नंदुरबार येथे विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरण, त्याचप्रमाणे नंदुरबार शहराला आगामी काळात पाणीपुरवठा करण्यासाठी डॉक्टर विजय गावित यांनी आयोजित केलेली तापी नदीतून 200 कोटी रुपये खर्च योजना तयार करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस त्यांनी विरोध दर्शवला आहे, तर पाणीटंचाई ही काही काळाची आहे परंतु आगामी काळात ही पाणीटंचाई पुरेश्या प्रमाणत पाऊस झाल्यानंतर दूर होईल व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल, तर आगामी 2040 पर्यंत नंदुरबार शहराला कोणत्याही प्रकारचा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा देखील खुलासा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. नंदुरबार नगरपालिका तसेच नंदुरबार शहरातील विविध विषयांवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या आरोप प्रत्यारोप यांना, आज झालेल्या पत्रकार परिषदेतून सडेतोड उत्तर देत तुफान फटकेबाजी केली आहे, तर नंदुरबारच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविणारे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी, नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला व शहराला कायमच विरोध केला आहे, असा सणसणाटी खुलासा आज झालेल्या पत्रकार परिषदेतून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे, तर मंत्री डॉक्टर गावितांना यांना नंदुरबारच्या जनतेचा एवढा पुळका आला आहे, जसे नंदुरबारची जनता ही अफगाणिस्तान मधून आल्यासारखे त्यांच्या प्रती पुतना मावशीचे प्रेम गावित साहेबांचे उतू जात आहे, नंदुरबार नगरपालिकेचा यावर कुठलेही मंजुरी व प्रस्ताव तयार नसताना, हा प्रकल्प राबविण्यासाठी गावीत साहेब एवढे उतवीळ का झाले आहेत ? असा देखील प्रश्न यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे, नेमका विरचक धरणावर जात माजी खासदारांना नंदुरबारच्या जनतेचे प्रेम कसे उसंडू लागले? असा तिखट सवाल आजच्या पत्रकार परिषदेतून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे, तर वीरचक प्रश्नावरून माझ्या झराळी येथील बीके फॉर्मच्या बाबत तर तर्क वितर्क लावणाऱ्या माजी खासदार यांची देखील डिग्री पूजा खेडकरप्रमाणे तपासणी आवश्यक आहे, त्या खरच डॉक्टर आहेत त्यांची देखील डिग्री ही तपासणे गरजेचे आहे, असा देखील मिश्किल टोला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांना लगावला आहे, तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेच्या चौकशी बाबत व बांधकाम विभागअंतर्गत करण्यात आलेल्या 3054 कामांची न्यायालय चौकशी सुरू असताना, त्या कामांचे देखील बीले काढण्याचा प्रताप जिल्हा परिषदेचे काही अधिकार्यांवर दबाव टाकून अध्यक्ष करीत असल्याचा खुलासा या ठिकाणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.
21 сен 2024