देवेंद्र फडणवीस जी, बॅक फूट वर खेळणं बंद करा. जनता आजही तुमच्या बाजूने आहे. जर तुम्ही हिम्मत दाखवली नाही तर मात्र तीच जनता तुमच्या विरुद्ध जायला वेळ लागणार नाही.
@@mohan1795 सुशांत सिंग ला न्याय मिळवून दिला नाहीं. गुन्हेगार मोकळे फिरत आहेत. म्हणजे सत्य हेच, की असले मुख्यमंत्री काही कामाचे नाहीत. मला पसंत की नापसंत हा प्रश्नच उद्भवत नाहीं. दुसरा चांगला पर्याय शोधणे हे मतदाराचे काम आहे.
ही सर्व व्यवस्था ही ६० वर्षातील काँग्रेसची देणगी आहे.पुढारी आणि नोकरशाही यांनी मनसोक्त मलई खायची आणि त्यांना काहीही होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
अगदी खरं आहे. मंत्र्यांपासून अगदी शेवटच्या माणसांपर्यंत पैशाच्या लोभाने पछाडलेले आहेत.प्रथम सर्व मंत्र्यांना मिळणाऱ्या फुकटच्या सुविधा बंद केल्या पाहिजेत.म्हणजे खरे कळकळीचे लोकच राजकारणात येतील.
पालथ्या घड्यावर पाणी. दहा वर्षांपूर्वी नो एंट्री त नगरसेवक गाडी उभी. पोलिसाला म्हटले काही तरी करा की. तो धावून आला. तुम्ही आमचे मालक नाही ते आहेत. निघा, आलेत आमच्यात काड्या घालायला. काही वर्षा नी घरफोडी झाली अडीच लाख गेले फौजदार म्हणाले आम्ही तुमच्या नातवाला ताब्यात घेऊ. करेक्ट कार्य क्रम करू. त्या दिवशी आम्हाला कळले की आपल्या ला शेपूट आहे
देवेंद्र आणि उद्धट यांची या बाबतीत मैत्री आहे, खर तर गृहमंत्री ह्या नात्यानी पालघर साधू हत्याकांड आणि विशेषतः दिशा सलियान, सुशांत ह्यांची केस पुन्हा एकदा तपास केला पाहिजे. बिहार पोलिस खात्यातील पोलिसांना तपासात अडथळा ( कोविड मुळे) झाला आणि कदाचित पुरावे कमी महत्त्वाचे झाले.
ज्यानं वीस लोकांना आपल्या गाडी खाली चिरडलं तो बाहेर फिरत आहे त्याचं कोणी काय वाकडं करत नाही, नेत्यांनी मुंबई चे गुंड संपवलं आता स्वतः त्यांची जागा चालवत आहेत
भाजपची सत्ता असली तरी सरकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार जोरात चालू आहे. सगळ्यांना कोलतात हे. धंगेकर आता बोलतात, सचीन वाझेला पैसे मोजण्याची मशीन दिली होती वसुली करण्यासाठी, तेव्हा कुठे होते!
महाराष्ट्राचा बिहार होणार आहे हे नक्की करण एवढा मोठा घोळ रोज एक एक बाहेर येतंय आणि कोणीही सत्ताधारी बोलत नाही मला तर आता bjp आणि फडणवीस यांच्यावर सुद्धा विश्वास नाही राहिला
कदाचित फडणवीसांना गृहमंत्री म्हणून शेवटची संधी असेल की बोटचेपेपणा सोडून कणखरपणे स्वतः च्या पार्टीचे लोक असले तरी अतिशय निष्ठुर पणे कारवाई करून ही किडलेली यंत्रणा झाडून काढली पाहिजे.
या प्रकरणात juvenile justice मुळे वेगळे मुद्दे आडकाठी बनू शकतात. पण सुशांत-दिशा प्रकरण मात्र मुंबईचे युवराज इंग्लंडला स्थानांतरित झाल्यावर तरी निकाली लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना! मोदीजींच्या पुढील टर्ममधे अशा संभावित, उच्चभ्रू गुन्हेगारांना त्वरित व योग्य शिक्षा व्हावी हे अपेक्षित आहे.
