सर माझ्या जमिनीतून पाण्याचा ओढा नकाशा मधे नाही व दुसऱ्याच्या शेतात आहे व माझ्या 7/12 उताऱ्यात पोट खराब जमीन नसून दुसऱ्याच्या उताऱ्यात 24 गुंठे पोट खराब आहे आणि पाण्याचा ओढा माझ्या जमिनीत काढून दिला आहे याला 20 वरशे झाली तर मला काय करावे लागेल कृपया मार्गर्शन करावे
फार उशीर झाला आहे असे दिसते. यात मोजणी करून खात्री करून नकाशात मूळ ज्या सर्वे नंबर/गट नंबर मध्ये आहे याची खात्री भूमी अभिलेख विभाग करू शकेल. तो पुन्हा शेजारच्या जमिनीत वळवून लावणे यासाठी मात्र कोर्टात जावे लागेल.
एका शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे पण दुसऱ्या बाजूने तो रस्ता पाहिचेन म्हणून कलम 1966 143 नुसार तहसीलदार कडे अर्ज केलता पण तहसीलदार तो नामंजूर केलता पण त्याने अजून 1 वर्षानंतर 1906 कलम वापरून अर्ज केला आहे तहसीलदार कडे. तर मला काय करावे लागेल? रस्ता ची गरज नसताना तो अर्ज करतो आमाला परेशान करतो. माझे वडील आजारी असल्यामुळे प्रत्येक तारखेला तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही. प्लीज मला मदत करता का. मला काय करावे काय समजत नाही.
तारखा पडतील तेव्हा हजर राहणे तुमचे हिताचे ठरेल. नाहीतर तुमच्या अपरोक्ष चुकीचा निर्णय झाल्यास आणखी त्रास वाढेल. तुम्ही फक्त कलम १४३ च अर्ज नकरलेला आहे, सद्या रस्ता उपलब्ध आहे. असे असताना नवीन रस्ता देण्याची तरतूद मामलेदार कोर्ट अकट मध्ये नाही असे लेखी म्हणणे, व पुरावे जोडून सादर करून पोच घेऊन ठेवा. व त्यांचा अर्ज फेटाळण्याची विनंती करा.
सर गटला लागुन 33फु रस्ता आहे तो मनतो की माझा जुना रस्ता आहे आमची जमीन 13वषा पासुन पडीत आहे त्याने 7.12.रस्ताची नोद केली 10.वषा आगोदर करून घेतली. त्याचा गटाला लागु रस्ता आहे 33फु आता काय करावे
Sir ,me art 143 ne arj kela ahe pn mala jethun rasta hava ahe thithe chultyachi padleli juni Ghar ahe pn tya jagechi purn vahiwat mazi ahe .ti padlelei ghare kadlyshivai mala shetat jata anar nahi shivay maza gothahi ahe thithe thethil shenkhat mala dusrya shetat neta at nahi Ani juna Jo rasta hota tya jamini vikri jhali ahe v sarkari mojni jhali ahe tar mala rasta bhetel ka art 143 ne upyog hoel ka.
सर, मामलातदार कोर्ट ऍक्ट नुसार आमच्या वाटेवरील अडथळा तहसीलदार यांच्या आदेशाने दूर केला आहे परंतु प्रतिवादी स्थागिती साठी न्यायालयात अर्ज केला आहे. रस्ता सुरु झाल्यावर न्यायालय स्थागिती देईल का?
तुम्हीं न्यायालयात पण तुमचे म्हणणे आणि पुरावा सादर करावा व काही प्रतिकूल आदेश होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाला उपलब्ध legal remedies घेण्याचा अधिकार असल्याने प्रतिवादी त्यांना आवश्यक वाटतात त्या legal remedies try करतील. आता वाद म्हटला की आपण आपले हितारक्षणासाठी सजग राहून बचाव केला पाहिजे.
नमस्कार सर , मा. तहसीलदार साहेबांनी मामलेदार कोर्ट act 1906 कलम 5(2) नुसार माझ्या 2 गूँठे जमिनीतून रस्ता देण्यात यावा असे आदेश काढले आहेत, त्यात माझी अर्धा गूँठे जमीन जात आहे, तरी सदर आदेशाला कुठे आवाहन देता येईल. कृपया आपले मार्गदर्शन मिळावे सर 🙏
तहसीलदार यांनी स्थळ पाहणी न करता , समोरील संबधित शेतकऱ्यांसाठी नोटीस नाही काढता मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पंचनाम्यावर तहसीलदार किंवा नायब तहसिलदार अधिनियम कोर्ट 5 लागू करू शकतात का?अस आमच्या अर्धापूर नांदेड तहसील कार्यालयात केले आहे..माहिती हवी सर..
