#BolBhidu #TirumalaLadduRow #TirupatiBalajiTemple
आंध्र प्रदेशातलं तिरुमला तिरुपती देवस्थान. वर्षभरात साधारण पाच हजार करोड रुपयांचं उत्पन्न असलेलं जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान. किमान ६० ते ७० हजार भाविक दररोज भगवान व्यकटेश्वरांच्या दर्शन घेण्यासाठी या देवस्थानाला भेट देतात. इथून दर्शन घेऊन येणारे भाविक नेहमीच भगवान व्यंकटेश्वरांचा प्रसाद म्हणून तिथले लाडू घेऊन येतात. असं म्हटलं जातं की तिरुपतीला गेलेला एकही भाविक हा लाडवांचा महाप्रसाद घेतल्याशिवाय परत येत नाही. या महाप्रसादाला जवळपास ३०० वर्षांची परंपरा आहे. पण या लाडवांच्या प्रसादाबद्दल सध्या एक धक्कादायक माहिती समोर आलीय. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील आंध्र प्रदेश सरकारकडून या प्रसादाबद्दलचा एक टेस्ट रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आलाय.
यामध्ये प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी आणि माशांचं तेल वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. २०१९ ला जगन मोहन रेड्डींचं सरकार आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत या प्रसादात भ्रष्टाचार करुन भाविकांच्या श्रद्धेशी खेळ झाल्याचे आरोप चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम पार्टीकडून करण्यात येत आहेत. लॅब रिपोर्टमध्ये प्रसादात वापरल्या जाणा-या तुपाबद्दल करण्यात आलेला दावा काय आणि जगन मोहन रेड्डींच्या सरकारचा या सगळ्याशी संबंध काय, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
19 сен 2024