आपण आता संघाचे (RSS) चे आभार मानले पाहिजेत. संघ आहे म्हणून आपल्याकडे परिस्थिती इतपत ठीक आहे. आता सर्व हिंदूंनी एकजूट होऊन मा मोदीजी यांचे पाठी उभे राहिले पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कॉलेजमधल्या हिजाब बंदीला स्थगिती दिली. उद्या यातून कॉलेजमध्ये वातावरण बिघडलं तर? न्यायालय आग लावून मोकळं होणार, मग दोष सरकारला...
त्यासाठी न्यायाधीशांनी जे तर्कट मांडले आहे ते भयानक आहे.. त्यांनी म्हटलेले आहे ह्यांना हिझाब बंदी असेल तर टिकली वगैरे लावून व्येनाऱ्या मुली हिंदू धर्माच्या रीती पाळतात असे आहे त्यांना पण तुम्ही ते लावू लावू देणार नाही अश्या अर्थाने कॉमेंट केलेली आहे. मुळात शाळेतील ड्रेस कोड, शाळेचा गणवेश ह्यावरून सुरू असलेली गोष्ट आहे ही..ह्याबाबत कोर्ट कुणाच्या टिकली वगैरे वर विषय कसा काय नेऊन ठेवते??
आपल्या कडे कायद्यामध्ये सुधारणा करण्याची खूप खूप गरज आहे पण ते काही विरोधक होऊन देणार नाहीत कारण त्यांना ह्यातच धन्यता वाटते सगळ्या लोकांनी राजकारण न करता मोदींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे भारत माता की जय, धन्यवाद अनय दादा
Anay, whom are you warning? The tallest leaders want Maharashtra to become Manipur. Some are ready to set India on fire. Consequences for the country? Who cares? My son or daughter becoming CM is important or my caste.
Dear Anayji Apan Dear Changala video Banawala ahe Sadgun vikruti ha Modisaekarla lagalela dag she tyane Apali Hanich honar ahe panahi vikruti jat nahi Aj kahihi gunegaranvirudha action ghet nahi he gair ahe yache paeinam sagalya bhogave lagnar ahet Prakash Joshi 78
महायुती च्या नेत्यांनी आज ओबीसी परिषद घेतली, काहीही हरकत नाही पण निवडणुका हरल्यावर मनोज जरांगे यांना दोष देऊ नका. कारण तुमच्या अशा ओबीसी परिषद मूळे मराठा अजून जारांगे यांच्या जवळ जात आहे .
Kahi jat nahi...fakt मराठवाड्यात अर्धशिक्षित कुणबी तरुण jarange sobat आहेत...शहाणे सुरते लोक त्या मुरखासोबत नाहीत....लोकांना माहीत आहे, हा बारामतीच्या दारातला लुबरा आहे
जरांगे ला शरद पवार यांनी त्यांच्यावर स्वार्थासाठी उभे कले मान्य केले तरी प्रश्न उरतोच की मग लोकसभेत भाजपचा दारुण पराभव का झाला याचे कारण काय. किती दिवस तुम्ही सत्त्यापासून पळ काढणार. तुमचे सरकार आल्यावरच जरांगेचे भूत उभे राहिले. तो राक्षस बाटलीत बंद करण्यासाठी सरकारने अनेक अतर्क्य अटी मान्य केल्या. अगदी मराठा समाजाला चुचकारण्यासाठी दोन मराठ्यांना सरकार मधे मानाच स्थान दिले.