बुध्द् धम्म आहे,धर्म नाही बुध्द् मानव आहे, देवता नाही बुध्द् करूणा आहे,शिक्षा नाही बुध्द् विचार आहे, दुराचार नाही बुध्द् शांती आहे,हिंसा नाही बुध्द् प्रबुद्ध आहे, युद्ध नाही!!! रामटेके परिवारातर्फे बुद्ध पोर्णिमेच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
फार छान बुद्ध पौर्णिमा आम्हा सर्वांची झाली डॉ. साहेब तुमचा प्रत्येक वीडियो अतिशय माहिती पूर्ण असतो सेल्यूट तुम्हाला नूसत डॉ असून चालत नाही समाज्याशी असलेली बंधिलाकि सुद्धा जपावी लागते आणि लोकांना चांगले विचार सांगावे लागतात है आपन नेहमी सिद्ध करता...
Kjuhjhhhhh of india says the week of india says the week of india says the week of india says the week of india says the week of india says the week of india by pass road Aurangabad mim and then we will be able envb a c program the day and then you can also be used to the
डॉक्टर, तुम्ही जो बाबासाहेब, महात्मा फुले आणि प्रबोधनकार यांच्या पुस्तकांचा उल्लेख केलात तो अतिशय बरोबर आहे, हि सर्व पुस्तके वाचल्याशिवाय खरा बुद्ध कळणार नाही, मी सुध्धा विप्पशना करतो, एवढं बुद्धांच महान काम , बुद्ध वाचल्याशिवाय कळणारच नाही, आपण करत असलेलं जनजागृतीचे कार्य हि महानचं आहे असचं चालु राहो, सबका मंगल हो 🙏🙏🙏
डॉ. साहेब, भारतात आपल्याला येण शक्य नाही परंतु भारताती अनेक धर्म निरपेक्ष विचारावंताना एकत्र घेऊन तळागाळातील लोकांना विवेकवादी विचारवंत करण्यासाठी चळवळ उभी करण्याची आपल्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.
सलाम आहे तुम्हाला , तुमच्या कार्याला आणि तुमच्या अभ्यासपूर्ण विचारांना सर ..... मी लातूर जिल्ह्यात शिक्षक आहे ..... कधीतरी तुम्हाला भेटण्याची अतीव इच्छा आहे सर..... तुम्ही अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करावीत हीच बुद्धचरणी मंगलमय कामना..... Hats off to you and your dedicated work sir .....
खूप खूप छान सर, ऐकून मन प्रसन्न झाले,हा एक खूप तत्त्वनिष्ठ व विवेकवादी तसेच माणसाला माणूस म्हणून जगू देणारा विज्ञानवादी धर्म असल्यानेच बाबासाहेबांनी तो स्विकारला, आपण खूपच चांगल्या पद्धतीने याचे विवेचन केलेत, धन्यवाद
अवघ्या #जगाला #शांततेचा #संदेश देणारे #दया, #क्षमा, #शांतीची #शिकवण देणारे #विश्व #वंदनीय #महामुनी #तथागत #गौतम #बुद्ध यांच्या #जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा सर 🙏🙏 आपण सांगितलेल्या करोना बद्दल सर्व बरकावे माहिती झाल्या मूळे खूप काटेकोर पने प्रत्येक व्हिडीओ ऐकून त्याचे पालन करतो 🙏🙏 धन्यवाद सर
मा.श्री.डॉ.पाटील साहेब, 🙏नमस्कार 🙏 आपणांस व आपल्या कार्यास मानाचा मुजरा..! देशाच्या बाहेर लाखो किलो मिटर अंतरावर असुन हि आपण आपल्या मातृभूमीचा आणि मातृभाषेचा अभिमान बाळगतात हे खुप कौतुकास्पद आहे. आपण वेळोवेळी कोरोना आणि इतरही बाबतीत मार्गदर्शन करून हिंदूस्थानातील आणि महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांना दिलासा आणि धिर दिलात हे काम खुप अभिमानास्पद आहे. त्याबद्दल आपला शब्द सुमनांनी सत्कार करतो. आणि मी आणि विपश्यना ध्यान समीती केंद्र लातूर, महाराष्ट्र राज्याच्या वितीन खुप खुप धन्यवाद.! शक्य असेल तर लातूर विपश्यना समीती च्या वतीने खुप खुप शुभेच्छा...! धन्यवाद....! अनिल पाटील लातूरकर विपश्यना ध्यान समिती केंद्र लातूर, पिन 41 35 12
पाटील सर बुध्द आणि डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कौतुकास्पद माहिती सांगत किंवा त्यांच्या कार्या बद्द्ल विश्लेशन करुन सांगणं आमच्यासाठी आनंदमय ,सुखद गोष्ट आहे. बौध्द पौर्णिमे निमीत्त लोकसत्ता मध्ये डा.यश वेलणकर यांचा 'बुध्द जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ 'असा अत्यंत उत्कृष्ट भगवान बुद्धांची महती सांगणारा चिंतन,मनन करावयास लावणारा सुरेख ,वाचनिय लेख सर्वांसाठी दखलपात्र आहे. सर तुमच्या सारख्या वैद्यकिय व्यवसायी कडून बुध्दा विषयी प्रबोधनात्मक बोलने खुप आनंददायी वाटतं.आपणास दिगंत कीर्ती मिळो आणि आम्हाला तुमच्याकडून असे सतत सामाजिक विषयाला स्पर्श करणारे बुध्द तत्वज्ञान आपल्या वाणीतुन ऐकायला मिळतो.जयभीम,नमोबुध्दाय.भवतू सब्ब मंगलम'!
