अजुन एक पर्याय आहे तो म्हणजे जर गणपतीची किंवा नावरात्रिचि वर्गणी मागितली गेली तर त्यांना सांगा की ह्या दोनी वर्गनि ऐवजी दही हंडी करा आणि तो जो खर्च आहे तो आम्ही स्वता करू पण आम्ही ही वर्गणी देवु शकत नाही नक्कीच ते नाराज पण होणार नाही आणि आपली पण वेळ निघुन जाते
महानुभाव पंथ आहे की धर्म तो जर पंथ आहे तर महानुभाव लोक आमचा धर्म असा उल्लेख का करतात .महानुभाव पंथ हिंदू धर्माची एक शाखा आहे हे महानुभाव पंथाचे अनुयायी मान्य करत नाही ते आम्ही आम्ही वेगळे कसे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात या पंथाचा स्वीकार केला आहे त्यांनी सुरवातीला आम्हला हे चालत नाही ते चालत नाही असे म्हणत आता त्यांना कोणी कार्यक्रमात बोलवत नाही ते समजापासून नातेवाईकांना पासून दूर गेले आहे
नाही हा पंथ हिंदू धर्मातीलच आहे. धर्म म्हणायचे कारण एव्हढेच की धर्म ही संकल्पना प्राचीन काळात वेगळी होती. आणि आता ची वेगळी जसे "Riligion"धर्म जर एक उदाहरण घातले तर ज्या प्रमाणे पाण्याचा गुणधर्म उताराच्या दिशेने वाहने त्याच प्रमाणे माणसाचा ही खरा एक धर्म असतो म्हणजे मानव धर्म आणि तो वेगवेगळ्या पंथानी आणि संप्रदायांनी सांगितले आहे.
महानुभाव हिंदु नाही ते सनातन धर्म आहे ज्या मध्ये हिंदु,मुस्लिम,ख्रिश्चन, जैन,सिख आणि सर्व वेगवेगळे धर्म येतात असा आहे सनातन धर्म त्यासाठी पहिली श्रीमद भगवत गीता वाचावी सर्व पप्रश्नांची उत्तरे मिळतील उगाचच कोणी कोणत्या धर्माला नावे ठेवू नये त्यामागील माहिती घ्यावी.महानुभाव पंथ त्यांतीलच आहे सत्य सनातन महात्म धर्म🙏
दंडवत प्रणाम बाबाजी जैन समाजातील साधू हे केव्हा तरी आपल्या महानुभाव पंथाच्या लोकांच्या घरी येऊन भिक्षा घेऊन जातात . मग त्यांना भिक्षा द्यावी की नाही ? त्याच प्रमाणे अन्य धर्मातील धर्मातील साधूंना भिक्षा द्यावी की नाही?
आपण आपली देवपूजा करावी पत्नी धर्म पाळावा आणि 5वे नाम निरंतर मुखात ठेवून कार्य करावे । देवाला कायम प्रार्थना करावी आपले सासर चे पण अनुकूल होतील । परंतु कुठल्याही परिस्थितीत स्वामी श्रीचक्रधराला सोडू नये ।
देवा चे स्मरण करताना मन अस्वस्थ होते, मनात विचीत्र ( वाईट) विचार येणं, सूरवातीची काही मीनट (५-१०) नामस्मरण होते. नंतर मात्र हळूहळू त्या त अडथळे निर्माण होतात व स्मरणात लक्ष लागत नाही. बाबाजी कही उपाय सांगा दंडवत प्रणाम श्री. चक्रधर मी ठाणे येथे राहते. जवळपास कूठे आश्रम असल्यास कृपया मला मार्गदर्शन करा.
दंडवत प्रणाम दादा खुपच छान माहिती दिली आहे. सुरुवातीला मी सुद्धा वग॔णी देत होतो. पंरतु काही दिवसांनी आमच्या काॅलनीतील लोकांनी असा नियम केला कि सव॔ सभासदांनी ठराविक रक्कम देणे आवश्यक आहे. हा नियम मला वैयक्तिक पातळीवर आवडला नाही. म्हणून मी वग॔णी देण्यासाठी नकार दिला. तेंव्हा पासून मी वग॔णी देत नाही. आणि सहभागी सुध्दा होत नाही. त्या मुळे माझी मुलं सुध्दा जात नाहीत हे योग्य आहे का दादा ?
होय अतिशय उत्तम आहे । यात सांगितलेल्या गोष्टी ज्यांना अशक्य आहे त्यांच्या साठीचा मार्ग आहे । बाकी आपल्या धर्मात कट्टर लोक आहेत ते अजिबात कोणत्याही अन्य गोष्टी ला थारा देत नाहीत । परंतु सर्वाना हे शक्य नसते त्यांच्या साठीचा हा उपक्रम आहे ।
दंडवत बाबाजी. बाबा मी काही दिवसापूर्वी उपदेश घेतला होता परंतु मला आता अन्य भक्ती करायची आहे तर मी महानुभाव पंथ सोडून देऊन अन्य स्विकारताना काही विधी करावी लागेल का?
तुम्हाला जर पंथ सोडायचाच होता तर उपदेश घ्यायचाच नसता. आणि अन्य भक्ती जरी आता तुम्हाला करायची असेल तर विशिष्ठ अशी पद्धत नसेल असं मला वाटतं. फक्त एक सांगु इच्छिते याचे परिणाम तुमच्यासोबत घरच्यांनाही भोगावे लागणार आहेत आणि तुमच्या असं वागण्यामुळे जसं एखादी बाॅसच्या फेवर मधली व्यक्ती चपराशाचं ऐकायला लागते तेव्हा त्या बाॅसला जी वेदना होते किंवा जे दुःख होतं तसंच दुःख तुम्ही स्वामींना देणार यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट तुम्ही महानुभावपंथ नेमका तुम्ही समजलाच नाहीहेत. जर समजला असतात तर पंथ सोडायचा विचारही डोक्यात आला नसता.