नंबर तर खूप लांब... साधं eleminate झालेल्याना सुद्धा स्टेजवर बोलावून 25,000/- रुपये दिले. आणि देवांश आणि ह्रिषीकेश कडे ढुंकून सुद्धा बघितले नाही. इतकी निर्दयी आणि क्रूर वागणूक का दिली देवांश सारख्या कोवळ्या मनाच्या मुलाला हा मला आणि माझ्यासारख्या असंख्य मराठी जाणकार, सुजाण रसिकाना पडलेला प्रश्न... @झी_मराठी याचे उत्तर देईल?
@@devanshmandarbhate मुळात या स्पर्धांना मुलांना पाठवू नये या मताची मी आहे. कारण असं काही झालं तर मुलांचे खच्चीकरण होते. लता मंगेशकरांची भाची राधिका कोणत्याही स्पर्धेत तुम्हाला दिसत नाही याच कारणामुळे ते स्पर्धेत पाठवत नसावेत. जो हिरा आहे तो चमकणारच आहे हे येणारा काळच ठरवेल
अक्षरशः, हरलेल्याना जर बोलावून बोलावून देतायेत आणि सर्वार्थाने स्पर्धा करून जिंकलेल्याला निष्ठुरपणे, क्रूरपणे डावलून नक्की काय साध्य करायचंय झी ला? देवांशच्या मनावर याचा काय परिणाम झाला याच काहीच सोयरसुतक नाही. नाही झी ला, ना सो कॉल्ड गुरु जनाना... नाम बडे और दर्शन... देवांशच्या गाण्यावर, त्याच्या निरागसतेवर, ज्ञानावर व्यवस्थित TRP मिळवला. पण साधं कौतुक नाही, माणुसकी नाही. इतका घाणेरडा अनुभव जाता जाता नको द्यायला पाहिजे होता पण काय करणार... सरड्याची धाव कुंपणापर्यंत... आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार..