मन सुन्न झाला आहे हे सगळं ऐकून .. लाईक द्यायची हिम्मतच होत नाही आहे.. सरकारपर्यंत हा आवाज नक्कीच पोहोचला पाहिजे ..आजचा लाइक हा मानाचा मुजरा आहे कोकणी माणसाच्या न तुटणाऱ्या कण्यासाठी .. नतमस्तक आहोत आम्ही
काय आहे ना आपण कष्ट, मेहनत करणारी शांत, संयमी, समाधानी आणि स्वाभिमानी माणसं आहोत. त्यामुळे आपण कोणावरही अवलंबून राहत नाही. किंवा सरकारी मदतीची वाटही पाहत नाही. आणि मीडियाची तर अपेक्षाच नाही. आपल्याकडच्या राजकारणी लोकांना "कोंकण" म्हणजे काय हे अजून कळलंच नाही. जशी मराठवाडा, विदर्भ यांसाठी योजना राबवतात ना तशी एखादी "कोकण समृद्धी योजना" राबविली गेली तरी कोकण अजून समृद्ध होईल. Love from Dapoli, Dist. Ratnagiri
*कोकणी आवाज जिंदाबाद !* *आवाज कोणाचा कोकणी माणसाचा !* *जर हा आवाज सरकारला ऐकू येत नसेल !* *तर लक्षात घ्या सत्ताधा-यानो हा परशुरामाचा अपमानच ठरेल !* *सत्ताधा-यानो कोणी कितीही म्हणो मी मी !* *जर दुर्लक्ष कराल तर हिसका दावील ही परशुरामभूमी !!* *🙏⚘⚘जय श्रीपरशुराम ! जय कोकण !🙏⚘⚘*
खरंच निःशब्द 🙏 मी जरी जन्मतः कोकणी नसले तरी मला कोकण बद्दल, कोकणी माणसाबद्दल खूप आदर आणि आपुलकी वाटते... प्रसाद म्हणतोय तस निश्चितच सगळ्यांनीच कोकण साठी आवाज उठवला पाहिजे 🙏 कोकणी माणसाच्या पाठीशी नाही तर खांद्याला खांदा लाऊन उभे राहिले पाहिजे... आपल कोकण नैसर्गिक दृष्ट्या, जैव विविधतेचे खूप समृद्ध आहे... हा निसर्ग आपण जपला पाहिजे. निसर्ग आहे तर माणसाचे अस्तित्व आहे 🙏 चला आपण सगळे मिळून कोकणचे निसर्गसौंदर्य टिकवू आणि कोकणी माणसाला ताठ मानेने जगायची उभारी देऊ ❤️🙏🙏 प्रसाद तुझ्या प्रयत्नांना सलाम.. खूप कमी लोकांना जमत अस प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढत राहणं.. 🙏🙏🙏 You are real hero of Kokan... Proud of you 💐
प्रसाद तू तुझ्या व्हिडीओच्या माध्यमातून खूप छान कोकण exposé करतो आणि तुझ्या अप्रतिम presention कोकणची जास्त ओढ लागते पण आता कोकणची अवस्था आणि कोकणी माणसाची दशा खूप वाईट आहे . काही वेळात कोकणीमाणूस या संकटातुन एकवेळ सावरले पण कोकणात येणार परप्रांतीयाच वादळ खूप भयंकर असेल
खरच दादा तुझे सर्व कोकण वर ओढवले हे संकट फार मोठ आहे तुमचा आवाज हया सरकारांनी जरी ऐकला नाही तरी हा सामान्य माणूस तुमच्या मागे निश्चितच उभा राहील धीर सोडू नका ज्याने हे संकट पाठवलं तोच तुम्हाला परत उभा करेल जय योगेश्वर
प्रसाद हे सर्व तूच करू शकतो ,बोलू शकतो...इतर कोणी नाही..ही तळमळ अजून कुठेही बघायला मिळाली नाही आणि मिळणारही नाही...ही तळमळ सर्व ठिकाणी पसरू दे ,समजू दे, सर्व महाराष्ट्राला....काय परिस्थिती चालली आहे...आपण कोकणी माणसांनी काहीतरी ठोस निर्णय घेण्याची आणि ते अवलंबण्याची आता काळाची गरज आहे.....👍👍
मित्रा तुझी कोकणा विषई तळमळ अगदी वाखाणण्याजोगी आहे ,शब्दांवर खूप छान प्रभुत्व, देवाने कोकण वाचवायला पाठवलेला एक देव दूत भासतोस मित्रा अभिमान आहे तुझा आम्हा कोकण कारांना धन्यवाद
प्रसाद, अतीशय योग्य शब्दात कोकण माणसाची व्यथा मांडलीस. ही व्यथा स्वार्थी पुढार्यांन पर्यंत पोचलीच पाहीजे. आणि महत्वाचा मालवणी माणूस मागे पडलो त्या कारणिभूत ' तो काय माका शिकयतलो. ' हे शब्द आसत. तूझे आभार आणि धन्यवाद. तूझो गाववालो एक सांगेलकर.