अंतःकरण शुद्धीचा मार्ग म्हणजे तथागतांचा विपश्यनेचा आणि धम्माचा मार्ग होय हे अतिशय अभ्यासपूर्ण आणि छान शब्दांमध्ये आपल्या मनोगतातून आपण सांगितले सर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏
जय भारत सर.... खरच बाबा साहेब आणी गोयंका जी यांनीच बुद्धाला त्याच्या मूळ जागी परत आणले... खूप मोठे कार्य या दोन महामानवानी केले आहे आज बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनी या दोन महा मानवाना कोटी कोटी प्रणाम.... 🙏🙏🙏
सुंदर, अप्रतिम कोरीवकाम असलेल्या लेणी बुद्धांच्या आहेत ज्या बघण्यास , उपासना साठी परदेशातून पर्यटक येतात. त्यांच्या विचारांची जोपासले गेले पाहिजेत. लोक इतर जयंती प्रमाणे बुद्ध पोर्णिमा फारशी मोठ्या प्रमाणात साजरी करत नाहीत, कदाचित त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले नसतील
बुद्ध पौर्णिमा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...!!! डॉ. आ.ह.साळुंखे यांनी 'सर्वोत्तम भुमिपुत्र गौतम बुद्ध' हे पुस्तक अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने व प्रामुख्याने देवधर्माच्या रूढीपरंपरा व कर्मकांडात खितपत पडलेल्या मराठा समाजाला भगवान बुद्ध बाबतीत सत्य समजावून सांगणे व मानसिक व सामाजिक ऊत्थानासाठीचा केलेला महत्वकांक्षी प्रयत्न होता.
डॉक्टर साहेब तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🙏 अतिशय अभ्यासू आहे तुमचं बुद्ध धम्मा वर विवेचन. तेच तुमच्या आचरणात सुद्धा जाणवते जे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे.
सर आपण एवढ्या मोठ्या गोष्टी एकदम छान पद्धतीने विश्लेषण करून मांडल्या खरच आश्चर्यकारक आहे व्हिडिओ मधला एक ना एक शब्द महत्त्वाचा वाटला धन्यवाद. 🙏 अंत दीप भव 🙏
डाॅ.साहेब आपला अभ्यास खुप सखोल आणि दांडगा आहे .आपण जे आज विश्लेषण करून माहिती त्याबद्दल आपले आभार .....अशा विचारांची , प्रचार प्रसिध्दी ची भारताला गरज आहे. 🙏🏼
खुपच छान माहिती दिली डॉ. पाटील साहेब. आपल्या वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाजातील प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घ्यावा लागेल तेव्हाच विकास होईल अशाप्रकारचे प्रगल्भ विचार आपण नेहमीच व्यक्त करता त्याबद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद 🙏🌹
धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिली तुम्ही..बहुजन समाजातील लोक तुमच्या मार्गदर्शनामुळे कदाचित जागृत होतील विपशनेमुळे मन बुध्दी माणसाचं अस्तित्व समजते धम्म आणि धर्म यातील सुंदर विश्लेषण केले आहे घरातील प्रत्येकाने विपश्यना केल्यास जगात शांती समृद्धी नांदेल सब का मंगल होवो
डॉ .आपण खूष चांगले बोलता .मीबौध आहे .याचा मला आभिमानवाटतो .बौद्ध धर्माचा चांगला अभ्यास केला आहे मीआपले सगळे भाषण ऐकत असते खूप ऐकायला आवडते . जयभीम .मी आपल्या सोबत काम केले आहे .C.H.J. Sister kale. Bhalerao.
