शिरोळला तीन दिवस मुक्काम करून परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज पंढरपूरला जाण्यास निघाले. रात्री स्वनात एक आजानुबाहू पुरूष आले ते म्हणाले, “आपण सर्वत्र संचार करता काव्य ही करता आपले आमच्याकडे लक्ष आहे की नाही? आपण आमचे चरित्र काव्य रूपात लिहावे.” तेव्हा देवांनी आदेश दिला की ऊत्तरेला जातांना आधी अक्कलकोटला जावे.
श्रीदेव श्री स्वामी महाराजांना म्हणाले की अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थाची ईच्छा आहे की आपण अक्कलकोटला यावे आणि आपले चरित्र काव्य रूपात लिहावे. श्री स्वामी महाराजांना अत्यानंद झाला की श्री स्वामी समर्थांचा नश्वर देह जाऊन आता सत्ताविस वर्षे झाली, तरी त्यांना आपली आठवण यावी त्यांनी आपल्याला स्वनात येऊन दर्शन द्यावे हे माझे केवढे भाग्य! श्री स्वामी समर्थांचे अभय आश्वासन देणारे "भिऊ नको मी पाठीशी आहे " ह्या वचनाचे स्मरण करीत स्वामी महाराज अक्कलकोटच्या त्या पवित्र वटवृक्षाखाली येऊन ऊभे राहिले. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने स्वामी महाराज पुलकित झाले.
3 окт 2024