आपण जे विवेचन केले ते अत्यंत योग्य आहे. मला नेहमी हा प्रश्न पडतो की, इतर प्रांतातील लोकांना त्यांच्या, त्यांच्या मातृभाषेचा अत्यंत अभिमान असतो पण मराठी लोकांना मात्र तो असलेला दिसत नाही, ह्याचं कारण काय? कारण इंग्रजी भाषेचं आक्रमण भारतातील सर्वच भाषांवर झालं आहे, आजकाल शिक्षण सुद्धा इंग्रजीमध्ये घेणं अनिवार्य झालं असतांनाही, इतर भाषिकांनी प्रगतीसाठी इंग्रजीचा स्वीकार केला तरी मातृभाषेला कधीही दुय्यम स्थान दिलं नाही, तिचा वापर घरी, दारी, सार्वजनिक ठिकाणी करण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही, ही गोष्ट दक्षिणेकडे प्रकर्षाने दिसते. मग मराठी लोकच असे कपाळ करंटे कसे काय? नवलाची गोष्ट म्हणजे पूर्ण मराठी समाजातच मातृभाषेबद्दलची ही अनास्था कां? आता तर अगदी निम्न आर्थिक स्तरातील आई सुद्धा आपल्या छोटया मुलाला मम्मी आणि पप्पा म्हणायला शिकवते तेव्हा खरंच वाटतं कश्यासाठी हा इंग्रजीचा अट्टाहास ? नक्कीच इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे पण तिला आपल्या मातृभाषेची जागा घेऊ द्यायची कां हे मराठी माणसांना आणि पर्यायाने मराठी समाजाला कधी कळणार? बरं,असंही नाही की, सर्व मराठी लोकांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं आहे आणि ते अस्खलित इंग्रजी बोलू शकताहेत, तिथे ही दोन चार वाक्यं सलग इंग्रजीत बोलायची म्हटली की, बऱ्याचशा मराठी लोकांची भंबेरी उडते. त्यापेक्षा ते साऊथ इंडियन्स खूप हुशार म्हणायचे, सर्वात आधी त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं शिवाय आपल्या मातृभाषेचा योग्य तो मानही राखला. नाहीतर मराठी लोक! बहुसंख्य लोकांना इंग्रजी तर सोडाच पण शुद्ध मराठी ही बोलता येत नाही, ही शोकांतिका आहे. आपल्या आईचा जो समाज मान ठेवू शकत नाही तो कधीच प्रगती करू शकत नाही, हे सध्याच्या मराठी माणसांच्या सर्वच क्षेत्रातील पीछेहाटीचं प्रमुख कारण आहे, हे निःसंशय !
माझा मातृभाषेविषयीचा अनुभव सांगतो.... मी व पत्नी दूर लक्षद्विपला गेलो होतो...कडमट बेटावर होतो....आमच्या हॉटेलपासून साधारणपणे दोन तीन किलोमीटर लांब अशा कडमट बेटावर फिरताना आम्हाला दोन सैनिक दिसले...मी पत्नीला म्हणलं चल जरा बोलू त्यांच्याशी...त्या दोघांपैकी एक मराठी होता सातारचा...आम्ही पती पत्नी मराठी आहोत हे समजल्यावर काय आनंद झाला त्याला....त्याने मला मिठीच मारली....जवळजवळ सहा महिन्यांनी मराठी बोलायला मिळाले म्हणाला...तासभर गप्पा मारल्या....अचानक मला काहीतरी आठवले व मी पत्नीला तिथेच त्या दोन सैनिकांसोबत सोडून पळत पळत हॉटेलवर आलो....बॕगेतून पिशवी काढली व पळत पळत त्या जागेवर आलो....तरी अर्धा तास लागला होता...मला परत यायला...मी त्या सैनिकांच्या हातात ती पिशवी दिली....त्यात माझ्या आईने प्रवासात खाण्यासाठी दिलेल्या गुळपोळ्या होत्या...दोघांना पोटभर खाऊ घातल्या... निघताना चौघांच्या डोळ्यांत अश्रू होते...पुढे तीन दिवस कडमट बेटावर आम्हाला जे सर्वसमान्यांना पाहता येणार नाही ते त्या सैनिकाच्या मदतीने पाहायला मिळाले....आम्हाला जोडणारी मात्रूभाषा होती.
मी मराठी.. मला काल, आज आणि उद्या... अभिमान होता,आहे आणि राहणार. हल्ली, "मला भेटलं" हे वाक्य सरार्स वापरतात, माझ्या ओळखीच्या एकीला मी शेवटी सांगितलं की...माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात.... कळलं. ती व्यक्ती आज देखील म्हणते मी कधीही विसरणार नाही🤗🤗 तोड नाही आपल्या मातृभाषे ला
सर नमस्कार खूप महत्वाची शिकवण आणि. ..बरेच काही घेण्या सारखे एक विनंती आहे, आपले बोल समजण्या साठी बोलण्या चा वेग कमी करावा. कमी वेळात तुम्ही भरपूर सांगता तुमच्या कडे आहे च भरपूर पण खूप सारे एकदम एकल्याने उजेड पडाय च्या ऐवजी कोलाहल,भ्रांती होऊ शकते
आपल्या मातृभाषेची लाज वाटणारे नतद्रष्ट फक्त मराठीच असू शकतात. मराठी लोक हिंदीची पालखी किती अभिमानाने उचलतात? स्वतःच्याच राज्यात आपल्या मातृभाषेला कमी लेखून हिंदीसारख्या दुसऱ्या भाषेला डोक्यावर घेणारे फक्त मराठीच असू शकतात. इतर कुठल्याही प्रांतातील लोकांना आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला सांगावं लागत नाही आणि करंट्या मराठी माणसांना ते सांगूनही त्यांच्यात काडीचाही फरक पडत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव!
आजकाल आपले नागरिक अर्थात भक्त नेहमी पश्चिमी नागरिक, तज्ञांच्या मतांवर आधारित विचार जे सध्याच्या सरकारच्या कृतींना पाठिंबा देताना दिसतात. मग हे पण मॅकॉलेचा सिद्धांत आजही खरा होत आहे का?
Nusatich matru bhasha nahi tar amza anubhav asa ahe ki tumhi Bhashecha Hela gheun bolalat tar samorcha ajun tumchya javal yeto, ex. Kolhapuri, SOlapuri, Puneri
🕉🙏इस ब्रम्हांड मे ऐसी कोई शक्ति नही है जो World War 3 को रोक सके l🙏🕉 कल्कि🕉🧘♂️kalki जय माता वैष्णो राणी के Great Heart आ गए पता करो 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop korona Vaxcination.🕉🙏2nd task 🚀🔥 World war 3 बाद विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती l🧘♂️🕉
विषय आमच्या जिव्हाळ्याचा... पण स्पष्ट ऐकू येत नाही....ध्वनि व्यवस्था सदोष आहे.....आवाजाला इको जास्त दिल्याने शब्द नीट कळत नाहीत...मजा आली नाही ऐकताना...नोंद घ्यावी..