मी अमित भोईर ,मूळ नवी मुंबईकर आग्री बाला.मागची आठ नऊ वर्ष आम्ही विनीपेग,कॅनडात राहतोय.बऱ्याच वेळा माझे मित्र ,नातेवाईक मला विचारतात की इतक्या थंड वातावरणात तुम्ही रोजची दिनचर्या कशी पार पाडता?.त्यावर दृश्य उत्तर म्हणून मी एक छोटीशी व्हीडिओ ची मालिका बनवतोय. त्या सदरातील हा दुसरा व्हीडिओ ,"रस्त्यांवरील आणि घराभोवतीच्या परिसरातील बर्फाचे काय करता?".इथे राहून इथल्या वातावरणाची,थंडीची आम्हाला सवय झालेय. त्यामुळे हे सगळं आमच्या रोजच्या दिनचर्येचा भाग आहे. मुंबई मुसळधार पावसातही थांबत नाही तसं अगदी उणे ४०/४५ तापमान असलं तरी शाळा,कॉलेज कार्यालये नेहमीप्रमाणेच चालू असतात.फक्त अंगावर योग्य आणि पुरेसे उबदार कपडे असले की झालं.फक्त इथे पाश्चात्य देशात राहण्याच्या फायद्यांबरोबर काही जबाबदाऱ्या सुदधा येतात,विशेषतः सुजाण जबाबदार नागरिक होण्याच्या जबाबदाऱ्या. तुमचं शहर, घर आणि आजूबाजूच्या परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचं काम फक्त सरकारच नव्हे तर तुमचं सुद्धा असतं.
20 янв 2020