खूप छान त्रिसूत्री दिलीत, हे तर कामाच्या ठिकाणी पण उपयुक्त आहे - १. श्रम - या शिवाय पर्याय नाही २. शोषण - स्वतःचे होऊ देऊ नये ३. निर्मिती - कामात Creativity हवीच धन्यवाद दोघांचे!
राजू सर मी आपल्या खूप साऱ्या मुलाखती, भाषणे, व्याख्यान आपले यू ट्यूब वरील मनातले असे खूप सारे ऐकत असतो तेव्हा माझ्या लक्षात येते की, आपला किती अभ्यास आहे, आपण किती प्रकारच्या विषयावर बोलू शकतात आणि त्या प्रत्येक बोलण्यामध्ये किती संदर्भ किती व्यक्ती त्यांचे विचार, किती पुस्तके त्यांचा संदर्भ असे. सर्व ऐकल्यास असे वाटते तुम्हाला ऐकतच राहावे.
गौतम बुद्ध, चार्वाक, ज्ञानेश्वर, तुकोबांपासून गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकारांपर्यंत अनेकांनी तर्कशुद्ध विचारप्रनालीचा पुरस्कार करूनही, समाजातील मोठा वर्ग बाबा बुवांच्या अधीन का होत असावा, ह्यावर आपण चांगला प्रकाश टाकला आहे. तरीही ह्या विषयाची अजून सखोल मिमांसा होणे गरजेचे आहे.
तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज ह्याची तत्कालीन समाजाने ऊपेक्षा केली होती तुकाराम महाराजांची गाढवावरून धिंड काढली होती तर ज्ञानेश्वर महाराजाच्या बंधुभगिनीनी वाळीत टाकले होते येशूला तर क्रुसावरची शिक्षा दिली आज समस्त खिश्चन जगत त्याला देव मानतात संत ह्या जगातुन गेल्यानंतर त्यांची महती गायली जाते मी बुवाबाजी वर समर्थन करत नाही पण सरसकट सगळेच वाईट नसतात काही संत आजही आहेत ते एकांतात त्यांची साधना करतात
Khupach jast samaajwaadi vichar pan ghatak aahe joparyant kahi implement hot nahi... Ugach stock market va private company switch karun je paise kamvata tyana ha manus trasdayak watato...
या बाबा बुवाला निर्माण करण्यासाठी " आपली समाजव्यवस्था " जबाबदार आहे..!!! यावर खूप प्रबोधन होणे गरजेचे आहे..व हे फक्त आपल्यासारख्या उच्चविद्याविभूषित मंडळीच करू शकतात...!!! जय संविधान....!
बाबा बुवांच जे काही चाललंय त्याचा समाजाला तोटाच होतो त्यामुळे अंधश्रद्धा जास्त वाढतात टीव्ही सिरीयल मुळे सुद्धा खूप अंधश्रद्धा वाढतात याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असे वैचारिक कार्यक्रम जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे परुळेकर सर तुमचा कार्यक्रम खूप खूप आवडला🎉
आजच्या ह्या बुवा,बापू,अम्मा टमा च्या काळात लोकांना शहाणे करणे हेच खरे समाज कार्य, "बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून हा कळवळा" All the best ! Keep it up !💖💐🙏
19k views पाहून थोडा तरी बर वाटलं की आपल्यासारखे विचार करणारे 19k तरी मराठी लोक आहेत बाबा🙏🙏नाहीतर आपण कुठेतरी चुकत आहोत का असा वाटत राहायचं कधीतरी ..पण नाही असे प्रॅक्टिकल विचार करणारे लोक ही आहेत आणि ही संख्या वाढावी अशी अपेक्षा 🙏🙏🙏
श्रद्धा आणि अंध श्रद्धा... खूप फरक आहे. परीक्षेला जाताना नीट अभ्यास करून सुद्धा , जाताना देवाला नमस्कार करून जाणे= श्रद्धा अभ्यास न करून, देव पूजा करून "देवा मला पास कर" = अंध श्रद्धा.
धर्म म्हणजे जबादारी. थोडक्यात मुलांचं पालन, पोषण, चांगल शिक्षण देणे हे आई वडिलांचा धर्म आहे. ग्राहकाला चांगली सेवा देणं हे एका व्यावसायिकाचा,दुकानदाराचा धर्म आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचं जीवन सुखकर करणे हा लोकप्रतिनिधीचां धर्म आहे. पत्रकाराचा धर्म हा लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्याच्यात जनजागृती करणे हाच आहे. या सगळ्याच सार एकच आहे . लोकांनी लोकांचं जीवन हे सुखकर करणे हाच आहे.