मामलेदार कोर्ट ने आदेश केल्यावर ,दिवाणी न्यायालयात दावा करून अंतीम निर्णय साठी प्रतिवादी यांना रस्त्याबाबत पुरावा सादर करावा लागतो का साहेब .मामलेदार यांचा आदेश कायम राहण्यासाठी.माहिती सांगा साहेब
सर प्रकरण १४३ च आहे नोटीसा १९६६ नुसार बजावण्यात आल्या व निर्णय १४३ नुसार देण्यात आला फेरचौकशीत नजरी नकाशा काढून पर्यायी रस्ता दाखवला व निर्णय देताना मामलेदार अधीनीयमन १९०६ कलम ५ नुसार निर्णय पारीत केला व बांधावरून दोन्ही बाजूने एक एक चाकोरी रस्ता द्या तर सर या निर्णयाला विरोधात मी काय करू शकतो?
खरे तर कलम १४३ चे आदेशावर मामलेदार कोर्ट खाली रीव्हिजन करता येत नाही. Regular .... SDO kade पहिले अपील, additional collector कडे दुसरे अपील, अगदीच आवश्यक असल्यास अपर आयुक्त यांचेकडे रिव्हिजन अर्ज, व शेवटी उच्च न्यायालय असा रिमेडी मार्ग आहे. मधेच मामलेदार कोर्ट ची ऑर्डर योग्य तर ठरत नाही, पण वाचल्याशिवाय कळणार नाही. जवळचे वकिलांना कागदपत्र दाखवून चर्चा करा.
सर खुपचं चांगली माहिती देता.. एखाद्या शेतकरीच्या शेतातुन अवैध रस्ता असेल तर तो बंद करता येतो का.गेल्या तीस चाळीस वर्षांपासून रस्ता चालु आहे.पण तो नकाशावर लगतच्या गटातुन आहे.आम्ही मोजणी केली असता शेजारी म्हणतात तो तुमच्या गटातुन आहे. यावर उपाय काय आहे सर
अवैध रस्ता इतके दिवस का चालू दिला तुमच्या शेतातून.......तुम्हाला सर्व जूने अभिलेख शोधून ते सिद्ध करावे लागेल की रस्ता तुमच्या शेतातून नव्हता. हा दिवाणी स्वरूपाचा वाद होईल जर इतका जुना असेल तर.
सर मी शिव रस्त्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली होती पण ती कलम 1966 चे अनवे 143 याप्रमाणे मागणी केली होती पण त्यांनी ती स्वीकारली नाही अर्ज नामंजूर केला सर मी आता कलम 1906 चे आणि पाच याप्रमाणे तहसीलदार यांच्याकडे नवीन अर्ज करू शकतो शिव रसता मागणी करू शकतो का प्लीज उत्तर द्या
नाही, जर अस्तित्वातील वहिवाट रस्ता कुनिनादावला तर १९०६ च्यां मामलेदार कोर्ट कायदा प्रमाणे अर्ज करता येतो. तुम्ही रस्ताच उपलब्ध नाही म्हणून बांधावरून रस्ता मागितला आणि तो नाकारलं असेल तर त्यावर अपील करा.
Sir नंबर बांधा ने रस्ता देण्यास झाल तर लगतच्या नंबर बांध व आपला नंबर बांध यांच्या मधोमध देता येतो का आपल्याच बांधाने देता येतो plz लवकर कळवा आमच्याकडे मारामारी झालीय
बरोबर दोन जमिनीच्या मधल्या बांधावरून रस्ता दिला जातो आणि बरोबर बांधाच्या मधून रस्ता आणि दोन्ही बाजूने सारखीच रुंदी ठेवली जाते म्हणजे दोन्ही बाजूने सम समान जमीन रस्त्यासाठी वापरात येते. एकाच बाजूने नाही.