आदरणीय सर, वैद्यकीय क्षेत्रासोबतच आपला चौफेर सखोल व्यासंग बघून अधिक प्रभावित झालो आहे . अज्ञानातून कींवा वाचनाच्या अभावातून कींवा प्रामाणिकपणे सत्य स्वीकारण्याचे सामर्थ्य नसण्यातून आणि त्यायोगे येणाऱ्या संकुचितपणातून कारणं काहीही असोत बहुसंख्य लोक सत्य स्विकारायला तयार नसतात ही वस्तूस्थिती क्लेषदायक आहे . आपण राजकीय, सामाजिक, धार्मिक , वैद्यकीय विषयांवर परखड अभ्यासू मत मांडून सामाजिक जागृतीचे कल्याणकारी कार्य करीत आहात या बद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत . आभार यासाठीच की, आजच्या युगात एकतर बहुसंख्यलोक अधिकृत संदर्भ साहित्यातून वाचन करत नाहीत त्यामुळे ते आपल्या ऐकीव कींवा स्वतः च्या थाराहीन चाकोरीबद्ध विचारसरणीत संपूर्ण आयुष्य काढत आपल्या अज्ञानाविषयी एकनिष्ट राहतात . जे लोक ज्ञानी आहेत त्यांना इतरांपर्यंत ज्ञान पोहोचणे महत्वाचे वाटत नाही . परंतु आपण विदेशात असुनही आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून सामाजिक जबाबदारीतून लोकांना उजेडात आणण्याचे काम करत आहात याबाबत आभार न मानणे कृतघ्नपणाचे ठरावे . ..पंकज जाधव , बुलढाणा
डॉ. साहेब तुम्ही एकदम छान समजून सांगितले आहे. भारतात कोठेही पहा कोणत्याही मातीत (कोठेही उत्खनन केले तरी बुध्दमूर्ती सापडतात ) , कोणत्याही डोंगरावर , पर्वतावर (लेण्यांत ) , मंदिरामध्ये ( बुद्धांची चित्रे ) आहेत .भारत बौध्दमय आहे.
सर तुम्ही बुद्ध यांच्या धमम बाबत सुंदर विश्लेषण केले बुद्ध हे अखिल मानव समाजाचे आहे. पंरतु आज बुद्ध हे केवळ आज एका समाजाचे समजले जाते ..बुद्ध जयतीचया हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
खूप छान sir तुम्ही जो गल्लत झालेला धम्म मार्ग सांगितला खूप imp आहे. आधुनिक भारतात त्याची खूप गरज होती. बाबासाहेब आणि गोएयेंका जी यांचं मार्ग किती सोपा करून सांगितला. 🙏🙏🙏
डॉ साहेब तुम्ही खान्देशी असण्याचा आम्हाला अभिमान आहे तुमचे करोना काळातील सल्ले खूप प्रभावी असतात पण आज बुद्धांविषयी असलेले ज्ञान पाहून तुमच्या विषयी एक आदराची भावना झाली
खुप छान डॉक्टर साहेब तुमच्या सारख्या हायली ऐज्युकेटेड माणसांनी हा शुद्ध आणि पवित्र मार्ग सांगितला पाहिजे, जास्त प्रभाव पडतो हा प्रतेक व्यक्तीच्या कल्यानाचा मार्ग आहे,पण आपल्या देशाचे दुर्दैव असे की हायली ऐज्युकेटेड मुली आणि मुलं कर्मकांडाच्या गर्तेत अडकून मणुष्य जीवन व्यर्थ घालवता खुप खुप साधू वाद
राजेश पाटील सरांचे बालमित्र डॉ. संग्राम पाटील यांना भेटायचे होते ते शक्य झाले नाही .... "ताई मी कलेक्टर व्हयनु" यात तुमचा उल्लेख प्रेरणास्रोत म्हणून राजेश पाटील सरानी केलेला आहे.... तुमचे विडिओ आणि विचार मी दररोज ऐकतो..... त्यातून भरपूर माहिती मिळते....... आणि तुम्ही खरंच प्रेरणामूर्ती आहात...... खूप शुभेच्छा सर !!
