आपल्या परिवारातील व्यक्तीचा मृत्यु झाला की आपल्याला दुःख होते म्हणुन आपण दुःखवटा पाळतो मग आपल्या संभुराजांची हत्या झाली ते दिवस दुःखद की सण साजरा करायचे ?
देशाच्या हिंदू थोर माणसांना हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या दिवशी कुणाला ना कुणाला देशाच्या दुश्मनांनी मारले आणि आपण म्हणल्याप्रमाणे सण साजरा नाही करायचे म्हटले तर थोर नेत्यांच्या जयंत्या वाढदिवसाच्या दिवशी आवडत्या माणसाला मारले तर त्या थोर नेत्याची जयंती साजरी करायची का हाही प्रश्न निर्माण होईल हिंदूंचे चेहरे नेहमी दु:खी ठेवण्याचा कुणीतरी औरंग्या करतोय हे छत्रपतींना सुध्दा आवडणार नाही
खरंय दादा, गुढी उभारण्याची परंपरा प्रभू श्री रामचंद्रांपासून आहे. लंका विजय करून जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र आयोध्येला आले तेव्हा त्यांचे स्वागत गुढ्या - तोरणे उभारून करण्यात आले.
आपल्याला संभाजी महाराज जवळचे का राम आणि जर तस असता तर अयोध्येत गुढी पाडवा साजरा केला असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात आज कोणाचा मृत्यू झाला तर लगेच उद्या सण साजरा होतो का तसा असेल तर साष्टांग दंडवत नमस्कार तुम्हाला
@@ananya1765 ज्या राजाने आपलं रक्त पाण्यासारख या स्वराज्यासाठी वाहिल त्याच्यासाठी एवढ ही करू शकत नाही अगदी सडेतोड उत्तर दिले 🚩🚩जय शिवराय, जय शंभुराजे🚩🚩
ह्या वर्षी नवीन स्टोरी ऐकली , असुदे आम्हाला कुणाच्या विजयाची प्रतिका उभारून आनंद साजरा करण्यापेक्षा पेक्षा दुसरे छत्रपती संभाजी महाराज याच्या हत्येचे दुःख पाळणे जास्त महत्वाचे आहे .
अगदी योग्य ते सांगितले आपण. हलकट ब्रिगेडच्या कानाखाली सणसणीत लगाउन दिली. छ्त्रपती शिवाजी महाराज व छ्त्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्म, परंपरा, रीतिरिवाज, सण यांचा कायम आदरच केला आहे... 🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवराय
सर आपले महाराज म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक वास्तविक स्वप्न आणी त्यांच्या इतिहासात एवढी भेसळ छत्रपति संभाजी महाराजानी अशक्य ते शक्य करून दाखविले आणी आपल्याला त्यांचा खरा इतिहास पण माहिती नाही पण तूम्ही महाराष्ट्राला मराठ्याचा खरा इतिहास सांगता Thnx for it
छान दादा ए तो सासीक व धर्मशास्र लिखाणातून पुरावे दाखवून आपण सत्य सिधू केल शंका निरसन केली आपली संकृती गुढी पाडवा साजरा करून गुढी उभारू प्रत्येकाने साजरा निशः क व्हावे
अहो पाटील तुम्हाला समजतंय का गुढी पूर्वी अशी साजरी केली जात नव्हती आणि मला सांगा तुमच्या घरात आज कोणाचा मृत्यू झाला तर लगेच उद्या आपण सण साजरा करता का?
छान मित्रा.... असे संदर्भ देऊन व्हिडिओ दाखवल्याबद्दल...काही ठराविक लोकांना ही सणसणीत चपराक आहे... कारण आजकाल कोणीही उठसूठ व्हिडिओ बनवतो आणि लाईक्स साठी काहीही दाखवले जाते....
गौतमी पुत्र सातकरणी हा बौद्ध धर्मीय राजा होता त्यांचा विजया नंतर ध्वज उभारले गेले होते गुंड्या नाही (उलटा तांबा (कलश ) साडी नाही कसला पण इतिहास सांगू नका ज्ञानेश्वर महाराज सुद्धा भगवं ध्वजला गुडी असं म्हणतात सगळे संत पंढरपूर ला जाताना खांद्यावर भगवं ध्वज घेऊन जायचे इतिहास सांगताना पुरावे नुसार सांगा इथहासला भूगोल सुद्धा लागतो सत्य काय आहे ते पोहचवा
कुठला इतिहास वाचून असली शब्दसुमन उधळताय दादा? गौतमीपुत्र सातकर्णी बौद्ध नाही तर ब्राह्मण होता, विश्वास नसेल तर त्यांचे शिलालेख वाच. उगाच आभाळ हेपलण्याचा प्रयत्न करू नये...
