🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांन की जे 70 वर्ष कॉग्रेस ला जमलं नही ते त्यानी करून दाखवलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳♥️♥️♥️💕💕💐👌👌👌👌🌺💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺
आदरणीय उदयनराजे बोलताना त्यांनी वाघनखाचा संबंध औरंगजेब बरोबर केला, यावर अनेक कंमेंट्स येतील.. परंतू त्यांचे भावनिक भाषण होते त्यामुळे टिका टिपणी न करता त्यांच्या भावना समजून घेणं आवश्यक वाटते.. दुसरी बाब अशी की अनेकांनी त्यांचे वक्तव्यात शंभुराजे असा उल्लेख केला त्याऐवजी शंभुराज असा उल्लेख योग्य वाटतो. आदरणीय उदयनराजे यांनी त्यांचे भाषणात उल्लेख केल्यापैकी महत्वाचा मुद्दा असा वाटतो की, वाघनखाविषयी कोणत्याही शंका कुशंका उपस्थित करण्यापेक्षा त्या घटनेशी संबंधित इतिहास ही आपली प्रेरणा आहे. कारण अशा घटनामधूनच प्रेरणा मिळत असते.. स्वतंत्र भारताच्या लोकशाहीचे खरे प्रेरणास्रोत हे छ. शिवराय आहेत हे सुद्धा उदयनराजे यांनी थोडक्यात सांगितले ते सुद्धा लक्षात घ्यायला हवे असे वाटते.. कारण सर्वधर्मसमभाव हे छ. शिवराय यांची भूमिका होती आणि त्याच भावनेतून भारतीय राज्यघटना अस्तिवात आली.... छ. शिवराय यांचे जयंतीविषयी सुद्धा थोडं मत मांडावे वाटते, एका पाठोपाठ अनेक जयंती शिवप्रेमीकडून साजरी केली जाते. ते अयोग्य वाटते.. प्रशासन म्हणून जर आपण सर्वजण काही घटने नुसार मानत असू तर प्रशासनाकडून मान्य केलेल्या जयंती दिवशीच सर्वांनी एकमताने जयंती साजरी करावी.. कारण प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात पण आपले आराध्य यांची जयंती एकच असावी.. हा संदेश पूर्ण जगाला मिळाला पाहिजे.. की आपल्या आराध्याविषयी आम्ही एक आहोत.. इथं राजकारण नाही तर समाजकारण आहे जे डॉ. आंबेडकर यांना सुद्धा अभिप्रेत होतं.. मा. देवेंद्रजी यांनी सुद्धा अफजल हा औरंगजेब याचा सरदार होता असा उल्लेख केला... अर्थात तो त्याकाळी विजापूर आदिलशाहीचा मोठा सरदार होता.. असं आमच्या माहितीप्रमाणे इतिहास आहे.. वाघनखं ही मर्यादित काळासाठी आपल्याकडे आहेत यापेक्षा तो आपला ठेवा आहे तो कायम आपलेकडेच म्हणजे सातारा छ. शिवाजी संग्रहालयात राहावा ही अपेक्षा आहे.. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार ब्रिटिश सरकार बरोबर प्रामाणिक प्रयत्न करेल ही आशा आहे...