मनाचा सहा विकारांसह समूळ निरास हेच आत्मज्ञानाचे सूत्र आहे.साक्षी भावाने मनातील विचार,वासना,राग ,लोभ पाहिले असता ते कशा प्रकारे आपल्याला फसवतात ते लक्षात येते. म्हणूनच बंध व मुक्तीचे कारण मनच आहे . निष्काम मन हे सर्वात मोठे धन . कारण गगनाहूनी विशाल , निर्गुण , निराकार , व आपले मूळ स्वरूप असे आत्मतत्त्व / राम / परमात्मा / परब्रम्ह .. हे निष्काम मनातच प्रकटू शकते . म्हणूनच निर्विकल्प मनाने मनाचेच सजग , साक्षी भावाने निरीक्षण हे च खरे ध्यान !