सर तुम्ही छान पुरावा देऊन सगळे पटवून दिलं बरोबर आहे परंतु मराठा समाजामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ज्यावेळेस हत्या झाली तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा आदला दिवस म्हणजेच एक दिवस अगोदर मग हिंदू धर्माप्रमाणे जर पाहिलं तर मराठ्यांना सुतक धरायला पाहिजे किंवा नाही याचे उत्तर द्या सर मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे मी मी खानदानी धर्म जात मराठा
श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत चैत्र शुद्ध प्रतिपदेला आले म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी गुढ्या,तोरणे उभ्या केल्या,असाही उल्लेख पुराणात मिळतो🙏🏻🚩
मंदिरावर जसा कलश असतो,तसाच गुढीवर कलश म्हणून तांब्या ठेवला जातो.राहिला प्रश्न साडीचा तर साडी नसते त्याजागी भगवा ध्वज असतो पण भगवे वस्र उपलब्ध नसल्यामुळे पुर्वी घरातील नवे वस्त्र लावण्याची परंपरा पडली असावी.
पण असं असते तर मग श्रीरामाच्या अयोध्या नगरीत सर्वांत मोठी गुढी दरवर्षी उभारलेली दिसायला हवी होती पण कधी दिसली काय ऐकली सुद्धा नाही पण महाराष्ट्रात मोठ्या गुढ्या उभारल्या ऐकलं सुद्धा आणि बातम्यात पाहिलं देखील.......
आणि मूळात आपल्याला राम जवळचा का संभाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे ते आणि रामायण पौराणिक आहे आणि संभाजी महाराजांचा काळ ऐतिहासिक रामानंद सागर ह्यांची मालिका रामायण सर्वात प्रसिद्ध आहे हे सुद्धा म्हणतात रामायण इस mythological ज्याचा काही पुरावा नाही
रामो विग्रवान धर्म आणि त्या धर्माच्या निष्ठे पोटीच संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आम्हाला दोन्ही जवळचेच उगीचच तू नको तुझा शहाण पणा दाखवू😂 सगळी कडे कमेंट करून... @@ananya1765
भाऊ विषय हा आहे की औरंगजेबाने गुडी पाडव्याचे औचित्य साधून ही हत्या केली आणि त्या दिवशी ही घटना घडली म्हणून मी तो दिवस मराठा साम्राज्यातील काळा दिवस वाटतो...काय चुकलं आमचं सांगा जरा
सर बरोबर आहे ही परंपरा जपली पाहिजे पण गुढीवर तांब्या लटकवणे पेक्षा भगवा झेंडा उभा करून गुढीपाडवा साजरी करा संभाजी महाराजांच्या बलिदानाचे त्यांच्या शौर्याचे अभिवादन करण्यासाठी भगवा झेंडा उभा करून साजरा करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
व्हिडिओ छान बनवली आहे. ह्यात अजून श्री राम जेव्हा अयोध्या नगरीत पुन्हा आले तेव्हा सर्वांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते हा उल्लेख आपण करू शकतात.