राजू परुळेकर सर तुम्हाला वैज्ञानिक आणि चिकित्सक दृष्टीकोन मिळाला. सर्वांना कसा लाभेल ? आणि तुमच्यासारखी सुसंस्कृत,मनाने आणि विचाराने समृध्द माणसे कशी होतील?माणसाला खरा माणूस कसं जगायचं, कुठल्याही देवाचा व बुवांचा आधार न घेता निर्भय आनंदाने समृध्द कसं जगायचं, हा सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे.हीच खरी प्रचिती आहे. धन्यवाद.
An eye opener, श्रावण चालू आहे आणि मी पाळत ही होतो पण मी उद्या जाऊन मस्त तंदुरी चिकन आणि त्यानंतर साजूक तुपातली हाफ चिकन बिर्याणी खाणार आहे... माझे डोळे उघडल्याबद्दल थॅन्क्स राजू जी, आणि मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद प्रथमेश 🙏🙏🙏🙏🙏🙏
यांनीतुझेडोळे उघडले की पूर्णच बंद केले यांच्या मुलाखती मुळे तू तर हिंसक झाल निष्पाप जीवाला भाजून खायला निघाला तू यांचा मुलाखती मुळे तुझी तर चेतना मरून गेली
garaj nastaanaa nishpaap zhaadana kapun building bandhne parprantiya lokaan saathi tey tyaahun mahaapaap aahe. BJP-RSS waalyani Maharashtra cha gaipatta karne band karawe.. SS aani NCP mule Maharashtra che zaale le nuksaan pure zaale aata.
धर्माची नाही तर शरीर धर्माची व्याख्या समजून सांगितले नाहीतर आज लोक प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागलेले आहेत स्वतःचा मेंदू गहाण ठेवून बुवाबाजी लोकांच्या नादी लागत आहेत परुळेकर सर धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि खरचं अशी माहिती एवढी प्रखड पणे सगण्यासाठी तर हा काळ निश्चितच अनुकूल नाही तरी पण सर तुम्ही ते धाडस करता आहात खरचं खुप खुप धन्यवाद सर
धन्यवाद Indiu jou व आ.परुळेकर सर किती सोप्या आणि सुटसुटीत सहजतेने कळेल असे विश्लेषण आपणं प्रश्नाचे समर्पक उत्तरे देऊन केली आहे....या विषयाची गरज आहे खुप
पुरोगाम्यांना मानवी बुद्धी दिसते, मन हे अतिशय किचकट आहे. मीही काही दिवस माझी श्रध्दा दूर ठेवलेली...म्हंटलं चला आता फक्त तर्क, बुद्धी. वैगेरे वैगेरे...पण ते चूक होती. प्लेटो सांगतो तसा..."Understanding the moment ". Emotions आणि rationality कधी वापरायची हे आपल्याला कळल पाहिजे. कुठेतरी श्रद्धा असलीच पाहिजे. बाकी पुरोगाम्यांनो...तुमच्या विचारांचा आदर आहे. पण तुम्ही सगळ्या श्रद्धाळू लोकांना एका पंक्तीत बसू नका. तुम्हाला लांबूनच राम कृष्ण हरी ❤
इंडिच्या स्टुडीओत 2/ बाबा बसल्या बसल्या आमचे कान टोचतायत , डोळ्यात अंजन घालता यत अन् तेही फुकट कोणताही नवस न करता दोन बाबांची प्रचिती आम्हाला आली याची देही याची डोळा असेच विविध विषयावर तुमची वानी ऐकायला कान नेहमीच आतुर असतात .
परूळेकर एकदम चार्वाक सिद्धांत फॉलो करतात. I always criticized him but this discussion was insightful, पण त्याचा मध्ये एक मुद्दा हा आहे की मार्क्स चां सिद्धांत वर चालून एक ही succesful देश जगाच्या पाठीवर नाहीये म्हणुन कदाचीत लोक ते accept करतं नाही. भरताचा बाबतीत हे आहे की जर मुस्लिम मौलवी आणि ख्रिस्ती पास्टर जास्तं aggressive झाले की हिंदु बाबा जास्तं जवळ वाटायला लागतात कारणं competative Survival Instinct आहे. हे तर्किकी बोलणं चांगलं आहे पण हे विचार विकणं कठीण आहे.
बुवा, बाबा चा मागे खूप लोकं लागतात, गैरसमज, अंधश्रद्धा मुळे, मनःशांती साठी वाचन करा, श्रद्धां ठेवा, अंध पणा नसावा. मनाचे उपचार गरज आहे, ते आपण स्वतः मनावर घेऊन केले पाहिजे त,योगासन, व्यायाम गरज आहे. चांगला विषय होता.