सर खरंच तुम्ही ऑलराउंडर आहात. तुमचा अभ्यास व अनुभव एवढा जास्त आहे की तुम्ही कोणत्याही विषयावर भरपूर वेळ बोलू शकता. लग्नाचा विषय देखील तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील तर आम्हा तरूणांना आमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप मदत होईल.
नमस्कार सर,खरच तुमच मार्गदर्शन खुप मोलाच आहे.तुमचा तो दर्द भरा आवाज,अगदी कलवलीन सांगण खरच खुप मोलाच आणि आवडिच वाटत.तुम्हाला मी मनापासून सैलूट करतो कारण मी एक रिटायर्ड वायुसेना अधिकारी आहे.खरच या dhkadhkichya काळात तुमच्या सारख्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे, ते पण युवा पीढ़ी ते vayovrdh लोकांना सुद्धा.परत एकदा तुम्हाला सलाम।
बरोबर आहे, सर्व प्रथम समाजाला प्राधान्य दिले पाहिजे. नाही तर समाजात किंमत शून्य होते, आणि सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे मिळत नाही, "आयुष्यात एकमेकांना जर समजून घेतले" , दोन्ही बाजूंचा समान विचार केला,तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत..एवढं मी ठामपणे सांगू शकतो... शिवाय २/३ विवाह संबंध घटस्फोट ( स्टॅंप पेपर तयार करण्यात आले होते, फक्त दाखल करायचे बाकी होते ) घ्यायला तयार झाले होते, अशा वेळी ते सामंजस्याने सोडविण्याचे काम परमेश्वराने माझ्याकडून करवून घेतले, आणि आज ते सुखाने व आनंदानें संसार करत आहेत, याचा आनंद आहे.
सर, छान माहिती उत्तम प्रकारे व्यक्त केली आहेत. पालक व तरुण पिढीला याची खूप गरज होती. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पहिला व ज्यांनी कंमेण्ट ही केली आहेत त्यांनी खरच काही बाबी आचरणात आणावे या मध्ये मुलगा किंवा मुलगी असो....दोघांनसाठी ही उपयुक्त आहेत. धन्यवाद.. तुम्हां सर्वांना योग्य जोडीदार शोधण्यासाठी All The Best.
साधं मुली सोबत बोलण्याची परवानगी सुद्धा नसते सर आज समाजाच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत मुली पेक्षा मुलीच्या बापाच्या अपेक्षा जास्त आहेत त्याना सरकारी नोकर च हवा असतो आज काल मुलगा होतकरु आहे का निर्वेसनी आहे का याचा काही देणंघेणं नाही फक्त जमीन नोकरी याला प्रथम प्राधान्य आहे ही लग्नाची परिस्थिती आहे
कितीही विचार केला तरी काळानुसार अनेक गोष्टी बदलत जातात जे आपल्या हातात कधीच नसतात त्यामुळे अति विचार न करता वेळेवर लग्न करायला हवे आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करायला हवा... एक महिना भेटीगाठी घेऊन सुद्धा समोरची व्यक्ती कळण्याची शक्यता अतिशय कमी असते
लग्न ही संकल्पना फारच सुरेख आहे तसच ती किती अडचणी ची होऊ शकते हे फार छान,सोपे करून सांगितले...सगळ्यांनीच येव्हढा समजुतदारपणा दाखवला तर जग सुंदर होऊ शकत.धन्यवाद 🙏
🙏 मनाला त्तास देणारा सुंदर विषय निवडला. हे नविन Generation ऐकाला हव. त्याना जबाबदारी नको. मुलीना चाळीतला मुलगा नको. Flat वाला मुलगा हवा. मुलगा एकटा हवा. मुलीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलं घाबरतात.
एवढं कधीच भेटता येत नाही.फक्त एकदाच सगळ्यांच्या समवेत पाहणं अन पसंद करणं एवढंच घडतं.एकच भेट तीही थोडक्यात ही आपली परंपरा आहे.खरतर काळाची सुसंगत नाही.म्हणून तुम्ही जे सांगता आहात ते सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी एकावं.