श्रीसमर्थ रामदास स्वामीनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्रीसमर्थांना जाणवली. श्रीसमर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा श्रीसमर्थांचा विश्वास होता. त्यांनी इ. स. १६४४ मध्ये शहापूर जि. सातारा येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. अशा रीतीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्रीरामदास स्वामींनीच केली. हेच संस्थान श्रीरामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.
माझ्या मनात काही शंका आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी, मनाच्या श्लोकात म्हणतात, १. मना सत्य ते सत्य वाचे वदावे | तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे || २. प्रपंचात चातुर्याने वागावे, असे म्हणतात. काही जण चातुर्य म्हणजे खोटेपणा नाही, असे म्हणतात, तर काहीजण चातुर्य म्हणजे, लबाडी मिश्रित खोटेपणा म्हणतात. 3.समर्थ दासबोधात राजकारण निरूपणात म्हणतात, ठकासी व्हावे ठक, उद्धटासी उद्धट | तसेच, लौदासी लौद लावून द्यावा, जैशास तैसा!! पण, मूर्ख लक्षणात असेही म्हणतात, करावे तसे भरावे, हे ज्याला कळत नाही, तो एक मूर्ख |(कर्माचा सिद्धांत ) या सगळ्या वाक्यांमुळे गोंधळ होतो. म्हणजे कसे वागावे हे कळले, पण कोठे आणि कधी कसे वागावे, याचा निर्णय कसा करणार? काही जण म्हणतात, हे कलियुग आहे, इथे सगळा खोटपणाच आहे. पण, मग आपल्या बचावासाठी आणि संरक्षणाठीही खोटे बोलू नये का? मागे एक टॅक्स कन्सल्टन्ट भेटले होते, ते म्हणत होते, खोट्या balance शीट बनवल्याशिवाय businesses survive च करू शकत नाहीत. मोठमोठ्या कंपन्या खोट्या balance शीट तयार करतात. हे एक open secret आहे. तर मग कर्माच्या सिद्धांताचे काय? कोणी नक्की काय करायचे, हे कसे ठरवणार?
मी झोपडपट्टीतल्या माणसांबरोबर कामे केली आहेत. एक गरीब माणूस माझ्या समोर वस्तूंमध्ये भेसळ करत होता. मी त्याला विचारले, असं का करतोस? तो म्हणाला, आम्हाला पर्याय काय आहे? आम्ही जगायचं कसं? पैसेवाल्या आणि श्रीमंत माणसांनी आम्हाला जगण्यासाठी काही शिल्लक ठेवले आहे का?
सुंदर विवेचन, सुंदर सोहळा, सर्वांनी एकत्र येऊन आपल्या लोकांचे संरक्षण व उध्दार करावा व हे कार्यं गावोगावी पसार व्हा आपला धर्म संस्कृती संस्कार टिकला पाहिजे सर्वांनी ह्यात सहभागी झाले पाहिजे जय जगदंब 🙏🏾🌹👍
मला तुम्ही खूप प्रभावित केले मी आळंदी देवाची येथील असून मला आपणास भेट घेण्याची इच्छा आहे आमचं श्री गोपाल कृष्ण मंदिर आहे आळंदी देवाची येथे गोपाळपूर येथे मला आपलं मागदर्शन हावे आहे मला मंदिर जिर्णोध्दार करांचा आहे मंदिर 1734 श्रीमंत पेशव्यांनी बांधून दिले आपण लवकरच भेटू