मी कोकणी आहे,मुंबईत रहाते, पाहून मन निशब्द आहेत,काय बोलाव, पण कोकणी माणूस लेचलेचा नाहीच,तो परत ताठ कण्याने उभा राहील हे नक्कीच, उभा राहो हीच देवाकडे प्रार्थना👌
दादा नक्कीच तुम्ही जो विषय मांडला तो बरोबर आहे . कोकण ही देव भुमीच आहे ...आणि निसर्ग संवर्धनाचा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा होता . निसर्गाच्या विरूद्ध जीवनपद्धती आणि मानवाची पैशा कमवतानाची संपलेली नैतीकता...हिच नैसर्गिक आपत्तीतला कारणीभूत आहे ...माणसाची हव्यासा वाढली की ईश्वराला निसर्गाच्या माध्यमातून त्याची जागा दाखवायला लागते...आज आंब्यांच्या व्यवसायात कुठं तरी कोकणी माणुस देव भुमीतील दैवत्व हारवताना पाहण्यास मिळत आहे कुठेतरी तो निसर्ग विरुद्ध आचरणाला तो प्राधान्य तर देत नव्हता ना याचा देखील विचार प्रत्येक कोकणी माणसांनी नक्कीच करायला हवा..! असो यातुन योग्य ती शिकवण घेऊन पुन्हा एकदा कोकणी माणुस या देवमुमीतील दैवत्वासहीत उभा रहावा हीच सदिच्छा..! आणि सरकारणे देखील मदतीचा हात नक्कीच पुढे करावा.🙏
खूप छान ... दुःख समोर नक्की उभं ठाकेल... लोकांच्या मनापर्यंत पोचेलच... एक नक्की कोकणी माणूस.. कधीही हतबल होत नाही.. आत्महत्येच्या मागे जात नाही.. जरी त्याच्या मदतीला कोणीही येत नाही.. तरी ताठ मानेने उभा राहतो..