सर आमच्या नंबर मध्ये एक रस्ता शेतीमधून 300 मीटर अस्तित्वात असून पुढच्या नंबर मध्ये तो एका व्यक्तीने अडवला असल्याने बाकी लोक सर्वे नंबर वरून परत रस्ता मागत असल्यास काय करावे अथवा एका गट नंबर मधून दोन रस्ते होऊ शकतात का
पुढे जो अडवला आहे ते अतिक्रमण काढणे हे व तोच रस्ता वापरणे जास्त कायदेशीर ठरेल. असे किती रास्ते देणार एकाच जमिनीतून .. हे तहसीलदार यांना समक्ष शेतात आणून दाखवा
मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 5/2 अन्वे निकाल माझ्यासारखा झाला आहे तरीपण रस्ता खुला झालेला नाही तसेच प्रतिवादीने दिवाणी कोर्टात दावा दाखल केलेला आहे त्यावर जसे ते परिस्थिती ठेवण्यात आलेली आहे माननीय तहसीलदार साहेब यांनी पोलीस मदतीचा नोटीस दिलेले आहे तरी रस्ता मला मिळेल का
वादी हा असा दावा करत आहे की तो रस्ता माझ्या खरेदीचा आहे त्याने तो 2000 सालि अर्धवट खरेदी केला आहे तरी शेवट तहसीलदार साहेब यांनी दोन तारीख ला त्या वादी ला बोलवले होते त्यांनी सही केली आहे तरी त्याच्या बाजूने stetas kqo दिला आहे मग काय करावे
सर आम्हाला रस्त्या संदर्भात दिवाणी न्यायालयामध्ये एक्झिट पाच खाली निकाल भेटला आहे तरी वादीने जिल्हा न्यायालय मध्ये एमसीए दाखल केला आहे तरीही दिवाणी न्यायालय मध्ये केस चालू आहे केस स्टेज मुद्दे व प्रश्न वर आहे पुढे केस चालती का
सर..आमचे.काही शेतकरयांचा..जुना शेतवाहीवाटीचा रस्ता आहे, परंतू त्याला ६महिणे पेक्षा जास्त कालावधी झालेला आहे,... तर आता रस्ता मिळण्यास कोणता मार्ग अवलंब करावा... माहीती द्याल ही विनंती...
Mametdar court ChI order Majya बाजूला असतना सिविल कोर्ट ने Ext.5 order pass करून स्टे दिला .मी ext.5 order la district court मध्ये अपील केले होते.distct.कोर्ट ने माझी अपील रद्द केली .आणि मामेलतदार यांनी कलम 26 बी याचं उलगण केले आहे अशी ऑर्डर केली. सर आता काय करावे.मामलतदार यांचा आदेश रद्द होईल का?. मार्गदर्शन करा सर
आदेश रद्द झाला असे म्हणत येणार नाही. मात्र मामलेदार कोर्ट अक्ट चा आदेश झाला त्याआधी न्यायालयात काही वाद प्रलंबित होता का ? आता तुमची केस तहसीलदार कोर्ट आणि दिवाणी न्यायालय या दोन ठिकाणी आदेश झालेत, त्यामुळे कागदपत्र न पाहता काही सांगणे योग्य होणार नाही, तुम्ही तुमचे वकील साहेबांशी बोलून पुढे काय करणे कायदेशीर ठरेल हे ठरवा.
सर मी 3.8.2020 ला तहसीलदारा कडे रस्त्ता पाहिजे असा साधा अर्ज केला.त्यानंतर समोरच्ने माझ्या विरूद्ध सिविल कोर्टात 29.8.2020 दावा केला.की मनाई हुकुम साठी .पुढे तहसीलदाराने मला विचारपूस करून मामलेदार अॅक्ट.चा दावा करण्यास सागितले मी 11.12.2020 ला दावा केला.परुंतू मी 3.8.2020 अर्ज पासून त्याच्यावर मंडळ अधिकारी पंचनामा .तारखा घेण्यात आल्या .व 3.8.2020 अर्ज no.मामलेदार act दाव्याला तोच no.दिला .ते म्हणाले की आमचा दावा सिविल कोर्टात आधी आहे .अस होत का ?सर मार्गदर्शन करा
नमस्कार सर, मामलेदार यांनी मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार आदेश पारीत केल्यानंतर त्यास पुनरिक्षण अर्ज सादर करण्यास किती दिवसाचा अवधी असतो, त्या बाबतची तरतूद आहे का सर?