Kahi honar nahi. 2014 madhe faar apekshe ne Modi na vode dila hota. Tya nantar dusra kahi paryant mhanun detoy. Public la ch petun uthav lagnar ahe. Nahi tr kahi khara nahi
सगळी सडलेली यंत्रणा आहे. दोषी माणसांना कशी शिक्षा होणार?डॉ म्हणत आहेत नावं सांगतो पण तत्पूर्वीच त्याचं तोंड दाबलं जाईल. अजूनही असंच वाटतं की सुशांत,दिशा सारखे हे प्रकरण दाबले जाईल. निराशाजनक वातावरण आहे.
शरमेची बाब आहे. व्यवस्था पोखरली गेली आहे. सडक्या मेंदूवाल्यांना कठोरपणे ताळ्यावर आणले पाहिजे. दिशा व सुशांत प्रकरणीसुध्दा कोणाला कारवाई करायचीच नाही असे वाटते. खरं आहे कि सर्वसामान्य माणसालाच जागरूक राहिले पाहिजे.
अनिलजी तुम्ही अगदी खरं सांगताय . स्थानिक जनतेने हे प्रकरण जर लावून धरला नसता तर हे प्रकरण देखिल दाबून टाकण्यात आलं असतं . व्यवस्था इतकी भ्रष्टं झाली आहे की तीला ताळ्यावर आणणं खरच खूप कठीण काम आहे . *सब की साथ सब का विकास* कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत . त्याही जर का पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र जनतेचा कोणावरच विश्वास रहाणार नाही . त्याचे भविष्यात होणारे परिणाम भयावह असतील .
हे शक्य नाही. आम्ही नालायक लोक ही भ्रष्ट eco system बदलू देणार नाही. आम्ही चांगल्या लोकांचे मुडदे पाडून त्या मुडद्यांवर पाय रोऊन ऊभे राहु. मायबापहो आतापर्यत मतपेटीद्वारे साथ दिलीत तशी पुढेही देत रहा.
या लक्ष्मी पुत्राचे वडील सौ ताईंच्या पिताश्रींच्या बाजूला एका समारंभात बसल्याचा व्हडिओ व्हायरल झालाय कदाचित ते कारण असाव .नाहीतर ताईनी लगेच फडणवीसावर घसरल्या असत्या.
That is because PAWAR family connection (well-wishers ) showing in this case. But I am very much sure DEVENDRA FADANVISJI will be help to this family. DEVENDRA FADANVISJI'S bad habit is, he is going to use all information which he has to SAVE this FAMILY/OPPOSITION parties. In short after few days there will be DEAD SILENT. And we stupid HAPPY with DEVABHAU'S master strokes. Why not BJP was ACTIVE in Sushant Singh and Disha Salian case like today's CONGRESS PARTY in this AGARWAL CASE ?
योग्य ठिकाणी मलिदा गेला तर सगळ शांत होतं दिसत फक्त शासकीय वर्ग. हे सत्य स्विकरण कदाचित कमी पणाचा वाटेल पण खर आहे. शेवटी आपला बाळू दुसऱ्याचा बाळ्या असाच असत.
अनय तुम्ही म्हणता ते नागरिकांचा आक्रोश व दबाव आवश्यक आहे परंतु उत्तर प्रदेशमध्ये ती व्यवस्था बदलायची व शिस्त लावायची प्रक्रिया योगी यांनी केली आहे. ती ताकद महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये कोणाकडे नाही
अनयजी पण योगी ने पण तीच व्यवस्था घेऊन बदल घडवला ना. आपल्या इथे बीजेपी चे लोक घाबरतात लोकांना हात लावायला कारण इथला विरोधी पक्ष लगेच जात, धर्म बघून रडायला लागतात. माझा अनुभव असा आहे आपल्या लोकांनाच नियम वगैरे नको आहेत. नियम सांगायला गेले की आपलाच बाप काढतात
महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान होऊन majority आली तर योगीजी चालवतात तसाच महाराष्ट्र चालेल, नाहीतर नुसत बोंबलून काय होणारे, यावेळेलाही मतदान आपल्या कडे सगळ्यात कमी झालं आहे
पवारांनी कायम गृहखाते आपल्या ताब्यात ठेवले.सर्व पोलिसयंत्रणेवर कायम त्यांचेच नियंत्रण राहीले.तेवढ्यासाठी त्यानी हातात आलेले मुख्यमंत्री पद सुद्धा सोडले.
