एक लक्षात ठेवा , आपले गुप्त सहसा कुणास सांगू नये,ते आपल्याशी ठेवावे,धोका होत नाही.कारण आपला जेवढा,आपल्यावर भरवसा आहे तेवढा कुणावर नसतो.आपणच आपल्याला सावरू शकतो.
तुम्ही एवढ्या सुंदर पध्दतीने म्हटली कि ज्याने ज्याने मैत्री तोडली त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही माझ्या आवडत्या कवितेपैकी हि तुमची कविता कायम लक्षात राहील
असा एक मित्र खरच असावा ...... पण आता मैत्री फक्त मतलबी येवढीच पाहीली मी....... पण तुमची कविता ऐकून बर्याच मित्र मैत्रीण चे मन आणि मत परिवर्तन व्हावे हीच ईच्छा.........
सर तुमचं ही कविता कितीही वेळा ऐकली तरीही मन भरत नाही. प्रत्येक वेळी एक नवीन अर्थ आणि प्रेरणा देऊन जाते ... हजारो वेळा ऐकून सुध्धा पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते.. रात्री झोपताना ऐकल्या नंतर नवीन ऊर्जा मिळते त्यामुळे कित्येकदा मी रात्रीचा शांततेत ही कविता ऐकते.... पण प्रत्येक वेळी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही... या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींची खूप आठवण येते ज्यांना मी भेटू शकत नाही किंवा contact करू शकत नाही. 😢
आभाळ जरी फाटलं, मी त्याला ठिगळ लावीन मित्रा, तुझ्या संकटात तुझ्या मागे नाही, तुझ्या पुढं धावीन.. मैत्री जगातील सर्वात सुंदर नाते असते. जिथे आपण आपले सर्व गुज सांगत असतो. मैत्रीत स्वार्थ चालत नाही. चांगल्या, वाईट सर्व प्रसंगी मदतीस धावून येणारे मित्र मिळणे नशीबवानालाच शक्य असते. माझी पन्नास वर्षांपासून मैत्री अबाधित आहे.
अनंत सर,मी तुम्हाला खुप खुप ऐकते.. तुम्हाला खुप खुप धन्यवाद देते.. म्हणुन मी तुमची कविता बनुन दुसऱ्या साठी कविता बनलेली आहे... वणव्यात ली कविता बनुन राहीलेले कार्य करत आहे... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर, ...
निस्वार्थ मैत्री मध्ये कालांतराने स्वार्थी पणा येवून दुरावली जाते. आर्थिक व्यवहार आडवे येतात. इगो, मोठेपणा, पैसा सर्वच दुरी पाडतात. 😮 जीवा भावाचे मित्र आता दुरापास्त झालेत.
मि पण एक जनाला मित्र मानल होत परंतु मला कोरोना झाला तेव्हा तो त्याच्या नातेवाईकांना भेटायला आल्यानंतर मला पण भेटला व मी त्याला दाळींब खायला सांगितले तर त्याने पैसे मागितले व द्याय लागल्यावर भिती पोटी घेतले नाही😢😢😢😢
हळव मन,कल्पना करत,त्यातून स्फूर्ती येते,मागोमाग प्रेरणा,मग प्रतिभा फुलते, अन नकळत मग कविता साकारते आणि तिला संगीताची साथ तिला जिवंत करते मग ती सुंदर गळ्याची कोमल स्वराची गायन कला.