Sir , mazya shetat janya sathicharasta ha nakasha var ahe parantu mi attaparynt tych gutaun jsa soyicha hoil tsa tya gutaun dusra rasta vaprat alelo ahe,parntu atta to rasta advt ahet, mla purvi cha rasta melel ka jo ki 10,12varsh zal band kla ahe, to rasta nakshavar ahe
सर जर तहसीलदार साहेबांनी रस्ता दिल्यानंतर म्हणजे त्यांनी तसा आदेश काढल्या नंतर प्रतिवादी त्या निर्णयास आव्हान देवू शकतो का? आणि देत असेल तर कुठे ...कृपया सांगा...
प्रतीवाद्याने stay साठी अर्ज केला आहे .जास्तीत जास्त काय होऊ शकते म्हणजे प्रतिवादी पुढे अजून काय करू शकतो ....आमचा हा रस्ता पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या वहिवाटीचा आहे .. reply please ....
तुमचे पुरावे सादर करा , जर जुना वहिवाट रस्ता आहे हे तुम्ही सप्रमाण सिद्ध करा तहसीलदार यांनी दिलेला निर्णय कायम होईल. त्याला स्टे मिळणार नाही यासाठी तुमचे म्हणणे भक्कमपणे मांडा.
@@pralhadkachare-legalliteracy सर त्याचा अर्ज आज अमान्य झाला. यापुढे तो काय करू शकतो म्हणजे प्रतिवादी पुढे कुठे अपील करू शकतो की हाच निर्णय कायम राहील...धन्यवाद .. कृपया..reply please
नमस्ते सर 🙏 एखाद्या गाव नकाशातील(- - - - - - - - - ) तुटक सिंगल रेषेने दर्शिवलेला वहीवाटीतिल रस्ता हा कित्येक वर्षे कायमचा बंद पडलेला आहे तो रस्ता पुन्हा अतिक्रमणमुक्त करून वहिवाटे मध्ये घेण्यासाठी आपण तहसीलदार कडे कोणत्या अधिनियमानुसार आपण अर्ज करू शकतो...त्याची माहिती द्यावी . ( मी सर मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 अनव्ये तहसीलदार कडे रस्ता अतिक्रमण मुक्त करून देण्यासाठी अर्ज केला आहे... नकाशात दर्शिवल्या प्रमाणे सदरील रस्ता हा प्रत्येक शेतकऱ्या च्या सर्वे नंबर च्या सेंटर मधून जातो . परंतु शेतकरी ये - जा करण्यासाठी नकाशातील वाहीवाटीचा वपर न करता सामंजस्य पणाने बांधाचा वापर करत आल्यामुळे सदरील वहिवाट बंद पडली आहे...सध्याच्या काळामध्ये मळणी यंत्र , बैलगाडी , अन्य वाहतूक करण्यासाठी नकाशात दर्शिवल्या प्रमाणे सव्वा आठ फूट रस्त्याची गरज भासू लागली आहे ...तरी फक्त एक शेतकरी रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याठी अडथळा करत आहे...तरी माहिती द्यावी की सदरील रस्ता कायद्या अनवये कसा मोकळा करून घेता येईल🙏
साहेब ,सीलिंग मध्ये माझ्या गटातून 3एकर34 गुंठे जमीन संपादीत झाली,परत मला 1977 साली जमीन वाटप होताना ताबा पावती 3एकर24 गुंठे अशी मिळाली, #प्रश्न-असा आहे की 10गुंठे चा नविन 7/12 महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ नावाने माझ्या गटात आहे ,ती 10 गुंठे जमीन मला शासन कडे मागता येईल का?
हे केव्हा झाले आहे, यपूर्वीच याबाबत काही अपील वगैरे करायला हवे होते, मला वाटते हे जर अर्धन्याईक प्रकरण असेल तर अपील हाच पर्याय होता, पण किती विलंब झाला ते पहा ......
सर अडवणूक केली नसताना व कोणत्याच प्रकारची वहिवाट नसताना व सर रस्त्या अस्तित्वात नसताना तहसीलदार यानी अर्जदार याच्या बाजूने निकाल जाहीर केला आहे. काय करावे?
