मन स्थिर असेल ती संत अवस्था - चैतन्य महाराज देगलूरकर
मन शांत करायचे असेल, तर ते परमार्थाला द्यावे, वस्तू किंवा पदार्थांमध्ये मन अडकते. मात्र ते जास्त दिवस अडकत नाही. मात्र परमार्थामध्ये तसे हाेत नाही. एकदा मन अडकले, की त्याची आस कमी न हाेता ती वाढतच राहते. परमार्थ आत जेवढा गाेड तेवढाच पुढेही त्याचा गाेडवा राहताे, ताे कमी न हाेता, वाढतच जाताे. परमार्थ करायला मन लागते, मन हेच भांडवल आहे. मनाचे फूल बनवून ते देवाला समर्पित केल्याने देवाचा अभिषेक हाेईल. शरीर स्थिर असते मात्र मन फिरते, शरीर फिरत असेल, मात्र मन स्थिर असेल ती संत अवस्था आहे. असे प्रवचन करताना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले.
हुतात्मा स्मृती मंदिरात श्री रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानतर्फे तीन दिवसांपासून मनाची चंचलता आणि स्थितरता यावर चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन आयाेजित केले हाेते. या प्रवचनाच्या समारोपप्रसंगी ते बाेलत हाेते.
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
Twitter:- / yesnewsmarathi
shivaji survase 9881748329
★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
6 сен 2024