पाणी जिरवण्यासाठी मी माझ्या शेतात जेसीबीने ३-४ फुट रुंद व ३-४ फुट खोल चांगला मुरुम लागे पर्यत व लांबीला ५० ते १०० फुट लांब असे चर केले आहेत.या चरांमधुन प्रंचड पाणी जमिनीत मुरते व माझ्या शेतातील बोअरवेल ला पाणी मे व जून महिन्यापर्यंत पुरते.या बोअरवेल च्या पाण्याचा वापर ठिबक पद्धतीने करुन आंबा ,नारळ, काजू अशी झाडे लावली आहेत व अशा प्रकारे पाण्याचे व्यवस्थापन केले आहे.पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे हे आता शेतकरी बांधवांनी ओळखले आहे. चर करण्याचा जेसीबी चा खर्च १०००/- रुपये तासाने असा आला.
कोकणात पाऊस भरपूर असूनही पाणी साठत नाही Good initiative in that direction. खडी दगड टाकण्यापेक्षा नुसता मोठा खड्डा हि same purpose करेल, खडी टाकल्याने जमिनीची रुजवण कमी होते आणि खडी टाकण्याला लिमिटेशस आहेत,
माझा स्वानुभव सांगतो मी आमच्या पडीक जमिनीमध्ये 40× 150 फुट चे शेततळे 10 फुट खोल तयार केले त्या मुळे माझा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागला तसेच शेजारी असलेल्या विहिरींची पाणी पातळी वाढली सदर तळ्यात ली माती नारळ सुपारी ला वापरली त्यामुळे वाडी बहरली उत्पन्नात दुप्पट वाढ झाली
चांगला प्रयत्न. कमी खोलीचे खूप खडे मोकळ्या जागेत तयार करता येतील. त्यामुळे भरपूर पाणी झिरपू शकेल.खडे मोकळे ठेवले तर खर्च कमी येईल. गाळ साचल्यास झाडे लावता येतील.
मी 2005प्रयोग केला होता उत्तम पर्याय आहे. खडी पेक्षा मोकळा ठेवला पाऊस संपण्याच्या वेळी प्लास्टिक टाकून शेवटचे पाणी वर स्टॉक साठी राहते का बघा.पुढे 3महिने तरी पाणी पाणी देता येईल. 2खड्यात जमले तर नारळ सुगडी kathya टाकला तर बाजूचा झाडांना पाणी 4/5महिने पुरेल विटा नारळ katya बाकी उत्तम काम❤
बरेच वेळा जोरदार पावसामध्ये बराचसा गाळ वाहून येतो, खडी, दगड यामुळे तो तळाशी न साठता वरच्या वर राहून पाणी मात्र तेवढे तळाशी जाते आणि प्रमाणात मुरायला मदत होते.. वरती साचलेला गाळ नंतर खत म्हणून ही वापरू शकतो..
@@ank4330 खडी,दगड टाकलेले बरे कारण पाण्याबरोबर येणारा गाळ, पालापाचोळा तळाशी न साचता वरच्या वर राहतो आणि पाणीच तेवढे तळाशी जाऊन मुरायला मदत होते, तो तळाशी गेला तर कालांतराने खड्डा गाळानेच भरून जाईल. आमच्या जागेवरच असलेले काही दगड, धोंडे मी वापरले. खडीला कमी खर्चीक पर्याय असू शकतो, मी एक दोन ठिकाणी फुटकी कौलंही वापरलेली पाहिली. RU-vid वर बऱ्याच तज्ञ लोकांनी यावर video केले आहेत, त्यावर पण माहिती मिळू शकते.