Sir mi Adv G.K.Borude Maza rastyacha wad hota tahesildar sahebanni maza arj manjur karun rasta mokla kela hota tya virrudha samorchya partine 23[2] nusar appeal keli upzilhaadhikari Yanni maza virrudha nikal dila tyavirrudha mi Deputy Commisioner yanchyakde stay sathi magni keli pan tyanni mazi takrar dakhal krun ghenyachya muddyavar namanjur keli tar mala samor Kay karta yein te sanga
एकदा रस्ता खुला करून दिल्यावर असे आदेश....? आता दोन पर्याय आहेत एक तर फर चौकशीत सामील होणे व पुरावे v म्हणणे देऊन पुन्हा तसाच निकाल लागेल हे पहावे. नाहीतर कलम २३(२) चा निकाल मान्य नाही म्हणून त्याचे execution ला स्टे घेणे, तो फक्त उच्च न्यायालयात जाऊन घ्यावा लागेल. तुमचे वकिलांशी बोला व ठरवा.
5/2 नुसार वहिवाट मोकळी झाली आहे पण प्रतिवादी ने प्रांत कडे अपील केलं होतं ते फेटाळले आणि आता ते दिवाणी कोर्टात गेले आहेत।रस्त्यावर स्टे ऑर्डर निघू शकते का सर
सर तहसील दार सुरवातीला जमीन महसूल अधिनियम १९६६नुसार कलम १४३ नुसार निर्णय पारीत केला फेरतपासणी तर निर्णय मामलेदार अधीनीयमन १९०६ नुसार कलम ५ नुसार निर्णय पारीत केला व निर्णयात असा उल्लेख की रस्ता बांधावरून दोन्ही बाजूने एक एक चाकोरी रस्ता देणे
Sir , khup Chan mahiti dilya baddle dhanyvad. Sir , aamchya sarbandha varun mandira la janya sathi niyam 5 ne arj kelay . Arjdar ha shetkari nahi . Mandira la janya sathi 2 ra rasta aahe pn lamb hotoy mhanun arj kelay . Mandira la rasta sathi arj karta yeto ka? Mandir phakt pikpani madhye aahe , aanevarit nahi.
कलम ५ हा अस्तित्वात v वाहीवाटी त असलेला रस्ता अडवला तर अडविलेला रस्ता खुला करून देण्यासाठी आहे. नवीन रस्ता देण्यासाठी नाही. पर्यायी रस्ता असेल तर नव्याने रस्ता देण्याचा प्रश्न कोठे येतो ....हे सर्व मांडा चौकशीचे वेळी
सर, घराकडे जाणारा रस्ता जो मागील 23 वर्षांपासून आम्ही वापरत आहोत, त्या रस्त्याला शेजाऱ्यांनी अडथळा निर्माण करून फक्त 2 फूट रुंदीची पायवाट ठेवली आहे, अशा परिस्थितीत मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 नुसार दावा दाखल करू शकतो का?
@@pralhadkachare-legalliteracy ok धन्यवाद सर खूप मोलाचं मार्गदर्शन करत आहात आपण 🙏 आपल्या विधी साक्षरता चॅनल मुळे खूप लोकांना त्याचा योग्य फायदा देखील होत आहे. त्यामुळे आपले व आपल्या चॅनल चे मनापासून खूप खूप आभार 🙏
सर एकाद्या शेतकर्याला त्याच्या शेतीला त्या शेतीच्या गटातून रस्ता आहे तो रस्ता लांब पडतो म्हणून दुसर्या शेतकर्याच्या रस्तवरुण जातो कालातराने आपला गट रस्ता सोडुन दुसर्या शेतकर्याला मागू शकतो का
भाऊ तुमच्या प्रती वादी जर काही करत नाही 90 दिवस तर तुमचे नाव लागून जाईल जर त्यांनी प्रांाधिकारी कडे अपील केली तर तेवढी केस चालते तुमचा पुरावा पका असेल तर निकाल तुमच्या कडून लागून जातो मग कोणीच काही करू शकत नाही
सर.शेजारील शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता आहे तरी ते आमच्या शेतातुन रस्ता मागत आहे आणि तहसीलदार यांनी बेकायदेशीर रस्ता दिला.पंचनामा बांदावरुन दाखवला. बांधावर 50 वर्ष जूने 5 लिंबाची झाडे आजही आहे. रस्ता ओढातुन दिला काय करावे
पक्क्या रस्त्यापासून जवळच्या अंतरावर रस्ता दिला जाईल की, लांबच्या. प्रकरण असे आहे की, आमच्या गावातील एक वस्ती आहे, गाव नकाशा प्रमाणे त्या वस्तीवर जायला फक्त एक पाऊल वाट आहे. त्यांनी रस्त्यासाठी तहसीलदार साहेबांकडे मागणी केली आहे. त्या वस्तीवरील लोकांच्या शेतातून दुसऱ्या गावाला जाणारी एक गाडी वाट आहे. परंतु त्यांनी आमच्या शेतातून/बांधा वरून रस्ता मागितला आहे, जो नकाशात नाही आणि तुलनेत बराच लांब आहे. काय होईल?
