गावाकडची जंगल भटकंती !!
गावाकडच्या घनदाट जंगलात असलेल्या जुन्या वाटा, पाणवठे आणि पाण्याचे झरे पहाण्यासाठी ५-६ तास केलेली भटकंती.
असंख्य पक्षी, त्यांचा किलबिलाट, पायाखाली तुडवत गेलेलो पाला पाचोळा. ह्या शिवाय जंगलात आता कुणीच नसत. गावाकडच्या जंगलात एक वेळ लोकांची नुस्ती गजबज होती. एक हाळी दिली कि कुठून ना कुठून परत त्या हाळीच उत्तर लागलीच येत असे. आता त्या वाटांची जागा सुक्या पाला पाचोळ्यांनी घेतली आहे. एक वेळ अशी होती पहाटे पासून संध्यकाळी सूर्य मावळती पर्यंत नुसत जंगली पडीक असायचो. आज ही ह्या घनदाट जंगलात फिरताना असंख्य जुन्या आठवणी डोळ्या समोर उभ्या आहेत. पण आपल ठरलय कुणी असो वा नसो पण हे हे जंगल आपल आहे. आपण सदैव इथे जंगलाच्या सोबतीत राहणार.
26 сен 2024