मी नमन करतो कोकणी बांधवांच्या धैर्याला आणि नमन करतो त्या कांदळी तटरक्षक रूपी वृक्षांना ज्यांच्यामुळे आपण वाचले. मित्रा फारच मनाला चटका लावून गेला तुझा व्हिडिओ. कोकण कोकणनच राहिला पाहिजे, प्रदूषण होईल असे कुठलेही कार्य कोकणात व्हायला नको. मग ते माणसांचा का कारखाना उद्योगांच. फक्त स्थानिक लोकांचे व्यवसाय चालायला पाहिजे. आणि आपण खरं बोलला. सरकार आणि मीडिया हे कामापुरते मामा असतात. असो, जिस्का कोई नही उस्का खुदा है यारो. आपणच आत्मनिर्भर व्हायला पाहिजे यासाठी परमेश्वर आपणास शक्ती देवो. 🙏🙏
एवढ्या पोटतिडकीने वस्तुस्थिती मांडल्याबद्दल तुझे आभार. कोकणचे विदारक चित्र बघून मन सुन्न झाले. आता प्रत्येकाने कोकण वाचविणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी समजून काम केले पाहिजे 🙏🙏🙏🙏
नमस्कार प्रसाद 🙏 सर्वात प्रथम तू जे काही करत आहेस त्याला आमचा मनापासून सलाम 🙏♥️ गेले कित्येक दिवस तुझे व्हिडिओस आम्ही ही पाहत आहोत, पण कधी तुज्या सोबत बोललो नाही किंवा संवाद साधला नाही, आज ही विडिओ पाहल्या नंतर आमच्या मोबाईल च्या कीबोर्ड कडे हात आपोआप गेले आणि आमच्यानी रहावले नाही, तू जे आज तुज्या RU-vid Channel च्या माध्यमातून जे लोकांपर्यंत पोचवळस, जे काही दाखवल्यास, जसा बोललास, तुज्या आवाजात कोकणी माणसा साठी असलेली भावना, कळवळ, प्रेम, दया, आपुलकी, हेवा, माया हे सारं काही दिसून येत होतं, तुज्या हा धाडस पाहून ही विडिओ डाउनलोड करून "Magical कोकण" FB Page वर नक्कीच अपलोड करू, आणि इतर ग्रुप वर शेर करू.. अभिमान आहे कोकणी माणसाला तुज्या चांगल्या कार्य वर.. आपल्या सावंतवाडी कोकण चा एक छोटा कोकण कर... "Magical कोकण"
मित्रा तुझा आवाज आणि त्या आवाजातील भावना आमच्या काळजाला भिडतो आहे. देव करो अन असं संकट पुुन्हा न येवो . आपली जिद्द खरचं वाखाण्यायोग्य आहे आणि ती असायलाच हवी कारण शेवटी आपण कोकणची साधी पण राकटं माणसं आहोत.मोडुन पडला संसार तरी आपला कणा मोडणार नाही हा विश्वास आहे.आजच्या संकटामधे आणि ह्यापुढेही आम्ही आपल्या बरोबर आहोत .तुझ्या भावना लोकापर्यंत पोहचतीलच .फक्त एक विनंती आहे की सरकार आणि प्रसार माध्यमे इकडे लक्ष देतील तेव्हा देतील .तोपर्यंत आपणच आपलं घरटं एकत्र येवुन पुन्हा जोमाने बांधण्याचा प्रयत्न करु . कारण सरकार आणि प्रसारमाध्यमांना राजकारण आणि पैसाकारण ह्याच विषयामधे रस आहे त्यामुळे ते आपल्याकडे लवकर लक्ष देतील ह्याची शक्यता वाटत नाही . म्हणुन लोकसहभागातुनच एक चांगल नियोजन करा आजच्या सारख्या परीस्थीतीवर मात करण्यासाठी आणि कोकणाच्या शाश्वत विकासासाठी . आम्ही आपल्या सोबत आहोत आणि नेहमीच असु . ---- एक कोकणवेडा...
सलाम कोकणी माणसाला,इथे म्हणावस वाटत की करतय कोण व भरतय कोण. आम्ही जरी पुण्यात असलो तरी कोकण भुमी बद्धल मला स्वताला प्रचंड प्रेम व आपुलकी आहे.मी तुम्हाला हात जोडुन विनंती करते की परकीयांच्या आक्रमणा पासुन कोकण वाचवा व सरकार पर्यंत तुमचा आवाज पोचवा.
प्रसाद खरंच तुझा आवाज काळजाला भिडला. नक्की तुझा आवाज पोहचवायचा प्रयत्न करु. पण कोकणी माणूस शासनाची वाट बघायच्या आधी सावरायला पण लागला असेल. ताठ मनाने नाही म्हणणार हो पण ताठ कण्याने नक्कीच. सलाम आहे त्यांना. नक्कीच शासनाने भरपाई दिली पाहिजे.