सर फार छान माहिती दिली. परंतु माझी जमिन बारा वर्ष झाले पडीक आहे.मी १४४ नुसार अर्ज दाखल केला. तहसीलदार साहेब पहाणीसाठी आले तुम्ही म्हणाले तसे त्यांनी मला बांधावरून रस्ता दिला. समोरच्या व्यक्तीने कपिल केले. त्यानंतर त्याच तहसीलदार साहेब यांनी च माझा रस्ता रद्द केला. खरंच सर महसूल विभाग असे काही वागतो की लाज वाटते. विश्वास कोणावर ठेवावा.उपाय सांगा
सर माझा निकाल मामलेदार कोर्ट अँक्ट १९०६ कलम ५ नुसार माझ्या बाजूने झाला आहे आणि त्याच आपिल उपविभागीय अधिकारी यांच्या कडे समोरच्या पक्षकारांने केला आहे पण उपविभागीय अधिकारी यांच्या कडुन चालू आसलेल प्रकरण काढून जिल्हा अधिकारी यांनी घेतले आहेत आणि हे.प्रकरण त्यांना चालवता येते का ?
हो रिव्हीजन अर्ज चालविण्याचे मूळ अधिकार जिल्हाधिकारी यांचेच आहेत. त्यांनी ते उप विभागीय अधिकारी याना दिले असतील. ते केव्हाही काढून स्वतः:कडे घेऊ शकतात, किंवा कुणा पक्षकार यांनी विनंती केल्यास चौकशी करून ते असे प्रकरण स्वतःकडे हस्तांतरित करू शकतात.
पण ते नकाशा नुसारच रस्ता देणार का नविन बांधावरून रस्ता देणार कारण समोरचा पक्षकार हा त्यांचा नातेवाईक आहे सर आणि मला पहिल्या पासुन त्रास देत आहेत.सर आणि माझ्या बाजूने मामलेदार कोर्ट अँक्ट१९०६ कलम.5 नुसार निर्णय झाला आहे तहसीलदार यांचा आणि उपविभागीय अधिकारी यांनी पण समोरच्या पक्षकारांचा स्टे चा अर्ज नामंजूर केला आहे आणि मुळ अपिलावर सुनावनी ठेवली आहे आणि लगेच जिल्हा अधिकारी यांनी प्रकरण काढून घेतले आहे त्यांच्या कडे सर आणि मलख मणाले बांधावरून रस्ता देतो आस कस होईल सर माझा मो. 9960364146 सर फोन करा नाहीतर तुमचा नंबर पाटवा
सर मी 1906 कलम 5 अ प्रमाणे तहसील दार यांना अर्ज केला आहे माझ्या शेता शेजारी रस्ता आहे पण ते जाऊ देत नाही त्याच्या मद्ये माझा गट नंबर टाकला आहे ड पत्रक मधे परत माझे चुलत भाऊ पण आहे वंशावळ पण आहे तर मी काय करू ते तुम्ही सविस्तपणे सांगा
तहसीलदार यांचे समोर ही तुमची बाजू सविस्तर मांडा, त्यांना स्थळ निरीक्षण करायला विनंती कर, ते येतील तेव्हा यजु बाजूचे शेतकरी यांना खरी वस्तुस्थिती जबाब देऊन मांडायला विनंती करा म्हणजे तुमचं अडवलेला रास्ता खुला करण्याचे आदेश ते देतील
@@pralhadkachare-legalliteracy आदेश देणार होते पण सामने वाला शेत विकत होता तर त्याच्या वडील भावाची बाई ने त्याच्या शेतात स्टे लावून दिला त्याला कारण त्याच्या कडे वकील लावण्यासाठी पैसे नव्हते तो कर्ज दार झाला म्हणून एक तरफी निकाल लाऊन घेतला मग त्याने फाशी लावून घेतली ते सागत होते तहसील दार यांना त्या माणसाची वंशावळ लागत नाही तेव्हा पर्यंत आदेश देऊ नका अस सागितलं त्याच्यात जे तहसील दार थल बगण्यासाठी आले होते त्यांची पोस्टिंग झाली आता नवीन तशिलदर परत थल पाहणी करतील की आदेश देतील ते सागा