पुण्यातील शिक्षणसंस्थातील विद्यार्थी अहोरात्र ज्ञानयज्ञ करत असतात. त्यांंची ज्ञानाची अथांग भूक शमवण्यासाठी व श्रमपरिहारासाठी अशा पब व डान्सबार तसेच छोटे मोठे बियर बार आवश्यकच आहेत. शेवटी ज्ञानार्जन महत्वाच. शिक्षणसम्राट व काकांनी नेमक तेच पुण्यात केल आहे.
अशा घटनांत पालकांची जबाबदारी याबाबत कोणीही बोलत नाहीत , 12-15 वर्षाची मुले मुली गाडी चालवतात याचे पालकांना पण कौतुक असते,व्यवस्थेला दोष देण्यासोबत पालक व मुले यांचे प्रबोधन कोण करणार , निबंध स्पर्धा घेण्याऐवजी पालकांसाठी व मुलांसाठी मेळावा ठेवून प्रबोधन करणे आवश्यक होते राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी पूढाकार घेतला पाहिजे.
पोलिस, राजकारणी आणि प्रशासन यांच्या आशीर्वादाने सगळी काळी कामे चालू असतात. फक्त बोंबाबोब झाली की मग फक्त लोकांनां दाखवायला कारवाई करायची मग थोड्या दिवसात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. हफ्त्यावर च यांची घरे भरली जातात
"सरकार किसकी भी हो, सिस्टीम तो हमारा है!" ही ओळ अजूनही किती चपखल आहे ह्याची दुर्दैवाने आजही जाणीव होते. भा ज प चा गृह मंत्री असून हे व्हावं हे किती वाईट आहे.
अनयजी अगदी बरोबर. राज्याच्या ज्या ज्या भागात अतिश्रीमंत लोक आहेत ते कुणालाच दाद देत नाहीत.संजय दत्त च ऊदाहरन आठवा सुनिल दत्त कोनाला भेटायला गेले होते.आणि मग काय झाले.ह्या अतिश्रीमंताना माहिती आहे की तुमनही तो तुम्हारे बापको हम खरिदीगे.आणि बाप तर वाटच बघत असतो.
अनयजी माझे वय 75 आहे. तरुणपणापासून राजकारण पाहत आहे मला बरोबर हेच वाटते मित्र मंडळीत चर्चा करताना "राज्य कोणाचेही असो सिस्टिम आमची आहे " असे सिस्टिमवाले बेधडक म्हणतात ते यामुळेच. जोपर्यंत न्यायिक रिफॉर्म होत नशीत तोवर सर्व व्यर्थ आहे.
योगी आदित्यनाथ जर व्यवस्थेत हवा तसा बदल करू शकतात तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि सक्षम ? उपमुख्यमंत्र्यांना ते का शक्य नाही? शहा / मोदी जीनी यात लक्ष घालावे ही विनंती.
मागील ड्रग रॅकेटमधील सूत्रधारचा ससून रुग्णालय मध्ये असलेले अस्तित्व, त्याला मदत करणारी ससूनमधील व्यवस्था माहीत असूनही परत ससूनमध्ये घडले आहे. त्या प्रकरणात त्यावेळी गृहमंत्री यांनी अधिक कार्यवाही करायला हवी होती.
अगरवाल पूर्ण पणे दोषी आहेच हे नक्की. त्या मुलाला सगळे नियम मोडण्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याबरोबरच दुचाकीवाल्यांनाही वाहतुकिचे नियम कठोरपणे शिकवणं गरजेचं आहे हे मी स्वानुभवावरून सांगते आहे. इतकी बेदरकारपणे दुचाकी चालवतात की कधी कधी चारचाकी वाल्याची काही चूक नसताना सुद्धा accident होऊ शकतो. आणि मग चूक नेहमी मोठ्या वाहन धारकाचीच असते असा सामाजिक संकेत झाला आहे. एकूणच सगळ्यांना कठोरपणे वाहतुकीचे नियम शिकवण्याची गरज आहे.
ही अशीच 'व्यवस्था' उत्तर प्रदेशातही होती ना ? पण त्यातूनही योगींनी मार्ग काढलाच ना ? या दृष्टीने पाहिलं तर देवेन्द्रजी बुळचट तरी आहेत किंवा व्यवस्थेचा भाग तरी आहेत .
