Vyakti mhanun khup chan aahet pan itka sahan karayla nako hota. Weak aslyavarch loka sahan karat rahtat. She is very pure hearted person but weak emotionally ! Arthat to kaal pan vegla hota
खूप सुंदर मुलाखत... युट्यूबवर अचानक दिसली, ऐकावी वाटली. अन् धन्य झालो... सात महिन्यांपूर्वी रविंद्र महाजनी गेले. कुटूंबापासून अलिप्त रहात होते. साहजिकच मनात मुलांविषयी, पत्नीविषयी गैरसमज होते ते सर्व दूर झाले. खूप भावनिक मुलाखत. एक क्षण भाळण्यासाठी आणि संपूर्ण आयुष्य सांभाळण्यासाठी हे वाक्य डोळ्यात पाणी आणून गेले. शेवटी श्रीकृष्णाने प्रेमाविषयी केलेली व्याख्या पण खूप छान... माधवी ताई, तुम्ही खरोखर तुमच्या श्रीकृष्णाच्या रूक्मिणी आहात... सलाम तुमच्या स्त्रीशक्तीला, तुमच्या उत्कंठ प्रेमाला... आयुष्यात अनेक चढउतार बघूनही पुढच्या जन्मी पण हाच मिळावा यासाठी प्रार्थना... खरोखर अतुलनीय...🙏🙏
धन्यवाद माधवी ताई तुम्ही जे केलात रवींद्रजींसाठी ती एक देवी शक्ती होती तुमच्या पाठीशी म्हणूनच तुम्ही खचून न एकढ्या दु:खात सामोरे गेलात.तुमच्याकडून नविन पिढीतील लोकांना खुप छान मेसेज दिलात संसार करायचाच असेल तर कसाही करू शकतो .कारण हल्ली घटस्फ़ोटचे वातावरण खुप वाढलं आहे. त्यांनी हे शिकलचं पाहिजे आणि आपल्यात सुधारणा केली पाहीजे. धन्यवाद ताई कामगिरीला मानाचा मुजरा .🌷
आम्हाला massage ची गरज नाही सर्वच स्त्रिया संसारात मेहनत घेतात,जबाबदारी सांभाळतात थोडाफार त्रास सहन करतात पतीच्या पण मागे खंबीरपणे उभे रहातो हा समाजात comman प्रश्न आहे पण या प्रकरणात खूप मोठा इश्यू करायला लागले आहेत काही लोक.@@swaraadekar8410
@@swaraadekar8410सर्व च स्त्रीया मेहनत, जबाबदारी, पतीच्या पाठीशी उभे राहतात संसारामधै त्यात ऐवढे नवल काय. साधारण स्त्रीयांचे दिसत नाही . आणि या स्त्रिया येऊन गाऱ्हाणे सांगतात.
Ek stri RU-vid war achanak disli mulakhat yekali he ektarfi yekle ani te tumhala tyanche bolane patle. Thik ahe pan ravindra sir daha mahine ka rahat kase rahat hote kiwa tayapan trass hota ka .bayko kadhi bhetayla ali nahi marepy
बापरे नाण्याच्या दोन बाजू असतात हें आज आपल्याला समजले. किती सांभाळून घेतले त्यांनी सरांना. आणि ते गेल्यावर लोक किती नाही नाही ते बोलत होते त्यांना मुलाखत पाहताना गहिवरून आले 😢. खूप छान बोलता आई तुम्ही आणि मनापासून खरे बोलता सारे तुमच्या अस्या मुलाखती पहायला आवडतील👌🏻👌🏻 🙏🏻🙏🏻. तुमची फॅन झाले मी love u aai ❤❤
पूर्ण मुलाखत ऐकली, पाहिली आणि सरते शेवटी निशब्द झालो 🤔 पण यातून एक निष्कर्ष काढला प्रेम निखळ आणि निःस्वार्थ असावं.जे माधवी ताईनी रवींद्र महाजनींवर केलं. त्यांच्या सात्विक आणि सोशिकतेला सलाम. ♥️ 👍
अप्रतिम अतिशय सुरेख अशी मुलाखत ऐकावयास व बघायला मिळाली.आणि रवींद्र महाजनी आशा सेलेब्रिटीची पत्नीस एवढे आयुष्य सहण करावे लागते,खरोखर धन्य आहेस माऊली.या अशा धैर्यशील पत्नीस साष्टांग दंडवत नमस्कार. धन्यवाद
आईने केलेले संस्कार मुलांनी लक्षात घेतले म्हणून ते सर्व संकटातून बाहेर पडले. सगळ्यांचे आदर्श ठरले यापेक्षा आईला अजून काय हवे असते. माधवी ताईंना आयुष्यभराची शिदोरी मिळाली आहे. माधवी ताई आपण धन्य धन्य आहात. ईश्वर सर्वांचं भलं करो 🙏🙏🙏
No. This couple was sadly a case of psychological disorders. Both husband and wife. Just different disorders. So please don't glorify. This is not a normal, healthy mother. Sad, but true. Read my comment above.
