Sorry to say.. पण या सगळ्यांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याचे त्याने ठरवावे. परवा मला एक आजी भेटल्या ज्या नाती साठी स्थळाची चौकशी करत होत्या. तेव्हा षडाष्टक बद्दल त्या म्हणाल्या की माझी आणि यजमानांची रास षडाष्टक मध्ये येते पण आज 58 वर्ष आमचा संसार झाला आणि माझी तिन्ही मुले सरकारी अधिकारी असून मुलांची 3 घरे धरून आमची 5 घरे आहेत . नातवंडे पण उच्च शिक्षित असून स्वतःच्या पायावर उभी आहेत. आता सांगा कितपत विश्वास ठेवायचा . दुसर म्हणजे आमच्या समोर एक खूप धार्मिक कुटुंब राहते. त्यांच्या मुलाचे लग्न पत्रिका पाहून ठरवले पण मागच्या वर्षी काहीच त्रास होत नसताना त्या सुनेचा थोडेसे पोटात दुखले एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. पणा माझा अनुभव आहे की जर तुमची श्रद्धा दृढ असेल तर परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहतो
ताई, आपण सविस्तर माहिती द्यावी, हे सगळं थोतांड असण्याच कारण काय आहे ते ?? या सर्व जोड्या षडाष्टक मध्ये येणाऱ्या आहेत... आपल्या माहिती नुसार यात काय चुकतंय ते कृपया सगळ्यांना कळू द्या..
वृषभ आणि धनु जमत नाही. इथे अष्टक योग होतो.. कारण वृषभ पृथ्वी राशी स्थिर राशी यांचे विचार स्थिर असतात. धनु ही अग्नी राशी द्वि स्वभाव राशी. रागीट आणि अस्थिर विचार म्हणून दोघांचेही मतभेत होतात.