फडणवीस याना पडती भूमिका घ्यावी लागली. हे सर्व कशाचे द्योतक आहे. एवढे करून जर लोकसभेत पराभव झाला तर भाजपच्या धोरणात काहितरी खोट आहे. एकतर तुमचे धोरण कितीही सात्विक असले तरी सद्द परिस्थितीत ते उपयोगी नाही. जातीयता आणि विशेषत: ब्राह्मण समाजविरोधी वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. तुम्हाला महाराष्ट्रात परत सत्ता मिळवायची नसेल तर प्रश्नच मिटला. ही शेवटची संधी आहे महाराष्ट्रात चांगले सरकार प्रस्थापित करण्याची. नुसते फेसबुक आणि युट्यूबवर पवार आणि उध्दव यांना बदनाम करुन आणि त्याची खिल्ली उडवून काम भागणार नाही. त्यांना मानणारा जो बहुजन समाज आहे त्याला जाग्रणं कसे करणार हा प्रश्न आहे. तुमची भाषा त्याच्या डोक्यावरून जाते. त्याना भूजबळ, आव्हाड, राऊत यांचीच भाषा समजते. अगदी सुशिक्षित लोक पण आज मोदी अदानी,अंबानीला बाहुले झाले आहेत हे मान्य करतात तर मग अडाणी बहुसंख्य समाज तर दूरच राहिला. पुण्यात जर रस्त्यावर रोहिंगे फेरीवाले म्हणून राजरोसपणे ठाण मांडून बसले असतील तर या परिस्थितीला जबाबदार कोण. 2022 पासून राज्यात युतीचे सरकार येऊन ही जर त्याला पायबंद तर घातला गेलाच नाही वर आपल्याच लोकांना डावलून राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना मानाच्या जागा द्याव्यात लागल्या. हे सर्व कशासाठी केले याची योग्य कारण मीमांसा जर समर्थक युट्यूबकार देऊ शकत नसतील तर पराभव तर अंमळ आहेच पण परिस्थिती अराजकाकडे जाणार हे नक्कीच. सुनील देवधर यांचा न्यूज डंकावरचा विडिओ जरूर बघा आणि ठरवा भाजप यावर काय करणार...12.08.24. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचत नसेल तर फेक नँरेटीव्ह चे गारूड लोकांना भागणार. दौन वर्षात सत्ता असूनही गुणात्मक आणि जाणवेल असा फरक जनतेला दिसला नाही हेच पुढच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरेल. लाडकी बहिण योजना फार मोठे मताधिक्य मिळवून देईल हा निव्वळ भ्रम आहे. लोकांना मविआ चालते, आवडते का , ती योग्य आहे का असे प्रश्न त्याना पडत नाहीत. चांगले चित्रपट जसे बाईक्स आँफीसवर तग धरत नाहीत आणि एक दोन आठवड्यात ते काढावे लागतात तद्वतच राजकारणात भाजपची अवस्था झाली आहे. डब्यात पडलेला चित्रपट कितीही उत्कृष्ट आशयघन असला तरी तो डब्यात रहातो .
अनयजी ,तुम्ही म्हणताय की भारताचा विकास होतोय तो अनेक जणांना पाहवत नाहीये.कूठला विकास?कुणाचा विकास?अनयजी..फक्त जीडीपी वाढला की झालं का?आज पाश्चात्य विकसित देशांना आदर्श मानून आपल्याकडे सरकार निसर्गाचा सत्यानाश करून आणि भूमीपुत्राना देशोधडीला लावून जो विकास करत आहे त्याचा जाब एक दिवस सरकारला द्यावाच लागेल..उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात जे भयानक भुस्खलन आणि पूर सातत्याने तिथली जनता अनुभवत आहे तो कशाचा परिणाम आहे?आता ह्या नतद्रष्ट सरकारने आपल्या कोकणात पोकलेन विकास करायला सुरुवात केली आहे.चार दिवसापूर्वीच दापोलीला एका खाजगी कंपनीनं डोंगर खोदल्यामुले तिथल्या वस्त्यांवर जोरदार पाऊस पडल्याने मातीचे ढिगारे पडले...ह्या असल्या विषयावर कोणीही मिडियावाले बोलत नाहीत. ब्रिटन मध्ये काय जळतय ते बघण्यापेक्षा, आपल्या पायाखाली काय धुमसतय ते आपण पाहिलं पाहिजे..