कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेली कविता ज्या कवितेचं पूढे प्रसिध्द गाण्यात रूपांतर झालं.
आपण जेव्हा आपल्यातला प्रतिभेला ओळखतो तेव्हा आपण स्वतःच राजहंस अहित याचा प्रत्यय येतो. याचा आशयची ही कविता.
एक तळ्यात होती
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक
- ग. दि. माडगूळकर
#आठवणीतल्याकविता
#athwanitlyakavita
#marathipoem
#marathikavita
#balbhartikavita
#yuvakbhartikavita
#ekatalyathoti
#ashabonsle
#gadima
#gadimadgulkar
#madhuragharpuredeshpande
15 сен 2024