संत मुक्ताबाई अभंग 14
-------------------------------
amzn.to/2QpFJFm
शून्यापरते पाही ।
तंव शून्य तेही नाही.।
पाहते पाहोनि ।
ठायी ठेवियले.।।१।।
कैसागे माये हा तारकु दिवटा
पंढरी वैकुंठा प्रगटला ।।२।।
न कळे याची गती ।
आदि मध्य अंती।
येथे श्रुति नेति नेति प्रगटल्या
मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम
शून्हाही शून्य सम शेजबाजे ।।४।।
अर्थ :- प्रथम मनुष्याने आदि
शून्याकडेच पाहिले पाहिजे.
मग मन,बुद्धी, चिंत, इंद्रिय,
हे शून्य शून्य होत जातात,
मात्र तो भगवान शून्यही नाही
भगवान हाच जगाचे तारण करणारा आहे,तो वैकुंठा मधून या देहरुपी पंढरी क्षेत्रा
मध्ये आला आहे,
त्याचे स्वरुप कुणालाच कळलेले नाही,तो आदि,आति, मध्ये अंती.तोच
आहे,तो वेद श्रुतिलाही कळलेला नाही,
हा विठ्ठल सप्रेम आहे पण
या मनुष्याला. हा मनुष्याला
संभ्रमांत टाकणारा आहे, माय आपला निर्धार पक्का
आसायला पाहिजे आसे आई
साहेब म्हणतात.
15 окт 2024