बाळा सिंधुदुर्गातले उद्धव ठाकरे आहेत ना त्यांचे सरकार आहे ना त्यांनी न सांगता मदत केली पाहिजे आपण त्यांच्या पुढे हात पसरायचा नाही हाच आपला अभिमान आहे कोकणात माझं घर नाही पण मी कोकणाला माझं माझं सर्वस्व मानते कोकण माझा जीव आहे
खरंच आहे, सरकार, मिडिया कोणीही लक्ष देत नाहीत कोकणाकडे. ओरबाडण्याची संधी साधायला मात्र सगळे येतात. शहरी लोकांच्या हावेमुळे निसर्गाची जी हानी होत आहे त्याचे परिणाम मात्र कोकणाला भोगायची वेळ येते आहे. या व्हिडिओला लाईक देणं हा व्हिडिओ आवडला म्हणून नाही तर तुमच्या धैर्याला सलाम आहे, तुमच्यासाठी सदिच्छा आहेत.
आम्ही ठाणे, नवी मुंबईकर, मी सुद्धा समुद्र किनारी राहतो, भाई तू बोलतो ते खार आहे। जी कांही नुकसान भरपाई मिळते ती फक्त पश्चिम महाराष्ट्राला, मीडिया पण त्यांची बाजू उचलून धरते, तळ कोंकण व वरचे कोंकण ह्या दोघांकडे दुर्लक्ष केले जाते। आम्ही सर्व आगरी समाज तुमच्या पाठीशी हाव
अगदी खरय. दोन दिवस फारच वाईट गेले. बातम्या बघत होतो. ती वादळाची चित्र बघून जिवात जीव नव्हता. फोन्स लागत नव्हते. काल अचानक दुपारी ४ वाजता भावाने फोन केला परुळ्याहून आणि झालेल्या नुकसानाचं वर्णन केलं. अपार खंत दाटून आली मनात. खारं पाणी पार आंतपर्यंत आलं. आंबे, नारळ, सुपारी... बरच नुकसान झालं. स्थानिकांनी आता विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकत्र यायला हवय. कोकण -हासाला कारणीभूत असणारे मुद्दे, पुढे येवू घातलेले प्रश्न या सगळ्याचा एकत्र येऊन विचार करून ते सोडवण्याकरता स्टेप्स घ्यायला हव्यात. सर्व एका विचाराने एकत्र आले तर आडवं येण्याची कोणाची हिंमत आहे. आणि मुख्य म्हणजे आम्ही सर्व जे कोकणापासून लांब राहतोय पण मनाने कोकणाशी जोडलेले आहोत ते सदैव कोकणवासियांच्या पाठीशी आहोत. शेवटी ही देवभुमी आहे. प्राणापलिकडे जपायला हवी. आमचा कोकणी माणूस पुन्हा यातून ताठ उभा राहणार आणि कामाला लागणार याची पूर्ण खात्री आहे. या आमच्या जिव्हाळ्याच्या 'रानमाणसांना' आम्हा सर्वांचा सलाम.
माझ्याही मनातील भावना ह्याच आहेत,सरकार भुमिपुत्रा बाबत इतका उदासीन का आहे.आम्ही कुठेही राहत असू कोकण नाव जरी कानावर आले तरी अभिमान वाटतो,, सरकार मधे प्रामाणीक कोणीच नाही का ? फक्त राजकारण आणि पैसा,तेथील लोकप्रतिनिधी काय करतात,ते तर तिथलेच आहेत ना ? नसेल सरकारला जमत तर कोणीतरी प्रामाणीक व्यक्ती ने,संस्थेने ( तेच आता दुर्मिळ होत चाललेय 😞😔) आवाहन केले तरी सर्व सामान्य खुप मदत करतील.. या बाबतीत RSS खुप चांगलं व प्रामाणीक काम करते ,त्यांची शाखा अस्ल्यास संपर्क करावा असे मला वाटते.🙏
मित्रा कोकणावरचे आपत्ती व येऊ घातलेले प्रकल्प या विषयी कोकणी माणसाची व्यथा समर्पकपणे मांडलीस. मनाला भिडतो तुझा आवाज. सर्व कोकणी माणसांनी एकत्र यायला पाहिजे व एकमेकांना राजकारण बाजूला ठेवून मदत केली पाहिजे. एक व्हा व परप्रांतियांना तुमच्यावर अधिराज्य गाजायला देवू नका.