सर मामलेदार साहेबांनी आदेश मझ्या बाजूला दिला आहे पण एक अडचण आहे ती म्हणजे ज्या माणसाने आर्ध वट खरेदी केली आहे तो दिवाणी न्यायालयात गेला आहे त्याने स्टे मागणी केला आहे माझ्या वकील ने सविस्तर सागितलं कोर्टात की हा दावा चालवता येत नाही तरी कोर्ट ने आमचा अर्ज नामंजूर केला आहे वादी चा अर्ज मंजूर केला आहे मग मी काय करू शकतो ते सागा
सर चांगली माहिती मिळाली. माझा एक प्रश्न आहे एकदा मामलेदार 1906कलम5 अंतर्गत रस्ता मिळाल्यानंतर नंतर सुप्रीम कोर्टात प्रतीवदिने जर अपील केले तर किवा मनाई हुकूम घेऊ शकतो का व घेतला तर वादी ला रस्त्याचा मार्ग मोकळा राहतो का नाही.की त्या रस्त्याला मनाई हुकूम भेटतो
सर , आमच्या आजोबांनी तहसीलदार साहेब यांच्याकडून पहिला रस्ता घेतला होता पण तू नदीतून असल्यामुळे व नदीचे पाटबंधारे ची काम झाल्यामुळे वाटेवर दहा फूट पाणी राहते त्यामुळे पावसाळ्यात वापर करता येत नाही म्हणून दुसरा रस्ता मागता येतो का सर प्लीज उत्तर द्या
, शिव रस्ता आहे पण तो अतिक्रमण आहे आणि तो शेतकरी सोडायला तयार नाही त्यांना त्याशिवाय रस्त्यांनी पाऊलवाटेने सुद्धा तो शेतकरी जाऊन देत नाही शिव रस्त्यासाठी कोणाकडे तक्रार करावी
सर रसता आहे परतु सधया जवळपास१०० एकरचे पाणी रसतेवरन जाते आता ते रसता ३फुटाचे नाली करनार आहेत आता ते पाणी आमचे शेतात १०० टकेशकेता आहे कारण मागे आणि पुढे जमीन उंचीवर आहे आमची जमीन ही कमी उंचीवर आहे कृपया उपाय सागां।
तिथे या विषयाचे नियोजन v व्यवस्थापन जे करतात त्यांचेशशी बोला, काही underground water harvesting project शक्य आहे का पहा. नसल्यास तुम्हाला शेततळे करून हे पाणी उपयोगात आणता येते का पहा. नसल्यास व हा सार्वजनिक उपद्रव आहे असे वाटत असल्यास, उप विभागीय दंडाधिकारी यांचेकडे अर्ज करून सी आर पी सी कलम १३३ प्रमाणे हा उपद्रव थांबविणे चे आदेश ते देऊन शकतात, त्याचा पाठपुरावा करावा.
सर पूर्वीपासून शेतात जाण्यासाठी चालू असलेला रस्ता गेली वर्षभर एका इसमाने बंद केला मामलेदार एक अधिनियम 1906 खाली मामलेदार गडे अर्ज केला आहे त्या अगोदर जिल्हा परिषद पालक मंत्री यांना निवेदन दिले होते रस्ता जिल्हा परिषद मालकीचा आहेजिल्हा परिषद बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला रस्ता खुला करण्यास नोटीस पाठविली परंतु पुराव्याअभावी ग्रामपंचायतीने रस्ता खुला केला नाही तहसीलदार साहेब रस्ता खुला करून देतील का
सर प्लीज मार्गदर्शन करा तिसऱ्या व्यक्तीने वहिवाट बंद केला असेल व समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला घाबरून आपल्या शेतातून जबरदस्तीने पिकाचे नुकसान करून आपल्या विरुद्ध या कायद्याचा वापर करत असेल तर काय करावे
त्यांची वहिवाट कुठे होती, पर्यायी रस्ता कोठे होता, आतापर्यंत कोणत्या रस्त्याने हे लोक जात होते, ते चौकशी करायला येणाऱ्या अधिकारी यांचेपुधे पुराव्यासह मांडावे. यासाठी जुनी जाणती गावातील वयस्कर शेजारी व माहिती असणारे ग्रामस्थांची साक्ष तुमच्या बाजूने चौकशीत नोंदवावी, फारच आणीबाणी वाटत असेल तर तुमच्या जमिनीत अशा लोकांनी प्रवेश करू नये यासाठी जबरदस्तीने रस्ता आहे असे म्हणणारा विरुद्ध हवं तर दिवाणी न्यायालयातून स्टे घ्यावा. ..
