काय ते दिवस होते, काय ते निधड्या छातीचे शूर वीर मावळे होते.. आणी काय ते राजे शिवाजी महाराज...नाव ऐकताच अंगावर काटा येतो... छत्रपती शिवाजी महाराज की जय...
दिपकजी, आपल्याला तसं आज वाटतं. पण त्याकाळात सुद्धा खूपशे लोकं आपापल्या कामधंद्यांत मग्न होते, आपल्या बाजूलाच राज्यांचा इतिहास घडतो आहे, ह्याची त्यांना जाण नव्हती आणि हे नेहमीच असे असतं. इतिहास होत असतात तो होतोय हे समजत नाही, आणि आपण 100 वर्षानंतर त्याचं स्वप्नरंजन करतो आजची परिस्थिती पण वेगळी नाही
छत्रपतींना मानाचा मुजरा असा राजा जगात होणे नाही राजे होते म्हणून आम्ही हा इतिहास ऐकू शकलो आत्ताच्या पिढीला छत्रपतींचा इतिहास समजण्यासाठी अशा लहान लहान व्हिडिओ स्क्रिप्ट यूट्यूब ला प्रसिद्ध करावे अशी इच्छा आहे सर्व शिवाजीच्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा जय शिवाजी जय जिजाऊ
कितीही वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही.... शककर्ते महाराज आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग रोमांच तर उभे करतोच पण नेत्र डबडबतात...उर भरून येतोय...होय त्या महान राजाच्या मुलखात मी जन्म घेतला.... धन्यवाद नियती!!!
अंगावर शहारे आले दादा. छान वर्णन.1989 ला आम्हाला इतिहासला डांगे सर होते. त्यानी त्या काळात महाराजांच्या किल्यांना भेट दिली त्याची माहिती आम्हाला वर्गात द्यायचे. ते पण हुबेहूब तुमच्या सारखेच वर्णन करायचे. जय शिवराय 🚩🚩🚩
एकाच शब्दात सांगायचे तर अतिसुंदर अप्रतिम भाष्य आहे ऐकतांना अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि अभिमान वाटतो राजांचा आई जगदंबे च्या कृपेने सर्व मंगल झाले आणि स्वाभिमान जागृत होतो आमचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
धन्यवाद खरच काय प्रसंग असेल तो...तो तुम्ही हुबेहूब वर्णन केला...या बदल लाख लाख धन्यवाद आपले...हा माझा शिवबा रयतेसाठी झिजला... कुटुंबाची पण परवा नाही केली...मानाचा मुजरा छ.शिवाजी महाराजांना....🙏🙏🙏
"मा साहेब जरा ऐका " या संदर्भ छोट्या वाक्यात माता- पुत्रा तील प्रेम, त्याही पलीकडे जाऊन शिवरायांची स्वराज्यावर असणारी भक्ती आणि प्रेम तसा हा त्रिवेणी संगम अदभूत प्रसंग अगदी ह्दय स्पर्शी , डोळ्यांत आनंद अश्रू आणनारा प्रसंग. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय.
अनेकदा वाचलेला/ऐकलेला इतिहास पण पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. पुन्हा पुन्हा ऊर भरून येतो. पुन्हा पुन्हा आसवे ओघळतात. तुम्ही सुद्धा जिवंत केले ते क्षण. भले नेहरूंनी बॅंडीट म्हटले होते प्रथमावृत्तीत डिस्कवरी ऑफ इंडियाच्या पण राजांच्या थोरपणा पुढे भारताच्या प्रथम पंतप्रधानाला झुकावेच लागले, दुसऱ्या आवृत्ती पासून चूक सुधारावीच लागली. आणि आता तर काय, सारे जगच झुकते आहे महाराजांच्या नावापुढे.
आग्रा हून महाराजांची सुखरूप सुटका झाल्यानंतर मनाला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा संभाजी राजांना जेव्हा पकडले त्याचे दुःख जे मनाला होते ते कुणालाच सांगता येत नाही जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे
खूप सुंदर,प्रत्येक शब्दाला आपण महाराजान सोबत असल्याचे जाणवत होत,मा साहेब v महाराज या माय लेकराच्या भेटीच्या प्रसंग ऐकताना अंगावर रोमानचं उभे राहिले जय शिवराय आणि धन्य ती माता
असे अनेक प्रसंग इतिहास कधिही विसरु शकत नाही असे अकल्पनीय घटना हजारो वर्ष लक्षात राहिल राजं खरंच तुम्ही केलेल्या कार्याला कोटि कोटि मुजरा आजच्या पिढीने तूमचे विचार आत्मसात करावे हिच आमची ईच्छा जय शंभु जय शिवराय
मला सर्वात जास्त आवडलेला शब्द म्हणजे .....❤❤परमेश्वराच्या धर्तीवर फिरायला बंदी कसली..???❤❤ आम्ही गाववाले , आम्ही महाराष्ट्रवाले , आम्ही इथले आम्ही तिथले ही निव्वळ डुकरांची पिलावळ.....!
Sgala इतिहास mahit asun dekhil परत परत aikave, vachave, Baghave ase श्री Shivaji Maharaj 💐🙏 देवाने ya mansala sankate pan ashi dili ki फक्त raje ch ti sankate paar karu shakale🎉
अपनी धरती अपना राज, छत्रपती शिवजी महाराज का एक ही सपना हिंदु स्वराज, अब गुलामी की जंजीर नहीं, सिर्फ जीत का गुलाल । ये शपथ है बाजीराव बल्लाळ की । हर हर महादेव
Kay बोलावे हे ऐकून कळत नाही काय काळ असेल तो किती निष्ठावान होते मावळे धन्य ती माता माऊली धन्य ते राजे आम्हाला अभिमान आहे की आम्ही या पावन भूमीत जन्माला आलो
झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा!आता असे राज्यकर्ते पुन्हा होणे नाही.आताचे पुढारी सात पिढ्यांची संप्पत्ती गोळा करून आपले भले करणे हाच हेतू साधून राजकारणात प्रवेश करणे आहे