नमस्कार श्री आफळे आपण जे निद्रिस्त हिंदू धर्माला ,इतिहासात असलेली सणसणीत आणि सत्य उदाहरणें देऊन जागवण्यासाठी जे प्रयत्न करत आहात,त्याला खरंच यश येवो,ही परमेश्वरा जवळ खूप मनापासून प्रार्थना💐
आपली किर्तने मनोबोधक असतातच शिवाय त्यामधील गिते शास्त्रोक्त असलेने मी रोज देव पुजेवेळी ऐकतो.अंधश्रध्देला वाव नसतो त्यामुळे पुन्हा ऐकायला कंटाळा येत नाही.मी माझ्या विचारांशी जुळणार्या मित्रांना पाठवत असलेने मैत्री बळकट झाली आहे.उदासिनता देखील कमी होत जाते.आपणास धन्यवाद द्यावेत तेव्हढे थोडे होतील.
रामकृष्णहरि ! जय श्रीराम समर्थ सद्गुरू कीं जय ! श्रीराम जयराम जय जय राम ! असे सुंदर कथा कीर्तन नेहमी झाले पाहिजे ! आताच्या काळात तरूणांना ते ख-या अर्थाने समजले पाहिजे ..! जय वासुदेव भगवान !
ब्रह्म अर्थात संपूर्ण सर्वांगीण ज्ञान प्राप्त करणे व प्राप्त केलेले ज्ञान जिज्ञासूंना मनापासून देणे हे ब्राह्मणवर्णाचे लक्षण आहे. हे लक्षण नसेल तर तेथे ब्राह्मणत्व नाही. आणि जेथे कुठे असेल तर तो/ती आणि कोणीही सदैव आदरणीय आहेत... या मूळ सनातन वैदिक ब्राह्मणत्वाच्या व्याख्येला मनात धारण केले तर विद्वान् सर्वत्र पूज्यते। हे होणारच. अशाच प्रकारे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या व्याख्या व लक्षणे पाहिली तर कळते की राष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्येकाचे केवढे महत्त्वाचे स्थान, योगदान आहे. सारे मिळून जगन्नाथाचा रथ ओढू. ज्ञान मोठे आहे म्हणून ज्ञानी माणसाचा मोठेपणा आहे, इतकेच...
The patriotic kirtans are excellent. To inculcate patriotrism in Indians, request tat the sub titles be given in all languages to have a wider coverage.
महाराज आपण जे कीर्तन कर्णावर केले त्यावर मी सहमत नाही , तुम्ही जाणून बुजून कर्णवर केलेल्या कीर्तनाचा व्हिडिओ वरच्या कॉमेंट्स ऑफ केल्या आहेत , माझ्या पेक्षा जास्त अभ्यास तुमचा आहे , आपण कर्णसाठी वदलेले कटू वचन मला पटले नाहीत , मला तुम्ही ते कुठून वाचले ते क्रॉस चेक करायचे आहेत , मला मार्गदर्शन करावे , कारण लहानपणापासून कर्णाच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत ज्याच्यावरून कर्ण महान आहे या वर विश्वास बसतो , तुमच्या कर्णवरच्या कीर्तने मला confusion होत आहेत , तुम्ही सांगितलेल्या माहितीचा संदर्भ द्या
पहिल्या दिवशी आफळे बुवा नी सांगितले कि व्यासां नी लिहिलेल्या महाभारत वर ते व्याख्या करीत आहेत. तुम्ही कर्णा वर लिहिलेली कादंबरी वाचली असेल. व्यास कौरव आणि पांडवांचे आजोबा होते आणि महाभारत त्यांच्या समोर घडली होती।