सर आमच्या शेतातून गेली 20 वर्षे 1 रस्ता होता ...1972 च्या दुष्काळात तलाव चे काम चालू असताना हा रस्ता केला होता... तो मागील महिन्यापर्यंत चालू होता... पण मागील महिन्यात ग्रामपंचायत ने मुख्यमंत्री पांदण योजनेत या रस्ता पक्का करण्यासाठी मंजुरी आणली...तो पूर्णपणे आमच्या रानातून जातो ...तसेच 7/12 वर अश्या रस्त्याची कुठलीही नोंद नाही....ग्रामपंचायत ने प्रस्ताव पाठवताना आम्हाला अंधारात ठेऊन हा प्रस्ताव तयार केला... मग आम्ही तो काढून टाकला आहे ...तर अत्ता तो तहसीलदार कार्यालयात सुनावणीला आहे तर पुढे काय होईल....
जे तुम्ही लिहिले की हा रस्ता केवळ १९७२ ची दुष्काळी कामे करताना सौजन्याने करू दिला होता,तो पूर्वापार वहिवाट रस्ता नव्हता असे पटवून द्या, पुरावे द्या, जुने शेजारी उभे करा जबाब देण्यासाठी तसेच रस्ताच हवा असेल तर रीतसर भूसंपादन करावे असे पण सांगा, लेखी द्या, पोच घ्या.
Sir amacha joint घेतलेला NA प्लॉट आहे त्यात आमचा प्लॉट मागच्या बाजूला आहे व येण्या जण्या करिता रत्सा आहे तसा उल्लेख सुद्धा आहे पण समोरील प्लॉट owner ने रस्त्या वर अडथळा( पाण्याची टाकी) निर्माण केला आहे तर काय करत येईल
ले आऊट मंजूर असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केला त्यांचेकडे तक्रार करा, तुम्हाला ज्यांनी विकला त्यांना मध्यस्ती करायला सांगा, रस्ता देतच नसेल तर असे किती लोक आहेत ज्यांना रस्ता नाही त्यांना घेऊन एकदा तहसीलदार यांना लेखी निवेदन द्या. नाहीच झाले तर दिवाणी न्यायालयात जा. मात्र मंजूर ले आऊट आहे का, त्यात रस्त दिसतो का ते पाहा. केवळ तोंडी रस्ता आहे असे म्हणत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
का नाही, चूक करणाऱ्या कायदा मिळणाऱ्या प्रत्येकावर केस होऊ शकते, कायद्यापेक्षा कुणीच मोठे नाही. होत काय लोकांना लुटणाऱ्या भामट्याना सरळ करायला पुरावे घेऊन निर्भयपणे लढायला कुणी वेळ काढत नाही, त्यामुळे प्रत्येकजण सहन करतो होणारे अन्याय अत्याचार. खरे तर ती म्हण आहे ना ," म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो आहे " त्याच काय. तेव्हा जो दुखावला जातो त्याने पुढे येऊन, व्यवस्थेला सरळ केलच पाहिजे.
@@pralhadkachare-legalliteracy सर शेजारील जमीन ही आदी भावाची होती आता ती बहीनींनी कोर्टा मार्फत खटला चालवुन ताब्यात घेतली आहे मला त्या जमीनिचया बांधावरुन रस्ता हवा आहे आता जे मालक आहेत ते मला त्रास देतात माझा ७/१२ आणि शेजारील ७/१२ तुम्ही जर बघितला तर तुम्ही मला या बाबत काही मदत करू शकता का