#BolBhidu #TembhuYojana #KhanapurAtpadiAssembly
मे महिन्याच्या सुरवातीची गोष्ट. महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराने जोर धरलेला, त्यात माढा मतदारसंघ गाजत होता. कारण होतं मोहिते पाटलांच बंड. तुतारी घेवून मैदानात उतरलेल्या मोहिते पाटील कुटूंबाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून लीड मिळेल अस बोललं जात होतं. पण या दाव्यांना अपवाद होता तो सांगोला. सांगोला मतदारसंघात चर्चा होती ती पाण्याची. भर उन्हाळ्यात कालव्यांमध्ये सोडलेलं पाणी माढ्यासाठी गेमचेंजर ठरू शकत होतं, झालही तसचं 25-30 हजारांच लीड सांगोल्यातून घेवू असा दावा करणाऱ्या मोहिते पाटलांना सांगोल्यातून साडेचार हजारांची पिछाडीच मिळाली. हे कशामुळे घडलं. तर पाण्यामुळे.
भर उन्हाळ्यातल्या स्किमच्या पाण्याने निवडणूक आवाक्यात आणली होती. असो पण योजनांच हे पाणीचं संपूर्ण राज्याचं निरेटिव उलटं फिरवून किमान एखाद्या भागात पुर्णपणे उलटवू शकतं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्फत टेंभूच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन करण्यात आलं, या योजनेला टेंभू योजनेचे जनक असलेल्या स्व. अनिल बाबर यांच नाव देखील देण्यात आलं. पाण्याचं हे राजकारण किती गेमचेंजर ठरू शकतं, कोणत्या भागात त्याचा थेट परिणाम होवू शकतो आणि कोणत्या भागात या योजनेचा अप्रत्यक्ष परिणाम होवू शकतो समजून घेवूया या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
2 окт 2024