as vatat hot ki he sarv mazyasobat ch ghadat aahe pn kstri himmat krun he webseries purn bghitli jivavar dagad thevun kharach vishal chya acting ne khup radavlay raoo😢😢😢😢
थेट काळजावर वार म्हणजे सर नितीन पवार खूप सुंदर अशी सिरीज दिलीत आज विशाल च्या रूपाने आमच्या सारख्या कित्येक युवकांची अनुभव कहाणी तुम्ही ह्या कथेच्या माध्यमातून मांडली. जाता जाता रडवलं सर....
प्रत्येकाने फक्त आपल्या प्रेमाचा विचार केला.रोहीत ने तर खरंच त्यांच्याच विचार केला.आणि विशाल खात्री होती.तर त्याने देखील त्या रोहित च ऐकायला नाही पाहिजे होत. सायली ने सगळ्याचा विचार केला.पण तिचा विचार कोणी ची केला नाही.अगदी आई वडिलांना सुध्दा.इथच सगळं आयुष्यच अर्थशून्य झाले. जर तुमची मुलगी जर तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करते.मग एकदा मुलीचा विचार केला असता तर काय झाले असते.❤
सायलीच अभिनय खूपच अप्रतिम आहे. रोहितने दोघांच्या मध्ये येऊन खूप मोठी चूक केली. रोहितने सायलीला सांगितले हे फक्त मी तुझ्या साठी केलं आहे.यामध्ये रोहितचा स्वार्थी पणा दिसून येतो. विशालच खूप वाईट वाटले. रोहितने त्याच्या प्रेमाचा त्याग करायला पाहिजे होता. विशाल आणि सायलीला त्यांनी एकत्र आणून शेवट केला पाहिजे होता.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात . पहिल्या प्रेमाचं फुल..... असतच..... ते कुणाला लाभतं. तर कोणाला लाभत ही नाही.. नितीन तुम्ही . ही वेब सिरीज खूप छान पद्धतीने हाताळली. कोणी काहीही म्हनो... पुढच्या सिरीयल साठी माझ्यासारख्या सामान्य लेखकाकडून आपणास.. खूप साऱ्या शुभेच्छा..... यातली गाणी खूप छान . समर्पक होती..... संगीत ही खूप छान होतं...... एकंदर संपूर्ण टीमवर्क आवडलं... .... ही एका लेखकाने दुसऱ्या लेखकाला दिलेले दाद आहे..... संवादावरून लक्षात येतं आपण खूप निखळ निरागस आणि प्रेमळ मनाचे आहात. गावाकडच्या गोष्टी सिरीयल करण्यापूर्वी आपण माझ्याकडे आला होतात. माझ्या छोट्याश्या. फोटो स्टुडिओ मध्ये सासपडे येथे...... आपला नंबर पाठवू शकाल का?....... माझा मोबाईल नंबर.... 97 66 34 82 26..... पुन्हा एकदा धन्यवाद..... चांगली वेब सिरीज दिल्याबद्दल..... सो थँक यु सो मच
खूप छान वाटलं वेब सिरीज खूप प्रेमाने बोला विशाल असं सगळ्यांनी प्रेमाने वागले तर दुसऱ्याचं मन बी जिकता येतं नितीन सर तुम्हाला नमस्कार खूप छान वाटले आजचा एपिसोड बघून❤❤
खंरच दादा खंर प्रेम हे नशिब वान लोकांना मिळते आपण खंर प्रेम करून आपल्याला मिळत नाही पण त्या रोहीतने चुकीचे केले राव खोट बोलून विशाल दादाचे खंर प्रेम हिरकावून घेतले पण हे चुकीचे आहे 😢 मस्त वाटला apisode एकदम कड़क राव ❤😢 प्रेम करा पण अंस एखाद्याला फसवू नका आणि जर फसवायच असेल तर असले तर प्रेम करू नका🦋😘😢
नितीन सर आणि टिम खूप छान सिरीज होती.... आम्ही वाट पाहतोय लवकर परत या अजून काही तरी नवीन घेऊन..... तुमच्या परत येण्याची वाट पाहतोय तुमचाच एक प्रेक्षक......
