ज्या लोकांनी तुम्हाला ह्या सुंदर वासराला सोडून द्यायला सांगितले ते सारे उलट्या काळजाचे होते. तुमचे धन्यवाद की तुम्ही या वासराला इतका जीव लावला आणि याची इतकी छान जपणूक करत आहात. देव तुम्हाला आणि या गोड वासराला उदंड आयुष्य देवो. तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना.
तुमच्या कार्याला सलाम , परंतु हे नैसर्गिक आहे,तो अर्धनारीनटेश्वर आहे ज्यापासून घर्भची इच्छा तुम्ही ठेउ नका आणि प्रयत्न कराल तर ते त्यावर एक्सपेरिमेंट केल्यासारख होईल जो एकप्रकारचा अत्याचार आहे. ,जे करू नका। तो जसा आहे.तसंच त्याला acsept करा,तुमच भाग्य आहे.🙏
किशोर सर आपण योग्य केलात... एका मुक्या प्राण्याचे आशिर्वाद आपणास नक्कीच मिळतील...समाजात कापताना लोकांना पाप लागत नाही तर सांभाळताना दोष लागतो का? आपल्या या धाडसी आणि प्रेरणादायी कार्यास मनापासून सलाम...
दादा तुला साक्षात आशिर्वाद आहे कारण लोक गाई दुध देणे बंद झाली तसेच बैल म्हातारा झाला की खाणे, पिणे बंद करतात देत नाही. सोडुन देतात. तु असे असुन सोडुन दिले नाही. मुळ जनावाराचा आशिर्वाद आहे. माझ्या शुभेच्छा. तुला कशाचीच कमी पडणार नाही पहा.
किशोर माझ्या भावा ! निसर्गाने ह्या जिवावर अन्याय केलाय परंतु त्याच निसर्गाने त्याचा सांभाळ करायला तुझी नियुक्ती केली आहे ! तुझी तळमळ पाहून समाधान लाभले 🙏
महादेवाचा नंदी आहे...हे आदभुत व दैवी आसुन...निसर्गाचा आविषकार आहे.....दैवि आवतार आहे...श्री पायगुडे आपण मुक प्रण्याची सेवा करता यासाठी तुमचेआभार...!🙏🙏 तुमच्या या सेवेला सँल्युट.🙏🙏🚩🙏🙏 तुमला धन्यवाद....!
व्हेटर्नरी साठी हे एक आव्हान आहे. कृपया महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशातील तज्ञांनी हे आव्हान स्वीकारावे. आणि या पशूपालकाची तळमळ पूर्ण करावी. खिल्लार मालकाच्या तळमळीला एकविस तोफांची सलामी.
मालकाचे मनपूर्वक अभिनंदन खूप चांगला विचार जोपासताय तुम्ही आणि खिल्लार महाराष्ट्राची शान यांचेही आभार ज्यांच्यामुळे आज या अद्वैत जनावराला प्रसिद्धी मिळतीये🚩🚩🙏🙏
आपण खरच ग्रेट आहात.. हा एक निर्दोष निरागस जिव आहे.. याला आयुष्यभर संभाळा.. तुमचा हा जन्म सार्थकी लागेल.. हे सात जन्माचे पुण्य आहे.. याला आपत्य होवो अगर ना होवो पण तरीही तुम्ही त्याला निरपेक्ष भावनेने संभाळा.. त्याचे तुमच्याशी पुर्व जन्माचे नाते आहे म्हणूनच तो ओघाने तुमच्या कडे आला आहे.. त्याला चांगले संभाळा तुमचे कल्याण होणारच आहे.. हा तुमच्या आयुष्यातील एक पुण्य कमवण्याचा दुर्मिळ योग आहे..
हा एक अद्भुत चमत्कार आहे भाऊ. अशा दिव्यांग जीवाला सांभाळण्याची जबाबदारी /संधी परमेश्वरान तुम्हांस दिली आहे. आणि तुमची निवड करून परमेश्वर नक्कीच चुकलेला नाही. 🙏🙏
पायगुडे साहेब, मला अभिमान वाटला तुमचा. खुप पुण्याचं काम करत अहात आपण, आपण तर एका प्रण्याबद्दल एवढी सहानुभुती दाखवली आहे. हेच विचार लोकांनी माणंसांबाबत केले पाहिजेत.
हा खिल्लार बैल असो की गाय पण तुम्ही लोकांच न ऐकता त्याचा सांभाळ केला आणि त्यांचे हाल होण्यापासून तुम्ही त्याला वाचवले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
साक्षात देवान तुमची परीक्षा घेतली आहे दादा आणि तुम्ही त्यात पासपण झाला आहे, मला एवढच म्हणायच आहे की तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही, साक्षात देवान परीक्षा घेण साधी गोष्ट नाही तुम्ही खुप भाग्यवान आहे 🙏🙏👍👍🙌🙌🙌🙌🙌
वा ! खुप छान , किती शुद्ध हेतू आणि निस्वार्थ पणे सेवा करत आहात खिल्लार ची "ह्याला म्हणायचं जातीवंत अस्सल प्रामाणिक खिल्लार प्रेमी" अश्या माणसांची गरज आहे आपल्या खिल्लार ला 🙏
किशोर पायगुडेजी आपले पशुप्रेम पाहुन आनंद झाला. आर्धनारी नटेश्वर हे शिवाचे रुप आपल्याकडे आहे हे भाग्याचे लक्षण आहे. त्या रूपाची केलेली सेवा आपणास काही कमी पडू देणार नाही ही खात्री बळगा
दादा अगदी मनापासून आभार आणि अभिनंदन अहो असे अपत्य मानवाच्या पोटी जन्माला आले तर फक्त शेजारी आणि समाज काय म्हणेल या भीती पोटी पोटचा गोळा रस्त्यावर सोडून द्यायला लावतात अशा पालकांना तुमच्या सारखे धैर्य मिळो हीच प्रार्थना
जसे मनुष्य योनीमध्ये पुरुषही नाही व स्त्रीही नाही असे नपुसकलिंगी किंवा थर्ड जेंडर किंवा ज्याला आपण छक्का म्हणतो अशी जमात असते. ज्यांच्यामध्ये स्त्री व पुरुष असे दोघांचेही अविकसीत अवयव असतात त्यातलाच हा प्रकार आहे. हा अर्धनारी नटेश्वर किंवा छक्का बैल असे म्हणता येईल.
