हात पाय धड होते तेंव्हा नोकरीमुळे वारीसाठी वेळ नव्हता.आता सेवानिवृत्ती नंतर वेळ आहे पण हात पाय धड नाहीत.तुमच्या सरख्यांचे चॅनल पाहून घरबसल्या वारीचा आभासी आनंद मिळेवतो.आभार.
रवी दादा तुमच्यामुळे आम्ही अख्खी वारी अनुभवतोय. खूप छान उपक्रम तुम्ही घेतलाय हाती. आभार तुमचे धन्यवाद तुमचे. वारकऱ्यांचे अनुभव ऐकून खूप उत्सव येतो. त्यांच्यातील पांडुरंगा विषयीची जिद्द किती ठाम आहे जय हरी विठ्ठल.
माऊली चे चरणी नंदेडकरांचे है समर्पण व सेवा पाहून मन अगदी भरून आल, अती आनंद झाला. नांदेड चे नाव वारकर्या मार्फत गाव गाव जात आहे याचा एक नांदेडकर म्हणून मलाही अतिशय अभिमान वाटला.जय हरी माऊली.जय हरी.
रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.खुप छान व्यवस्थापन.माऊली क्षणोक्षणी तुमच्या पाठीशी आहे.
काय ते नियोजन काय तो सगळा देवावर चा विश्वास एवढा समाज एकत्र येऊन सेवा देतोय काय ती शक्ती असेल माऊलीन ची रामकृष हरी सर्वांना 🙏🙏 जे म्हणतात ना की देव नाही त्यांना हे सगळे पाहा म्हणावं सगळेच माऊली आहे नीट पाहा दिसतील . अंगावर काटा येतो हे सगळे पाहून
३०लाख खर्च? अन्नदानाची ,सत्कार्याची किंमत पैशात करू नये. केलेल्या सत्कार्याची किंमत आपण केल्यावर केलेल्या पुण्याची किंमत केल्यासारखे होते. केलेल्या सत्कार्याचे पुण्य परमेश्वर देईलच.पैशा पेक्षा पुण्याचे महत्व फार आहे.
एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. दानाचे प्रदर्शन, जाहिरात केल्याने प्रसिद्धी च्या हव्यासापोटी, स्वार्थासाठी अन्न दान केले , असा त्याचा अर्थ होतो.आणि स्वार्थी उद्देशाने केलेल्या दानाला काही अर्थ नसतो. दान निस्वार्थी भावनेने करावे असे अध्यात्म सांगते. आपण अन्नदान करत आहात हे सत्कार्य आहे त्याचे पुण्य परमेश्वर तुम्हाला देईलच.