मला ही मुलाखत खूपच आवडली. माधवी ताईंनी अगदी मनमोकळे पणाने सर्व काही सांगितलं. आम्हाला ही बरच शिकायला मिळालं. माधवी ताईंच उर्वरित आयुष्य सुखात व आनंदात जावो, अशी ईश्वर चरणी प्राथना करतो.
एक क्षण भाळण्याचा व बाकी सर्व सांभाळण्याचा हे वाक्य सार्थ करून दाखवलत माधवी ताई तुम्हींआणि गश्मीरनेही तुम्हांला तशा काळात एक मुलगा म्हणून छान साथ दिली आपलीमुलाखत खरंच होती धन्यवाद
मिस यु रवींद्र महाजनी सर😢😢🙏 माधवी मॅम पहिल्यांदा मुलाखत दिली तुम्ही पण असं कुठेही वाटलं नाही की तुम्ही पहिल्यांदा कॅमेरासमोर बोलत आहात👍 खूप छान बोलता तुम्ही👌👏👏😊 तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट सर्व घटना अगदी सहज सांगितल्या माहेर सासर इतकं छान सुंदर प्रतिष्ठित होतं पण तरीही जीवनात स्ट्रगल करावा लागला पण तुम्ही हार न मानता प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलात👏👏 तुमचं खरंच नशीब आहे रवींद्र महाजनी सारखे देखणे तरुण तुमच्या प्रेमात होते आयुष्यभर❤❤ आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रेमात होतात एवढ्या स्त्रिया सरांच्या मागे लागल्या होत्या पण ते कायम एक पत्नी असेच राहिले या गोष्टीचा खरच अभिमान वाटतो👏👌❤🤗 सरांनी बांधलेले घर ही एक आठवण तुमच्या सोबत राहिली आयुष्यभर घराविषयी तुम्ही बोलत होतात आणि आमच्या नजरेसमोर चित्र उभारत होते 👍 कुठलाही नवरा आपल्या बायकोला जे काही घडले घराबाहेर ते कधीच खरं सांगत येत नाही पण सर कायम जे काही घडले बरे वाईट सर्व तुमच्या कानावर घालत होते त्यामुळे तुम्हालाही त्यांचे खूप कौतुक वाटत होते👍👌❤ तुमच्या साता जन्माच्या गाठी अशाच आयुष्यभर घट्ट राहू देत🙏😊❤❤ सरांची आठवण काढून तुम्ही रडला खरंच तुम्हाला बघून आम्हाला सुद्धा रडायला आले😢😢 झाले गेले ते विसरून जावा वाईट आठवणी लांब ठेवून चांगल्या आठवणी मनात ठेवून पुढील आयुष्य छान सुंदर निरोगी जगा हीच प्रेमळ विनंती❤❤😊🙏 अभिनेता रवींद्र महाजनी सर यांच्या विषयी मनात कायमच आदरयुक्त भावना होत्या आणि कायम राहतील🙏😊❤❤😊🤗 सिनेमातील सुपरस्टार हिरो😊 खऱ्या आयुष्यात मात्र थोडा जिंकला थोडा हरला😢 खरंच तुमच्या विषयी व सरांविषयी खूप वाईट वाटते😢 घडू नये ते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर🙏😢❤ तुमच्या मुलाखतीतून खूप काही शिकण्यासारखे आहे तरुण मुला-मुलींनी काहीतरी घेण्यासारखे सुद्धा आहे🙏👍👌👌👏👏❤🤗 मी शितल जाधव🙏
