पुर्वी कोल्हापूर शहराची व सध्या कळंबा गावाची जीवनदायिनी म्हणून ओळखला जाणारा कळंबा यंदा १४९ व्या वर्षांत पर्दापन करत आहे.
संस्थाकाळात याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.पांढरी माती, घडीव दगड,सिसम,चुना यामध्ये केलेले तलावाचे बांधकाम अजूनही भक्कम स्थितीत आहे.
करवीरचे चौथे शिवाजी यांच्या कारकिर्दीत तलावाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इंजिनिअर मेजर स्मित रॉयल यांनी तलावाची जागा निश्चित केली. तसेच कागलचे श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब यांच्या देखरेखीखाली २१ मार्च १८८१ ला या तलावाच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला आहे.एक जुलै १८८३ ला या तलावाचे बांधकाम पूर्ण झाले.
पावसाळ्यामध्ये कात्यायनी डोंगरावर पडलेला पाऊस ओढा नाल्याद्वारे सरळ तलावात मिसळेल इतकी सुंदर नैसर्गिक रचना केली आहे.
त्यावेळी तलाव बांधणीसाठी प्रगत तंत्रज्ञान नव्हते म्हणून अनेक बैल जोड्या कारागीर व कळंबा ग्रामस्य यांच्या मदतीने तलावाचे बांधकाम पूर्ण केले आहे.
14 окт 2024