17 तास वेंगुर्ल्यात अनुभवले हे वादळ. खूप वाईट अनुभव होता. घराबाहेर पाऊल टाकायची हिंमत होत नव्हती. समुद्रकिनारीच्या माणसांनी या सर्वाला कोणत्या धैर्याने तोंड दिले असेल याचा विचारच करवत नाही. Hats off...🙏🙏
🙏🙏 खरं आहे कोकणाला कधीही कोणी मदत करत नाही तरीही मला अभिमान आहे की कोकणातील माणसे स्वाभिमानी आहेत एवढे असूनही कधीही आंदोलन नाही की कोणाकडे हातही पसरत नाही 🙏🙏
आम्ही कोकणातले नाही कोकण पाहीलेही नाही परंतू प्रचंड प्रेम वाटतं कोकणाबाबत! कोकणात ,कोकणी माणसाची श्रीमंती शहरातील दरिद्री विचारसरणी ला कळणार नाही. सरकारने जास्तीत जास्त मदत केली पाहीजे आणि तीसुद्धा लवकरात लवकर!🙏
मी कोल्हापूरात रहाणारा पण कोकणांविषयी खूपच आवड,कोकणी लोकांविषयी तर खूपच आदर व जवळीक कारण मी नोकरीच्या निमित्ताने कोकणात कुडाळ येथे चार वर्षे काढलीत.मी खूप माणसे जोडली फार प्रेमळ.पण आताच्या भयानक वादळामुळे क्षणार्धात होत्याच नव्हत झाले.अंगावर काटा आणणारे द्रश डोळ्यात पाणी आणणारे संकट.मिडीयावाल्यानी जागेवर जाऊन पहाणी करा राज्य व केंद्र शासनाला जागे करा.नुसतीच गुजरातला मदत नको तर आमच्या कोकणी माणसाना मदत करून त्यांचे झालेले नुकसान भरपाई देऊन पुन्हा नव्याने संसार ऊभे करून देणेस भाग पाडा.एवढीच माझी कळकळीची विनंती आहे.
आपल्या रायगड मधे ही खुप लोकांच नुकसान झालय, गेल्या वेलेला तर जास्तच नुकसान झालेल, ज्यांच नुकसान झालय त्यांना भरपाई मिळायला हवी, आता ह्या कठीण कालात किती गोष्टी सहन कराव्यात माणसांणी, कोकणातल्या माणसांच्या भावना सरकार पर्यंत पोचल्या पाहिजेत, आम्हाला जेवढ शक्य होईल तितक share करण्याचा प्रयत्न करू.
कुठलाही पक्ष कोकणाला साथ देणार नाही हे लक्षांत ठेवा. तुमच्यासाठी कुठलीही मराठी वृत्तपत्र, मराठी चॅनेल फंड उभारणार नाही. तेव्हा तुम्हीच एकत्र कायम राहण्याची गरज आहे. हि वादळं पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुमच्या डोक्यांतून गावठी जुगाड शोधा ज्यामुळे झाडं वाचवता येतील.
प्रसाद,तुझ्यासारखे बरेच प्रसाद निर्माण झाले पाहिजेत आणि होतीलच,सर्व जगाला माहित आहे निसर्ग आहे म्हणून आपण जिवंत आहोत या nature चे अस्तित्व संपले की आपणही संपलो ,प्रत्येक माणसात तुझ्यासारखा रांनमानुस खडबडून जागा झाला पाहिजे👍🏼👍🏼आपल्या कोकणातील कार्यकर्ते पण लक्ष घालतील, निसर्गा साठी आम्ही मदत करू🙏🙏
मी गोव्यात राहत असलो तरी माझं मूळ गाव सावंतवाडी जवळील हुमरस हे आहे. आपण जे आजच्या व्हिडियोत मांडलंय ते निखालस सत्य आहे. आपल्या हिम्मतीस व कोकणावरील निरलस प्रेमास सलाम.
