संत रामदासांनीसुंदरच विचार सांगितलेय, माझ्या मते इतरांच्या सुख..दुःखात सहभागी झालो तर दुसरी व्यक्ती आनदी होते, एव्हडे प्रत्येकाने जाणले तरी पुष्कळ आहे.मुळात घरातच प्रथम संस्कार चांगले व्हावेत. श्री संत रामदास अव्दितीयच होते!
दैनंदिन जीवनात आई बाबा आणि गुरू, मोठ्या व्यक्ती यांच्याबद्दल कमालीचा आदर व नम्रता पूर्वक जीवन जगणे. लहान व्यक्तीबद्दल दया भाव प्रेमळपणा असणे. हे एक चांगले लक्षण आहे. बेस्ट व्हिडिओ useful information
मला जाणवलेल 4 चातुर्य लक्षण.वरुणजी तुम्ही ज्ञानेश्वर माऊली चा अभिनय फार छान केला.मला हि मालिका बघण्याची सवय माझ्या वडिलांमुळे लागली ते माझ्या कडे रहायला आले होते ते सात वाजले की सांगयचे ज्ञानेश्वर माऊली सिरीयल लाव.जय जय रघुवीर समर्थ
Mi dasbodh ha grant anek vela vachala aahe.khuo chhan aahe.tyatil ek shlok brahman murkh asala tari to vandaniy aahe fakt ha shlok sodala tar baaki granth vyavaharik jivanat anukarniy aahe.aani mi roj ha granth vachto.
जय जय रघुवीर समर्थ 🙏 चातुर्य लक्षणावर खूप छान विवेचन केलंत. जिथे खरंच गरज होती तिथे छान लहान गोष्टी सांगून ते पटवून दिलत. अजय आणि रोहित ची गोष्टही फार छान होती. खूप छान video आहे, सारांश पण उत्तम आहे. एक प्रश्न मुर्ख लक्षणं आणि चातुर्य लक्षणं दोन्हीचे videos खूप उत्तम आहेत तुमचे, पण तुम्ही 13 च का निवडले 😜? पाचवं लक्षणं तुम्ही सांगितलंय दुसऱ्याची मदत करण्याबाबत , छान explain केलंत पण कधी कधी अडचण घेऊन येणाऱ्या माणसांना त्याची सवय होते. आपला मदत करण्याचा स्वभाव असल्यामुळे आपल्याला ती करावीशी वाटते, पण आपल्या कामावर सुद्धा त्याचा effect होतो ना ?Office मध्ये most of time हे face करावा लागलं. कधी बोलते माझ काम झाल की करते help ते पण ok म्हणून निघून जातात पण नंतर वाईट वाटतं राहतं . पण अशावेळी थोडा strong stand पण घ्यायला हवा ना?
१३ गोष्टी. 🤭😀. विशेष कारण नाही. 😀 आता तुमच्या प्रश्नाकडे येऊ. हो, नक्कीच दुसऱ्याला मदत करावी. हे घडणं अगदीच स्वाभाविक आहे की एका वेळी काम, मदत अशा दोन्ही गोष्टी येतात. आपल्यालाही आपलं काम वेळेत सबमिट करायचं असतं. अशावेळी कोणती गोष्ट अर्जंट आहे त्याला आपण प्रायोरिटी देऊ शकतो. महत्त्वाच्या तर दोन्ही गोष्टी असतात. आपलं कामही, दुसऱ्याला मदतही. पण यात प्रायोरिटी अर्जंट आणि इम्पॉर्टंट नुसार लावायची. म्हणजेच इम्पॉर्टंट दोन्ही गोष्टी आहेत ना हे आधी ठरवायचं. त्याचं उत्तर हो असं मिळालं तर आपल्याला दोन्ही गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. पण मग आधी कोणतं काम करायचं आणि नंतर कोणतं हे परिस्थितीनुरूप आपण ठरवू शकतो. म्हणजेच अर्जंट काय आहे हे ठरवता येतं. त्यानुसार वागायचं. हां, आता वाईट वाटायचं झालं तर कोणाला कशावरूनही वाईट वाटू शकतं. पण इथे विवेक बुद्धी मदतीला धावून येऊ शकते. नाही का? मला वाटतं आपल्या प्रश्नाचं थोडं तरी समाधान झालं असावं.
@@varunbhagwatथोड नाही पूर्ण समाधान झालं. लक्षातच आली नाही ही गोष्ट, खरंच कामाचं importance ओळखून त्यानुसार priorty दिली पाहिजे. आणि priorty कोणत्या कामाला द्यायची हे जर आपण आणि आपलं मन ठरवत असेल तर मनाला वाईट वाटून घ्यायचा प्रश्न पण येणार नाही. खूप खूप धन्यवाद. खूप छान solution दिलत तेही अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत ☺️☺️. आणि sorry, तसदीबद्दल 🙏🙏🙏. माझा एक वाईट nature आहे एखाद्या प्रश्नाच उत्तर नाही सापडला तर ते मिळे पर्यंत चैन पडत नाही मला तोच प्रश्न डोक्यात घोळत राहतो. पुन्हा एकदा खरंच Thank you 🙏🙏🙏