दादा आपन कोणतेही शुभ कार्य करताना कलश हा पुजतो मग नविन वर्षाची सुरुवात करताना तोच कलश उलटा का पुजावा या पेक्षा भगवा ध्वज लावुन गुढी उभा केली तर चालनार नाही का व तोच कलश आपण सरळ हि पुजू ला तर
अरे तांब्या म्हणजे नीवारा साडी म्हणजे वस्त्र साखरेच्या घाट्या म्हणजे अन्न व गोडव्याच प्रतीक अन्न वस्त्र निवारा या मानसाच्या मुलभुत गरजा आहेत लिंबाचा पाला आरोग्याच प्रतिक काठी ईश्वरीय आधाराच प्रतिक आहे आपण नव्या वर्षी गुढिची स्थापना करुण हे प्रतीकात्मक मागने ईश्वराकडे मागत असतो की वर्षभर अन्न वस्त्र निवारा आरोग्य व तुझा आधार आम्हाला मिळत राहो
मी ही चित्रफित ऐकली! त्या मध्ये तुम्ही गुढी पाडवा सणाला १००० वर्ष लिखित पुरावा दिला आहे. तो योग्य पण मानला. पण महाराष्ट्र हे एकच राज्य आहे, की तिथे गुढी पाडवा साजरा केला जातो. बाकी उर्वरित भारतात हिंदू नववर्ष साजरे केले जाते. मग हा फरक का आहे ❓
Aaplya bharat deshat ashya hajaro parampara ahet ani gudhi ubharnyachi hi Maharashtra chi parampara ahe bakichya states chi tyanchi vegali parampara ahe ani Karnataka medhey suddha gudhi ubharli jaate
गुढि उभारायची पताक्याची..संतांच्या अभंगात पण भगव्या पताका ची गुढी उभारण्याचा संदर्भ आहे....भगवी गुढी उभारून पाडवा साजरा करा...साडी टांगणे म्हणजे इज्जत टांगणे...तांब्या उलटा ठेवणे हे अशुभ असतं
आपण पुराव्यानिशी स्पष्ट केलं की गुढी पाडवा हा सण १९४६ वर्ष जुना आहे. अनेक संतांनी त्याची ग्वाही दिली. ते सर्व छत्रपति संभाजी महाराज यांच्या आधीचे होते. परंतु, तेच संत जर का महाराजांच्या हत्येनंतर जिवंत असते तर त्यांनी महाराजांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी गुढ्या उभारण्याचे समर्थन केले असते का? केवळ परंपरा म्हणून हा सण साजरा करण्याचे समर्थन संतांनी केले असते का? कॅलेंडरचे म्हणावे तर अनेक जेत्या राजांनी आपआपल्या काळात कॅलेंडर सुरू केले होते, ते सर्वच काही आजही सुरू आहेत असे नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर किमान महाराष्ट्रात हे कॅलेंडर बंद पडायला पाहिजे होते. परंतु, तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जपण्याची जबाबदारी ज्यांचेवर होती त्यांना महाराजांबद्दल सहिष्णुता दाखवण्याची गरज वाटली नाही. परंतु,आता समाज जागृत होत आहे, महाराजांच्या हत्येचा दिवस त्यांनां गुढी पाडव्याचा दिवस होता हे कळले आहे. म्हणून त्यादिवशी कितीही जूना आणि प्राचीन सण असला तरी तो साजरा करणे योग्य नाही असे वाटत असल्यास त्यात चूक काय आहे? अशा लोकांना उपद्रवी किंवा तसे काही म्हणणे योग्य होणार नाही.
महारांची हत्या भाद्रपद महीन्यात झाली झाली असती तर तुम्ही गौरी गणपती नसते बसवले.... अश्विन महीण्यात हत्या केली असती तर तुम्ही नवरात्र साजर केल नसतं कार्तीक महीण्यात केली असती तर दिवे लाऊन दिवाळी नसती केली....😂😂 फालतु पना आहे हा........ अमावस्येचा राग तुम्ही प्रतिपदेवर काढत आहात मुर्खासारखं मानुस मेल्यावर दुख करतात पण बलीदान झालेक्याला गर्वाने मुजरा करता ही दुख करायची गोष्ट नाही आहे
5 месяцев назад
आपल्या एखाद्या सणाच्या दिवशी वाईट घटना घडली तर त्या दिवशी साजरा करणार नाहीत कुणी पण म्हणून तिथून पुढे तो सण कायमचा बंद करायचा का ? असं केलं तर काही वर्षांनी एकही सण शिल्लक राहणार नाही. २६/११ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला केला कारण तो संविधान दिन होता पण म्हणून काय आपण संविधान दिन बंद करायचा का? ६/१२ ला बाबरी मशिद पाडली कारण संघाच्या लोकांना आंबेडकरांच्या स्मृतिदिनाचं महत्त्व कमी करायचं होतं पण म्हणून आंबेडकरांचा स्मृतिदिन बंद झाला का? या अश्या दिवस पाहून जी लोकं वाईट गोष्टी करतात ती आपल्या विरोधी संस्कृतीला डिवचण्यासाठी पण असं करणं हेच मुळी नपुसंकतेचं आणि मानसिक विकृतीचं लक्षण आहे. दुबळी लोकंच फक्त भ्याड हल्ले आणि symbolism वापरतात, त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे कारण यांनी काहीही बिघडत नाही.