Pn Vishal jr mitrana sangu naka as bolla nasta tr yewdh sagal zhal ch nast yat sayli cha Kay dosh aahe Tila tr to kuthy kay kahi ch mahit navt mi he gharchya tri kay sangnar nemak thambnycha Karan tyamul kut tri Vishal ch chukal. As mala watat mahnun sayali la dosh denyat arth nahi
सिरीज का संपवली😢😢 किती छान सुरू होते सर्व भाग अजून खूप छान एपिसोड झाले असते पुढे🥺 आज विशालने खूप रडवले 😢😢🥺😭 सायली एवढ्या लवकर प्रेग्नेंट दाखवायला नको होती❌ ती प्रेग्नेंट राहिली नसती तर आता सर्व कसे विशालने सांगितले तरी हे कळल्यानंतर सायलीने स्वार्थी नीच नालायक😠😡😡😡 रोहितला सोडून विशाल कडे पुन्हा जायला हवं होतं असं पुढे चालू ठेवायला हवं होतं आणि त्यानंतर त्या दोघांचा हसता खेळता सुखाचा संसार छान दाखवायला हवे होते दोघांनी आनंदात एकत्र राहून छान संसार फुललेला त्यांची संसारात झालेली प्रगती हे सर्व दाखवायला हवे होते🙏👍😔😒 सायलीने सरळ त्या रोहितला सोडून गावी जाऊन सर्व सांगायला हवे होते तिला आजोबा आणि आजी यांचा पाठिंबा आहे असं दाखवून बाकीचा सर्वांचा पाठिंबा ते कसे मिळवतात हे एका भागात चालले असते सायली विशाल चे नाते जुळले असते तर अजून चार चाँद लागले असते सिरीज ला अजून खूप एपिसोड सहज चालले असते👍😔 का बंद केली सिरीज 🥺🥺 मी शितल जाधव🙏
अप्रतीम, काळजाला हात घालणारी मालिका होती, विशाल च खूप वाईट वाटते, आजच्या भागात सर्वांचा अभिनय लाजवाब होता, विशाल, सायली आणि रोहित नक्कीच लक्षात राहण्यााजोगा अभिनय होता तुमचा, नितीन पवार, धन्यवाद.
मला असं वाटत की अजून चांगल्या पद्धतीने ही वेब सिरीज मांडता आली असती पण लवकर संपवली अस वाटतं मी बोलल्या प्रमाने प्रेक्षकांना चांगला शेवट आवडतो कारण यामध्ये कोणाच्या तरी भावना गुंतलेल्या असतात असो प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते
माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट वेब सिरीज म्हणजे पाऊस. कायम आठवणीत राहील विशाल आणि सायलीची लव्ह स्टोरी प्रेम कसं करावं आणि ते आयुष्यभर जपून ठेवावं विशाल नी सगळ्यांना पटवून दिलं.
सायली आणि विशाल यांचीच जोडी छान दिसते❤❤👌👌 या रोहितने आधी म्हणाला तुमच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही आणि इमोशनल ड्रामा केला जो थांबायला तयार असतो मनापासून प्रेम करतो तो कधीच हक्क गाजवत नाही आरडाओरडा करत नाही आणि मागे काय म्हटलं हा रोहित असंच चालत राहिलो तर मी फुटेन उध्वस्त होईन 😡😡😠 आणि सायलीने सुद्धा एकदा दिलेला शब्द मी मागे घेत नाही म्हणणारी सायली का थांबली नाही विशाल साठी का थोडा वेळ नाही मागितला घरच्यांकडून😌😔🙄 *बिचारा विशाल🥺❤❤* मी शितल जाधव🙏
रोहित ने पाहिजे तेव्हा इमोशनल बोलायचं आणि पाहिजे तेव्हा हक्क गाजवून सायली ला फसवल आहे... आणि हे सायली च्या लक्षात आलंच पाहिजे अशी स्टोरी डायरेक्टर ने पुढे दाखवली पाहिजे
रोहितने शेवटी स्वार्थच केला ना रोहितला माहिती होतं सायली आणि विशाल चे प्रेम आहे तर मग त्याने स्वतःहून दोघांचं लग्न लावून द्यायला हवं होतं ना रोहित असं म्हणतो की माझं सायली वर खरं प्रेम होतं आणि मी सायलीच्या सुखासाठी केलं पण रोहितला हे कळायला हवं होतं सायलीचे सुख हे विशाल सोबतच होतं खरं प्रेम करणारे दोन खरं प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणतात त्यांना वेगळं नाही करत आपल्या स्वार्थासाठी जे रोहितने केलं आतापर्यंत सायलीला सुनावतो आहे आणि सायली त्याच्याकडून माफी मागते म्हणजे हे तर विचित्रच आहे
सिरीज मध्ये गोष्टी विचार करण्याच्या पलीकडच्या दाखवल्या हे 1990 मध्ये ठीक होत कंपनी मध्ये 6 महिने मोबाईल/फोन वापरायला बंधी आहे, किंवा सुटी नाही, एवढ्या कविता पाट असणारा अभ्यासू वेक्ती त्याला स्वतःच्या जिवापेक्षा प्रिय असणाऱ्या वेक्तीचं नंबर पाठ नाही
काहीतरी दुसरे वळण घेऊन सिरीज चालूच रहावी अशी इच्छा होती.कृष्णाला राधा मिळाली नाही तरीही राधाकृष्ण एकच होते तसेच विशाल आणि सायली मनाने एकच आहेत. उत्तम कथा, सादरीकरण, संवाद...👌👍🙏😊
खरंच अक्षरशःह डोळ्यातून पाणी थांबतच नाहीये, तिची आठवण सोबत असणे व ती सोबत असणे या दोन्ही वाक्यांमध्ये खूप अंतर आहे, आपला खरा प्रेम जर आपल्या सोबत असला तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे राहू शकत नाही, ..... लेखक ला मानाचा मुजरा.........
