छ.संभाजी महाराजांना कैद केले तो वाडा , कसबा पेठ संगमेश्वर | Sambhaji Maharaj,Kasba peth Samgmeshwar
संभाजी महाराज कैद | स्वराज्य रक्षक संभाजी महाराज | महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवस शंभू राजेंची कैद
१६८९ च्या सुरुवातीस संभाजीराजे यांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणात संगमेश्वर येथे आयोजित केली होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संभाजी महाराज यांच्या ३००-४०० च्या तुकडीवर आपले ३००० चे सैन्य घेऊन संगमेश्वराजवळ चालून आला. मराठ्यांच्या आणि शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. मराठ्यांचा राजा वैरांच्या मगरमिठीत सापडला. पकडलेल्या संभाजी महाराज व कवी कलाश यांना बहादूरगडमध्ये नेण्यात आले.
संभाजी महाराजांना मराठ्यांसह आपल्या किल्ले, खजिना मुघल साम्राज्याला बहाल करण्यास सांगितले गेले. परंतु झुकेल तो मराठा राजा कसला. ‘मोडेन पण वाकणार नाही‘ चा नारा देत मराठा साम्राज्याचा राजा मुघलांचे अत्याचार सोसत राहिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. औरंगजेबाला तुळापूरच्या संगमावर संभाजी महाराज यांना हलाल करावयाचे होते. आपकी एकनिष्ठा न सोडणाऱ्या संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलश यांचेही डोळे काढण्यात आले. एवढे करूनही संभाजी महाराज डगमगले नाहीत.
औरंगजेबाने संभाजी महाराजाना पुढील शिक्षा जीभ कापायची दिली. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यंची जीभ तलवारीने कापली.. त्यांच्यावर चाललेले हे अत्याचार पाहुन भीमा-इंद्रायणी सुद्धा रडु लागली. अखेर संभाजी महाराज यांची ११ मार्च १६८९ रोजी भीमा - इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे हत्या करण्यात आली
स्वराज्याचा धनी अनंतात विलीन झाला. एवढे अत्याचार करून सुद्धा मराठ्यांचा राजा झुकला नाही. याची सल औरंगजेबाला कायम राहिली.
संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यात आले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पेरून ठेवलेली स्वराज्याची शिकवण पुढेही मराठ्यांनी वाढवत नेली.
=======================================
कोकणातील दर्जेदार विडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लीक करा
1. घरी बसून कंटाळा आलाय का?चला तर मग घरबसल्या सफर करूयात पेशव्यांच्या जन्मगावी ,कोकणातील अतिशय सुंदर निसर्गरम्य शांत असलेल्या श्रीवर्धन ,रायगड या गावाची सफर करूयात
• चला श्रीवर्धनची सफर कर...
2.माश्यांचा लिलाव पहा जीवना बंदर श्रीवर्धन- Fish Auction @ Jivana jetty Shrivardhan- कोकणातील मासेमारीचा व्हिडिओ पाहण्यासाठी Episode 02
• माश्यांचा लिलाव जीवना ...
===================================
आमच्या Kasturi Foods च्या रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर clik करा
1.गरमागरम फोडणीचे वरण रेसीपी - Instant Daal Tadka Recipe - कोकणातील झटपट फोडणीचे वरण - KokanFood VBlog 01 : • गरमागरम फोडणीचे वरण रे...
2. उकडीचे मोदक कसे वळावेत - संकष्टी निम्मित मोदक रेसिपी - Ukdiche Modak Recipe By Kasturi Foods - Ep 2 : • उकडीचे मोदक कसे वळावेत...
3.तेच तेच खाऊन कंटाळा आलाय?चला तर मग आज करूयात अतिशय सोपी हिरव्या वाटणातील वालाची उसळ बघूया . आवडल्यास नक्की करून बघा
• हिरव्या वाटणातील डाळिं...
Kasturi Recipes by Kasturi Foods 9967959636
=======================================
व्हिडिओ आवडल्यास Like, share, Comment नक्की करा आणि कोकण सर्च Channel ला Subscribe करा
/ kokansearchofficial
===================
कोकण सर्च इंजिन
www.kokansearch.com
सुशांत लांबे 9930908811
वैभव लांबे 9930365566
Kokan Tourist Help Center
26 сен 2024