खुप छान मुलाखत झाली तुमची.खरच तुमचा खुप अभिमान वाटतो एवढ्या श्रीमंत घरातील असुन जीवनांतील चढ,, उतार सहज पचविले मुलांना चांगले संस्कार दिले सासुबाईंना आई मानुन मैत्रीणी सारख्या राहिलात . नवीन मुलींना चांगली शिकवण दिली.तुमच्या आईंना व तुम्हाला साष्टांग दंडवत.सरांवर निरपेक्ष प्रेम केले.किती साध्या आहात तुम्ही.ताई मला खुप खुप आवडली.सरांना नमस्कार ते तुमच्या बरोबर आहेत मनात . अप्रतिम बोललात एवढंच म्हणेन मला शब्द सुचत नाही.,🙏🙏🙏❤
Great experience मुलाखत कर्ता great human being अगदी सहज बोलते केले आणि हृदय गलबलून आले डोळे पाणावले hats off माधवीताई , गश्मीर आणि रश्मी God bless you 🙏🙏🙏 माधवीताई तुम्ही आदर्श पत्नी व माता आहात🙏🙏
Avdhi mulakhat ghetali.. Khari... Pn Ravindra mahajani akte ka rahat hote... V tyancha mrutu. Asa bevaras ka zala... Ha prashn vicharla ka???? V tyach uttar kon denar?????
खुपच छान मुलाखत आरपार टीमचे आभार. रविंद्र महाजनी यांच्या करियर साठी ताई तुम्ही खुप सहन केले आणि मुलांबरोबर त्यांनाही सांभाळले. Great salute to you and Gashmir.
अगदी योगायोगाने मी ही मुलाखत पाहिली व ऐकली. माझे माधवी ताईना शतशः नमन. अशी माणसे क्वचित असतात. मला खरच तुम्हाला एकदा भेटावे, असे वाटते. दूसरे शब्दच नाहीत माझ्याकडे. नमस्कार. डॉ. अपर्णा पाटील. अंधेरी.
This is by far the best interview I have watched. Madhaviji hats off to you for your kindness, courage and forgiving nature. You truely have loved your husband unconditionally. Thank you for sharing your side of story.
धन्य आहात तुम्हीं मॅडम तुमच्या सहन शक्तीला सलाम आणि नुसत सौदरयावर कधीच भाळू नये. सौसार म्हणजे पलीकडे जावून काहीतरी असतो. किती शांत आणि सहज पणे सांगता तुमचे promblem ऐकुन अंगावर काटा आला . कमाल ...........🙏🙏🙏🙏🙏
जे घडले ते मांडणे आवश्यक आहे. व्यक्ती गेली म्हणून तिच्याविषयी नेहमी चांगलेच बोलावे हा खरंतर पूर्वीच्या लोकांचा दांभिकपणा होता. त्या व्यक्तीचे सारेच गुणदोष मांडले जाणे यात चुकीचे काहीच नाही वास्तविक. इतिहास अशाच नोंदी घेत असतो. या मुलाखतीमुळे रवींद्र महाजनी यांचे पूर्ण व्यक्तिमत्त्व उभे राहते. आदर आहे 🙏
नवरा वेगळा रहातो अशा उतरत्या वयात ते पण 10 महिने बाहेर होते तरी बायको ने कधी चौकशी केली नाही भेटली नाही कसे रहातात विचार पुस नाही आणि नंतर अचानक तीन दिवस मरुन झाले नवऱ्याला जवळ कुणीही नाही लोक बोलायला लागले बायको मुलाला. लगेच सात महिने नी पुस्तक लिहिते कि संसारात नवऱ्याने हाणमारकेलीवगैरे. बायको ने कधी आपले दोष पाहिलेच नाही. असे का.