बाळ,तुझं बोलणं ऐकून मला खूप खूप दुःख झाले .होय ,मी तुम्हा सगळ्यांच्या पाठिशी आहे . हाच आवाज पंतप्रधानापर्यं पोहचलाच पाहिजे . कोकण वासीयांचे दुःख ते माझे दुःख.ं
येवा कोकण आपलाच आसा 🌴 आशी नेहमी सुरवात करून लोकांना कोकणात येण्याचं आव्हान करणारा मी.प्रत्येक विडिओ मध्ये तूझ्या भारदस्त आवाजाची सुरवात असणारा पण आजच्या व्हिडीओत तुझं आवाज तसाच आहे पण त्यात सरकारला घातलेली आर्तसाद मन हेलावून टाकणारी आहे. 🌴🥭
कमाल आहे खरंच. तुमच्या निर्धाला सलाम. परमेश्वर नक्की न्याय करेल. निसर्ग परमेश्वराच्या रुपाने उभा आहे. काळजी करू नका.आम्ही आहोत. नक्की बाहेर याल.हे ही.दिवस जातील.
खरंय दादा मी गेल्या वर्षी अनुभवलं आहे जेव्हा निसर्ग वादळ आले होते तेव्हा आम्ही मरणाच्या दारात उभे होतो इतकं भयानक वादळ होते आमच्या समोर लोखंडाचे लाईट चे पोल अक्षरशः वाकडे तिकडे होऊन पडले होते,सगळीकडे पाणीच पाणी आणि आमच्या डोळ्यासमोर काजू आंबा फणस कोकम असे झाडांची अगदी राखरांगोळी झाली होती,वार तर इतकं भयान होते की आम्ही सगळे घरातील मंडळी एकमेकांना धरून बसलो होतो तरी वारे आम्हाला जोरात ओढत होते . उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी असे वादळ पाहीले कारण मी मराठवाड्यातील असल्याने मला याचा अनुभव नव्हता,तब्बल एक महिना लाईट नव्हती आणि दुर्दैव असे की कोणत्याही न्युज चॅनलवर ही बातमी नव्हती फक्त मोठ्या शहरांचे नाव आणि नुकसान दाखवले छोट्या गावात कोणी फीरकले ही नाही... खरंच इकडे सरकारचे खुप दुर्लक्ष आहे किती तरी गावं अशी आहेत जेथे भर पावसात नदीतून जावे लागते,कुठलीच सुखसुविधा नाही पाणी दवाखाना काही नाही तरी कोकणी माणूस खंबीर पणे उभा राहतो कधीच कांगावा करत नाही पण आता गरज आहे जागे होण्याची,त्या शिवाय कोकणाची प्रगती नाही,निसर्गाने भरभरून दिले ... या देव भुमीला इथल्या माणसांना 🙏🙏 वादळाचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत अजुन अंगावर शहारे येतात...
फारच सुंदर पणे कोकणातील वादळामुळे झालेली वाताहात पाहुन मन सुन्न झाले.कोणत्याहि चॅनल वर अशी दृष पाहावयास मिळाली नाही 🙏 कोंकणातील लोकांनचे झाले नुकसान यां बाबतीत तुझी तगमग हि पाहुन आम्हा सर्वांनचा तुला तु करत असलेल्या कार्यास पुर्ण पाठिंबा आहे 👍 👍👍👍👍
कोकण, रायगड मधील आणि जिथे जिथे वादळामुळे नुकसान झालं आहे त्या आमच्या प्रत्येक कोकणी माणसाला नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. प्रत्येक नैसर्गिक आपत्ती च्या वेळी आमचा कोकणी माणूस या गोष्टीपासून वंचित राहिला आहे
मी स्वतः जाऊन घुले मॅडम स्वामींनी बचतगट कांदळवन सफारी केली आहे.खुप सुंदर आहे.. खरंच कांदळवन संवर्धन गरजेचे आहे.आज वादळ पासून आपलं संरक्षण केले आहे..आपलं कोकण🙏
अप्रतिम मित्रा , तुझा बुलंद आवाज सरकार पर्यंत पोचणारच , कोकणाप्रती असलेला असीम प्रेम पाहून तुला सलाम. मित्रा प्रेम ही एक शक्ति आहे आणि हीच शक्ति तुला यशाच्या शिखरावर नेईल यात शंका नाही . तमाम कोकण प्रेमी तुझ्या पाठीशी आहेत.ईश्वर तुला चांगले कार्य करायला शक्ति व उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .Go at the top. इतर सर्वच videos तुझे खुप सुंदर असतात.
अप्रतिम बोललास भावा आणि खर बोललास. कोकण भागाला खूप मागे ठेवलाय या नेते लोकानी. नारायण राणे साहेब आहेत म्हणुन थोडा तरी लक्ष दिला जातोय कोकणात. नाहीतर एवढा पण लक्ष दिला नसता या लोकांनी... #save konkan......🤟
I am absolutely speechless, stunned, nonplussed. Kokan needs to be saved, cared for and fortified from the onslaught of outsiders and industrialisation. Kokan was and should always be a natural paradise.
खरच....निशब्द .....मी.सचिन कुलकर्णी ...जन्माने जरी कोकणी नसलो तरी माझ्या या कोकणी भावंडांच्या यातना.मी समजू शकतो......कोकण व कोकणी माणसाने तिधल्या निसर्गाने सतत दोन्ही हाताने आपल्याला दिलेलेच आहे.....आता आपली वेळ आहे आपल्या भावंडांच्या साठी काहीतरी करण्याची ....प्रसाद भावा....तु करत असलेल्या चांगल्या कामात मी नेहमी तुझ्या सोबत आहे...आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून गरजूना (मदत)। उभे राहण्याची उमेद देऊयात......धन्यवाद..सचिन कुलकर्णी ...🙏🙏
मी तुळस vengurla येथील आहे Gava गावातून सर्वानी एकत्र येवून सरकारकडे नुकसानभरपाई मागितली पाहिजे कारण घाटावरील लोकाना सरकार लगेच मदत देतात तेव्हा आवाज उठविला पाहिजे
हा आवाज आम्ही नक्कीच सरकार पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू खरंच आज आपल्या कोकणी बांधवाना सरकारची आर्थिक मदतीची गरज आहे. आलेल्या वादळाच्या वेळी आम्ही मुंबईला होतो शरीराने पण मनाने कधीच गाव गाठले होते . कोकणी माणूस ताट आहे.तो कोणापुढे झुकणार नाही कारण स्वाभिमान त्याच्या रक्तात भिनलेले आहे.