खरचं खुप छान होत्या दोन्ही पण वेबसिरीस❤️💯👍 आठवी-अ आणि पाऊस.....it's majja production अजून काय तरी नवीन वेबसीरीस लवकरात लवकर घेऊन याला याची वाट पाहतो आम्ही सर्वजण...
खूप छान वेब सिरीज आहे. नितीन पवार सर आणि त्यांच्या सर्व ग्रुप चे मी आभार मानतो.जसे प्रेक्षक या वेब सिरीज बघण्यात गुंतलेला असतो आणि शेवटपर्यंत बघतच राहील, अशी स्टोरी नितीन सरांनी उदयास आणलेली आहे.💞💓 माझ्या हृदयाला या स्टोरीने आरपार छेद केला आहे. शेवटचा भाग हा खूप भवणास्पर्शी आहेत.😢💔 नितीन सरांच्या वेब सिरीज मध्ये एकदा तरी काम करण्याची संधी भेटावी अशी माझी खूप इच्छा आहे.♥️🙏
मला ही सिरीज खूप आवडली. शेवट मनाला चटका लावून गेला. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सायली ब्राह्मण, नातेवाईक याच्या समोर झालेल्या लग्नाला आणि त्या सात फेऱ्याला जपली. येवडंच मन्हयाच की विशालच्या नशिबी सायली नव्हती. नितीन सर पुढे पण अश्याच चांगल्या वेबसिरीज आणा. मी वाट बघतो. धन्यवाद
खरं प्रेम आणि प्रेमाचा त्याग या दोन्ही गोष्टी नितीन सरांनी पाऊस या वेबसिरीजमधून उत्कृष्टरित्या मांडल्या. कथानक खूप भावनिक होतं. अनेकदा डोळ्यांच्या कडा ओलावल्या. शेवट थोडा अनपेक्षित झाला पण एकंदरीतच वेबसिरीज खूप आवडली. आता नविन मालिकेच्या प्रतिक्षेत कोल्हापूरकर...
खरचं खूप छान वाटली सिरीज.😊 मन भरून आले अगदी.🤗 रोहित त्याच्या प्रेमाचा पाठलाग करताना स्वार्थी दिसला,😡 पण विशाल खऱ्या प्रेमासाठी हरला.😰 प्रेम म्हणजे एकमेकांना मिळवणे एवढच नसत.🙃 सायली तिच्या जागी बरोबर होती. ती किती काळ तिच्या आई बाबा ला नाराज करणार होती?😔 विशालच्या ओठातून शेवटचे शब्द ऐकताच मला मन सुन्न झाल्याची जाणीव झाली. अगोदर पण अनाथ होतो आणि इथुन पुढ पण अनाथ च राहिल.😰😓 -सर्वोत्कृष्ट मालिका दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🥰 तसेच पार्श्वसंगीत देखील अतिशय हृदयस्पर्शी आहे.😊 कृपया तुमच्या चॅनलवर गाणे तसेच पार्श्वसंगीत अपलोड करा.🫣
मी सोमवार आणि गुरूवार ची खुप आतुरतेने वाट पाहत असायचो,,या बेव सिरीजचा शेवट इतका वेदनादायी होईल अशी कल्पना देखील केली नव्हती,,अखेर वाट पाहण्याचा प्रवास संपला..डोळ्यातुन पाणीच आलं..! असं वाटतं या वेबसिरीजचे दुसरे पर्व यायला पाहिजे.,,,विशाल आणि सायली हे पात्र माझ्या मनातुन जातच नाहीय.कृपया काही करा,अन् या जोडीला पुन्हा एकत्र आणा..हात जोडुन कळकळीची विनंती आहे.