भाऊ , आपले खुप मोठे व दिलदार मन आहे. पुर्ण बैल पण नाही व पुर्ण गायी पण नाही असा जिव आपण सांभाळत आहे . कोणताही अपशकुन नाही , उलट शुभशकुनच आहे .आपले मनापासून धन्यवाद 🙏
पहिल्या दा अस खिल्ली बघायला मिळाले. सर धन्यवाद. दर्शन मिळाले. हे संगम युग आहे. आपल्या कडे जल्माला आले.मेहनत करा.नक्कीच आपल्याला देव चांगले फळ देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना
किशोर साहेब, हा निसर्गाचा चमत्कार वगैरे काही नाही. जसे मनुष्यात तृतीयपंथी जन्माला येतात तसेच हेही असावे असे मला वाटते. याला घरी ठेवण्यात, पाळण्यात काहीही नुकसान नाही, ती अंधश्रद्धा आहे. तुम्ही चांगल्या विचारांनी, लोकांच्या सूचना न ऐकता याला पाळलेत हे खरंच चांगली गोष्ट आहे.
किशोर जी श्रावण महिन्यामध्ये आपण याचे दर्शन दिले हा खरोखरच ईश्वरी अवतार आहे आपण त्याची सेवा करत आहात आपल्याला खूप खूप धन्यवाद हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवे
पायगुडे पाटील धन्यवाद नमस्कार आपल्या हातून फार मोठी पुण्याचं काम होत आहे तसेच सुख-समृद्धी आणि पैशाचा पाऊस पडणार तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही संकटामध्ये तुम्हाला देव मदत करणार अशीच आमच्या चुलत भावाने खिलार आमच्या इकडे अशा गायला वंडा गाय म्हणतात त्यांनी शेवटपर्यंत संभाळली आज त्याच्याकडे खूप संपत्ती समृद्धी आहे आणि समाधान कुटुंबामध्ये सर्व गोष्टी त्यांना प्राप्त झाल्यात पुण्यवान माणसाच्या नशिबी असे गाये ती राम कृष्ण हरी
ना गाय ना बैल असुनही तुम्ही त्याचा त्याग ना करता त्याला चारा पाणी देऊन वाढविलत ते पण कुटुंबातील समजून.त्यासाठी निस्वार्थ प्रेम भावना तुमच्या कडे आहे. बस कोणाही जिवाचा ना घडो मत्सर या संत उक्ती प्रमाणे.आपणास खूप धन्यवाद.
नमस्कार. पायगुडे तुम्ही जी माहिती दिली...ती ऐकून खरच आश्चर्य तर वाटले पण तुलना करायची झाली तर(साक्षात...शंकर. पार्वती आहे )!!! शिव शक्ती आहे हर हर महादेव....पार्वतीमाता की जय👌😍😍
निसर्गाचा हा एक चमत्कार आहे, कदाचित बैलांच्या नशिबी केवळ कष्ट करणे एवढेच असतं त्यांचा वंश पुनर उत्पादनाचा हक्क क्रुर मानवाने हिरावून घेतला आहे. यातुनच अशा बैलाची उत्क्रांती ची ही प्रथम पायरी असू शकेल.
पयगुडे साहेब तुमच्या सारखे विचार करणारे खूप कमी लोक असतात आणि अशीच लोक जीवनात खूप मोठी होतात तुमचा विचार खूप मोठा आहे निसर्ग तुमचं चांगले करेल देव तुमचे चांगले करेल
हरि ओम श्रीराम.......प्राणीमात्रा वर दया व प्रेम आपण भरभरून करीत आहात.....तुम्हाला निरोगी आरोग्याचे वरदान लाभो , अन दीर्घायुष्याचे दान परमेश्वराने देवो, ही ईश्वर चरणी प्रार्थना ....हरि ओम श्रीराम.
खरोखर धन्यवाद सर,आपण स्वतः वर विश्वास ठेवा, बाकी गेले उडत, काही लोक फक्त दुसर्यांना नाव ठेवण्यासाठी जन्माला येतात,,,,भाऊ मी तुम्हाला काही दिवसातच तुमचं भविष्य सांगतोय,,,,हां बैल तुम्हाला भरगच्च तुम्हाला,तुमची व त्याची ओळख जगभर करुन दाखविल,,,,, हे जनावरे खुप ईमानदारी दाखवतात,तसा माणूस खुपच उपकार ईसर्या असतो,,, तेव्हा विनंती आहे भाऊ तुम्ही जनावराला विकु नका? पैसा आज आहे उद्या नाही, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा,,, हे तिरीकाल सत्य आहे.,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.