''भारताला 1947 साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळालं आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,'' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. मोदींचा सामना करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त राज ठाकरे बोलत होते. त्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी देशाला फसवलं आहे. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
7 сен 2024