गुरुजी तुमची ही मनोगते वारंवार सर्व वयाच्या श्रोत्यांसमोर झाली पाहिजेत कारण तुमच्या रक्तातून हे सतत वाहत असते त्याचा लाभ मिळणे हे खरोखर भाग्य आहे तुमची ही कविता पूर्वी ऐकली होती आणि अंगावर शहारे आले होते खूप खूप धन्यवाद
एकंदरीत अतिशय प्रभावी विचार, आपल्या लोकांची नेमकी चूक ( समाजाची) आणि सावरकर लोकांपर्यंत का पोहोचले नाही याचे नेमके विश्लेषण अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने दिले आहे.. शेवटची कविता फारच छान लिहिली आहे.सावरकरांच्या व्यक्तीत्वाला शोभेल अशीच रचना केली आहे. गायन पण सुश्राव्य!!!! 🙏🙏🙏
फारच सुंदर गायले आहे गीत.....शब्द लक्ष देऊन ऐकले....हृदयाला भिडले. एखाद्या गाण्याच्या चालीवर दुसरे शब्द एरव्ही खटकतात...तसे इथे झाले नाही....आणि तुमच्याबद्दल तर प्रश्नच नाही..सावरकर हा विषयही आवडता.....खूप वर्षापूर्वी एका , गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनासंदर्भात आम्ही नाशिकहून तुम्हाला भेटायला आलो होतो....😊
सुंदर व्याख्यान. सावरकरांनी जो हिंदूधर्मा बाबतचे विचार इतक्या वर्ष लुप्त झाला होता. गर्वसे कहो हिंदू हे म्हणायला भिती वाटायची. पण भारताच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव निमित्ताने 2014 भाजप सरकार सत्तेवर आले व मोदी पंतप्रधान यांनी मंदिरांंचे पुर्नजिवन झाले, आयोध्यात राम मंदिर बांधण्यास सुरवात झाली. भारताला पाच हजार वर्षाचा इतिहास असून पंरपरा आहेत त्याचे स्मरण झाले. थोडक्यात स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांच तेरा अक्षराच्या मंत्राने समाजात हिंदूधर्म बाबत जागृती झाली आहे. अशी सकारात्मक गोष्ट मोदी पंतप्रधान झाल्या मुळे झाली. आता भविष्याची काही चिंता नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मी सन १९८२ पासून सावरकर सदनात मा. बाळाराव सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कामकाज केले. अत्यंत अवैज्ञानिक, असत्य सावरकर साहित्य पसरवले जायचे. कालांतराने हळूहळू मी तिथुन काढता पाय घेतला.
टकले आणी तटस्थ हाच एक विनोद करताय आपण.पुर्वग्रह दुषित दृष्टिकोनातून ते विचार मांडत असतात.पण पुरोगामी म्हणल कि ते काहीही म्हणायला मोकळे असतात.गांधिजी आणी सावरकर दोघांनीही आपआपल्य् पध्दतीने प्रयत्न केले.सावरकर यांच काही जण स्वातंत्र्य लढ्यातील योगदान नाकारतात.गांधीजी यांच योगदान सर्वजण मानतात.इंग्रजांना भारतालरच वर्चस्व गमावारच नव्हत आणी गांधीजी जर त्यासाठी प्रयत्न करत असतील तर,गांधीजी इंग्रजांचे एक नंबरचे शत्रू असायला हवे होते.पण सावरकर यांना एकदा नाही दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा होते,अंदमानात अंत्य॔त हालिखीच्था परीस्थितीत ती भोगावी लागते.आणी गांधीजींना अशी कडक शिक्षा कधी झाल्याच दिसत नाही,नेहरूना कडक शिक्षा झाल्याच दिसत नाही अस का हा प्रश्न निरंजन टकले यांना कधी पडला नाही आणी यापुढेही तो पडणार नाही कारण त्यांनी मनोमन आधिच ठरवून टाकल आहे सावरकर हे नालायक होते.त्यामूळे त्यांना सावरकरांमधले चांगले गुण कधी दिसणारछ नाहीत.हावरकर यांच्यावर माफीचा आरोप होतो तसाच तो गांधी,नेहरू यांना कमी तीव्रतेच्या शिक्षा झाल्या तूरूंगात सौखसोई मीळत होत्या याचा अर्थ या दोघांनी इंग्रज सरकार बरोबर काही गुपचूप डील केल होत म्हणून कमी तीव्रतेच्या शिक्षा झाल्या.
सावरकरांचा अवमान करणार्यांत पहिला नंबर फडणवीस यांचा आहे. त्यांनी सत्तेवर येताच महाराष्ट्रात गोहत्या बंदी लादली. गायीला देवता समजणे म्हणजे गाढवपणा हे सावरकरांचे कायमचे सांगणे होते.😊