ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहर हे पूर्वी व्यापारी शहर म्हणून खूप प्रसिद्ध होते. शिव छत्रपतींच्या इतिहासात कल्याण शहराचा उल्लेख नेहमी आढळतो. अलिकडे कल्याण शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. मुंबईतील बरेच मराठी रहिवाशी डोंबिवली व कल्याण या शहरांमध्ये वस्तीस आहेत. लोकसंख्या वाढल्याने आता लोकांच्या गरजाही वाढल्यात त्यामुळे कल्याण मध्ये बाजारपेठा वसल्या आहेत.
कल्याणला काही बाजूला खाडी असल्याने त्या खाडीत मासेमारी होते. त्याचप्रमाणे कोळी वस्ती असल्याने कोळी बांधव भाऊचा धक्का व ससून गोदी येथून मोठ्या प्रमाणात समुद्राचे मासे मासळी बाजारात घेऊन येतात. कल्याणच्या या मासळी बाजारात कोणकोणते मासे आले आहेत ते आपण या व्हिडीओ मध्ये पहाणार आहोत.
व्हिडीओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचे चॅनेल तुम्हीच Subscribe करावे हि विनंती🙏
जयहिंद🚩🇮🇳
10 июл 2024