#BolBhidu #VidhansabhaElectionMaharashtra #MahaVikasAghadi
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. निवडणूक आयोगानं अद्याप विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. मात्र सगळ्याच पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जातेय. जागावाटपाबाबत विविध फॉर्म्युले ठरवले जात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रत्येकी तीन पक्ष असल्याने दोन्ही बाजूला जागावाटपाचा तिढा निर्माण झालाय. यावरून मित्रपक्षांमध्ये धुसफूस बघायला मिळतेय. दावे प्रतिदावे केले जातायंत. अशात २५ आणि २६ ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. सलग दोन दिवस चाललेल्या या बैठकीत मुंबईतल्या ३६ जागांबाबत चर्चा झाली. पण या जागांवर अंतिम तोडगा निघाला नाही.
महाविकास आघाडीत मुंबईतल्या जवळपास १६ जागांवर संघर्ष असल्याची माहिती आहे. या १६ जागांवर कुठे दोन तर कुठे तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. मुंबईतला जागा वाटपाचा तिढा सुटल्याशिवाय उर्वरित महाराष्ट्रातल्या जागांबाबत चर्चा होणार नाही, अशी भूमिका मविआच्या नेत्यांनी घेतलीय. त्यामुळे जागावाटपाचा पेच आणखी वाढलाय. आता मुंबईतलं हे जागावाटप महाविकास आघाडीच्या फुटीचं कारण ठरू शकतं, अशाही चर्चा रंगल्या आहेत. मुंबईचं जागावाटप मविआ फुटण्याचं कारण का ठरू शकतं? आजवर इथला जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा राहिलाय? आता कोण किती जागांवर दावा सांगतंय? तिन्ही पक्षांना मुंबई इतकी महत्त्वाची का वाटतीये? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
13 сен 2024