कायद्याचा धाक आणि खटल्याचा लवकर निर्णय झाला तरंच हे बंद होईल.योगींसारखे मुख्यमंत्रीच हे सर्व करु शकतात.महाराष्र्टात कायदा अस्तित्वातंच नाही असं वाटतंय मला.धिक्कार असो या सर्व मस्तवाल लोकांचा.....
देवेंद्रजी आपल्यात खरंच हिम्मत असेल तर, प्रसंगी सत्ता सोडायची तयारी असेल तर आता फ्रंटफूट वर येत खेळा बस्स झाले ते गुळमुळीत बोलणे....इथे कोणालाही सोडू नका ....आहे हिम्मत .....?? आपण गृहमंत्री आहात आपल्या मागे घटनेची जबरदस्त कायदेशीर ताकद आहे....आता मागे जात खेळणे बंद करा आणि या फ्रंटफूट वर......!!
अनय साहेब तुम्ही मंत्र्यांना दोष देत नाही व्यवस्थेला दोषी ठरवता. पण उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यायच्या आधी अशीच परिस्थिती होती. पण योगी आदित्यनाथ यांनी ही व्यवस्था बदलून दाखवली. फडणवीस यांच्या मध्ये ही क्षमता नाही.
Fadanwis ha fakt dealer ahe ani tyanech disha ssr chi case band padliy deal karun to fakt wahtya gangemadhe hat dhun ghet ahe to manus netrutwa hya gunat basat nahi to fakt chatur ahe evdhech 😂😂😂
@@dinkarprabhudesai6638 जवळपास साडे 7 वर्ष फडणवीस साहेब गृहमंत्री पदावर आहेत. अजून किती वर्षे वाट बघणार? अजून किती बळींची आवश्यकता आहे? चार ते पाच मोठ्या माफियांना सरळ केले की सर्व आपोआप सरळ होतील. हेच योगी आदित्यनाथ ने केले. उत्तर प्रदेश मध्ये सर्व माफिया ,गुंड स्वतःहून शरण येत आहेत. कारण बाहेर राहिले तर काय होईल हे त्यांना माहीत आहे.
फडणवीस साहेब आपल्याकडून अशी बिलकुल अपेक्षा नाही. सुशांत आणि दिशाचे मृत्यु लोकं विसरलेली नाहीत. आणि आता पण लोकांना माहीत आहे काय चालले आहे. अजून वेळ गेलेली नाही लोकांना सुशासन पाहीजे, योगी शासन पाहीजे जनता सुज्ञ आहे हे लक्षात असुदेत
या अल्प वयीन मुलांनी काही तासात जितके पैसे उडवले तेवढे अनेकांचं महिन्या भराच उत्पन्न नाहीं. सगळी सिस्टीम कशी हात जोडून सेवेला उभी राहते याचं विमनस्क करणारं हे प्रकरण आहे.
हे बियर दारू बार हुक्का बार पब सरकारला रेव्युन्यु मिळण्याचे त्याचबरोबर तळागाळातल्या राजकिय कार्यकर्ता ते थेट मोठे मंत्री यांना जी अतिरिक्त लक्ष्मी जमा करावी लागते त्याशिवाय ते चांगल्या स्थितीत राहू शकणार नाहीत.तसेच bureaucracy चे गणित आहे.
हि मुळं खोलवर रुजली आहेत, फक्त सरकार सक्षम असून उपयोगी नाही, जनता सदा जागृत पाहिजे, लोकप्रतिनिधी ना जाब विचारायचा हक्क जनतेलाच आहे, त्याचा वापर प्रभावी व योग्यच झाला पाहिजे.
समाजमाध्यमांवर रोष प्रकट करणे हा फार वरवरचा उपाय आहे. उशिरापर्यंत नियमबाह्य रीतीने धंदा करणाऱ्या हॉटेल मध्ये मी न जाणे , हे देखील महत्वाचे आहे. आपल्या अंगाला काहीही लावून न घेता तात्विक विरोध नको.
देवेंद्रजीना एकहाती सत्ता असल्याशिवाय हे बदलू शकत नाही, सत्ताधारी पक्षात पळापळ हे एकमेव कारण आहे,त्यामुळे एकमेकांचे गुन्हे झाकले जाणार, याला नेते तेवढे जनता जबाबदार आहे, कलंकित झालेल्या नेत्याला जेलमध्येच टाकले पाहिजे.