कोकणाला आणि कोकणी माणसाला मनापासून सलाम.... माझं मूळ गाव कोकण (देवगड), पण माझी पिढी कोकणापासून दूर झाली होती... आज खडकन डोळे उघडले आणि चूक जाणवली... मनापासून दिलगीरी आणि सलाम 🙏
कोकणातील कोकणी माणसाने संबळून राहवे आणिनवी मुंबई आणि मुंबई सारखा सिमेंट काँक्रिट चा जंगल कोकणाला बनवू नका निसर्ग रम्य कोकणाला वाचवा आता आलेल्या वादला तुम्हाला सावधान केलेआहे आणि त्या वादला पासून शिका महाराष्ट्र तील मराठी नेत्या पासून पण सावधान राहा जो पर्यंत तुम्ही कोकणा मध्ये कोकणी लोक जास्त आहेत तो पर्यंत महाराष्ट्रातील मराठी नेते तुमचे पाय धरतील एकदा का तुम्ही कमी झालात का त्यांना तुमची गरज राहणार नाही जशी मुंबई मध्ये मराठी लोकांची झाली आहे तसी पर प्रांतीय लोकांना दलाला मार्फत बहुमोल जमिनी विकू नका फल फळांची लागवड करून लाखो करोडो रुपये कमवा नवीन मुंबई गोवा रोड झाला आहे तो काय कोकणी लोकांच्या भल्या साठी नाही आणि कोकण रेल्वे पण कोकणी लोकांच्या भल्या साठी नाही या दोन्ही सुविधे मुले कोकणात पर प्रांतीय लोकांची वाड होणार कोकणी लोकांनी सावधान रात्र वैऱ्याची आहे जर तुम्ही याच्यातून सावरले नाहीत तर याचा पस्तावा तुम्हाला येणाऱ्या तीस वर्षा नंतर येईल
प्रसाद खूप वाईट वाटले हे सर्व बघून आपण खूप चांगल्या पद्धतीने हे सर्व दाखविले आहे खरोखरच हा आवाज राज्यकरत्यपर्यंत पोहचवणे प्रत्यकाचे कर्तव्य आहे. परमेश्वर नक्कीच आपल्या कोकणातील माणसाच्या पाठी उभा राहील.
अरे बापरे फार भयानक आहे. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. प्रसाद तुझ्यातल्या सच्चा रानमाणसाला मनापासून नमस्कार. 🙏 मी तुझा हा व्हिडीओ फेसबुक वर नक्की शेअर करणार आहे
तुम्ही व्यक्त केलेल्या भावना निश्चितच मन हेलावणारी आहेत. ग्रामीण भागाची हीच तर खरी व्यथा आहे आम्ही पालघर वासी आहोत आमचे दुःख हेच आहे गेले चार दिवस आमच्याकडे लाईट नाही कुठलेही राजकारणी माणसं किंवा मीडिया आमच्या गावापर्यंत आलेले नाहीतजे काही आमच्याकडे नुकसान झालेले आहे ते पाहणारे आणि दाखवणारे कोणीही नाही परंतु आम्ही आपल्या सोबत आहोत
प्रसाद,आजचं तुझं बोलणं आतून होतं आणि व्यवस्थेवर मार्मिक बोट ठेवणारं होतं. मित्रा, आम्ही सगळे आहोत आमच्या सर्व कोकणवाशियांबरोबर. आमच्याकडून काही होण्यासारखं असेल तर आम्ही ते नक्की करु. आम्हाला सांग. कोकणवाशियांचा कणा नेहमी ताठ असतोच, तो यापुढेही ताठ राहील, नक्की राहील. 🚩 जय शिवराय 🚩
खरच रे दादा कोकणी मानून खूप सोशिक आहे म्हणूनच सगळे त्याचा फायदा घेतात. तुझी आर्त हाक आणि तुझा आवाज नक्कीच पोहचेल .आता तरी सरकारने कोकणाकडे लक्ष द्यायला हवे .की फक्त आत्महत्या करणारे शेतकरीच दिसतात त्यांना. आमचा कोकणी मानून कधी रडत बसत नाही की उगाचच फुशारक्या मारत नाही .कोणत्याही परिस्थितीत तो लढतो आणि उभा राहतोच.
खरच पर्यावरण रक्षण किती गरजेच आहे.कोकणी माणुस स्वाभिमानी आहे.पण आता हे संकट आम्ही सर्वत्र पोहचवू.मी कोकणी असल्याचा मला अभिमान आहे.मी ही तुमच्या बरौबर आहे.
खरच सांगतो भावा मी खुप गरीब अाहे, नाहीतर खरच खुप मदत केली असती, हे सर्व सहन होत नाही, महणून गरीबीतुन क्षीमंता कडे जाण्याचा प्रयत्न करतोय ... शिवाजी महाराजांच्या विचाराने अापण सर्व एकत्र येऊन सर्व ठिक करू ....