जयभिम सर, आपण DR असून वेद, उपनिषद, purna याचे सर्व अभ्यास कसा केला सर, आपले आवड असल्या मुळे हे श्यक झाले धन्यवाद सर. आपल्या मुळे बुधाचे तत्वज्ञान प्रचारास. मदत होते dr बाबासाहेब आंबेडकरांना पण हेच अपेक्षित होते की चांगले विचाराचे लोकच माझ्या या बुधाचे मार्ग पुढे घेवनू जातील. परत आपले फार मनपूर्वक आभारी आहे.Dr सर मी पण मरकळ येते 10 दिवस शिबीर केले आहे. 🌷🌷🌷🌷🌷
सर मी तुमच्या धर्माविषयिच्या तत्वज्ञानाशी पूर्णपणे सहमत आहे....भारत प्राचीन काळात बुद्धमयच होता....विषमता पासून सुटका प्राप्त करण्याचा भीम बाण इलाज म्हणजे बुद्धाला फॉलो करणे हेच आहे....मी आपल्याशी खुबच प्रेरित झालो आहे...मला उत्तम मार्ग दाखवला त्यासाठी खूब खूब आभार...!!! फक्त बुद्ध धम्म च असा मार्ग आहे ज्याने तलवारच्या जोरावर कधीच धम्माचा प्रसार केला नाही....कुठेही उत्खनन आज जरी केल तरी अवशेष बुद्धाचेच मिळत असतात....!!!!
डॉक्टर तुम्ही आणि ओशो यांनी मांडलेले बुद्धानं विषयक विचार मनावर ती फारच खोलवर परिणाम करून जातात बुद्धपौर्णिमेच्या तुम्हास आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा सर बौद्ध धर्मीय सोडून इतर धर्मातील लोक बुद्धांच्या विषय फारसे विचार मांडत नाहीत परंतु आपण त्यास अपवाद आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार
सर खूप सुंदर explain केलय तुम्ही. खूप छान 👌👌 Thank You ❤️ सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांच्या रुढी परंपरेचा चष्मा काढून बुद्ध समजून घेतला पाहिजे., तेव्हाच ही भारत भूमी शांततामय होईल आणि तेव्हाच खरा परम आनंद आपल्या भारतीयांना लाभेल. बुद्ध हा जाती धर्माचा विषय नाही, तर बुद्ध ही एक मानिसक स्तिथि आहे जिथून आपला स्वतः चा विकास आणि दुःख मुक्ती होत असते प्रत्येक मनुष्य बुद्ध होऊ शकतो, बुद्ध देखील बुद्ध होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतम होते त्यांनी ही अवस्था स्वतःच्या अभ्यासातून प्राप्त केली आणि दुःख मुक्त झाले., आणि तोच मार्ग सर्व सामान्य लोकांना दाखवला.
जय भिम, नमो बुद्धाय डॉक्टर साहेब, खूप छान शीर्षक दिलत, माझ्या भिमानं बुद्धाला पेरलं, पण त्या पेरलेल्या बुद्धाला आपण सर्वांनी बाबांच्या अपेक्षे प्रमाणे फुलवल का, याचे आपण सर्व बुद्धिजीवी बौद्ध बांधवांनी चिंतन करणे क्रमप्राप्त आहे.
Sir tumhi khup great aahat tumchi samjaun sangnyachi Kala ekdam sopi aahe khup khup aabhari aahot tumhi desha baher asun sudhha tumhala evhade desh prem aahe realy very nice sir god bless you
पाटील साहेब तुमचे व्हिडिओ मी 2019 पासून पाहत आहे जेव्हा covid सुरवात होती त्यात तुम्ही कोविड ची माहिती ,काळजी यावर व्हिडिओ टाकत होता तेंव्हा पासून मी आपला दर्शक आहे खूप काही शिकायला भेटत आहे तेव्हापासून खूप सकारात्मक बदल होत आहेत माज्या जीवनात तुकचे विश्लेषण ऐकून भारतात आलात तर भेटायला खूप आवडेल कृपया दर्शकांना निमंत्रित करावे
great work sir . आपले विचार मी आवर्जून या माध्यमातून ऐकत असतो . मी एक आपला चाहता आहे.आपल्या कार्याला सलाम . आपला हा विडीयो उत्तम आहे . परंतु........... गोयान्कांनी धम्म प्रचार केला हे मला पटत नाही. त्यांनी फार तर विपश्यना चा प्रचार केला हे म्हणता येईल . बाबासाहेबांनी क्रांतिकारी बुद्ध आपल्या भारतीयांना दिला आहे . तसेच विपश्यना आणि ध्यान साधना याला अवास्तव महत्व न देता बुद्धाचा स्वातंत्र्य .न्याय, समता आणि बंधुता यावर आधारित समाज निर्माण करणे यावर जोर दिला आहे . भारतात बुद्ध धम्माला विपश्यानेपासून खरा धोका आहे असे त्यांना वाटे . म्हणून बाबासाहेबांनी उघडे डोळे असलेला .चारिका करत असलेला बुद्ध स्वीकारला आहे . नमोबुद्धाय. जयभीम. जय शिवराय .