My sincere gratitude and respect to madhu Aai for inculcating such great moral values in her children!She is an affectionate and caring woman.Her book speaks volumes of how much of a dignified and thoughtful women she is!👏👏❤️❤️
तुमच्या हया इंटरव्यू मधून आज आम्हाला एक सुपर woman एक सुपर आई अनी एक super हिरो ची बायको (with unconditional love)पाहायला मिळाली खरच तुम्ही या Interview नंतर सर्व स्त्रियांची प्रेरणा होणार आहात This not easy for you thanks Mam for this interview.🙏🙏
खूप संघर्ष केला आहे तुम्ही आणि तुमच्या मुलांनी सुद्धा , तुम्ही मोकळे झालात व्यक्त झालात खूप छान वाटले . तुमच्या मुलाला खूप मानले पाहिजे एवढ्या कमी वयात स्वतः च्या बळावर शून्यातून विश्व निर्माण केले त्यांनी . तुम्ही बायको म्हणून किती सहन केले या यातना सहज सहजी कोणीही सहन करू शकत नाही तुम्ही खूप धैर्यवान आहात . नवरा सुदंर असला की समाजामध्ये खूप बायकांना आवडतो ते सहन करणे इतके सोपे नाही . त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवावे लागते. तुमचा प्रवास खूप खडतर होता हो , तुम्ही पुस्तक लिहिले हे खूप छान केले समाजाला तोंड देण्यापेक्षा पुस्तकातून व्यक्त झालात हे खूप छान आहे.
सुंदर मुलाखत..माधवीताई..भूतकाळ विसरून जा..Bad patch..पण गश्मीर लेकाकडे, लेकीकडे पहा. ते मातृभक्त दिसतात. उतारवयात आईच्या भावनांचा ते दोघेंही आदर करतात. तुमच्यावर आणि काही अंशी आपला पिता म्हणून रविंद्र महाजनींवर ही प्रेम करतात हे ही काही कमी नाही. ते मायलेकांचं प्रेम उपभोगता उपभोगता रविंद्र महाजनीच्यां गोड आठवणीत रमा. तुम्हांस निर्मळ आनंद देणारे आयुष्य जगा. तुम्ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रविंद्र महाजनींच्या पत्नी म्हणून आणि त्यातून त्यांचा मनाला दुःख देणारा , मन हेलावून हृदय पिळवटून टाकणारा अंत झाल्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले. असे आयुष्य सामान्य स्त्रीच्या वाटेला आलेले आहे पण त्यांच्यां आयुष्यात कोणी डोकावत नाही. एक स्त्री म्हणून आपल्या वाटेला आलेले दुःख काहीजण समजून घेतील ही अपेक्षा..🙏 देखणा, प्रामाणिक, कष्टाळू आणि एक पत्नीव्रत आयुष्यभर निभावणारा पती म्हणून एक अभिमान असणार कारण तुम्हीच त्यांच्या पत्नी आहात. कारण रविंद्र महाजनींचे कुठेच प्रेमप्रकरण ऐकावयास मिळाले नाही अभिमानवाटेल असा अभिनेता. अभिनयातील भूमिकेत देखील कुठेही , कोणत्याच प्रकारचे चाळे आणि अश्लीलपणा नव्हता.. त्यांनी कुणाचीही फसवणूक केलेली नाही . तुम्ही सोडून ते कुणाच्याही मागे लागले नाही . ते देखणे असून ही आणि अनेक जणी फिदा झाल्या असतील तरी ते कुणाच्यात अडकले नाहीत. ते बोलत नसतील पण तुमच्याशिवाय ते कुणावर फिदा नसतील. घराबाहेर त्यांनी कुणाच्या कमजोरीचा फायदा ही घेतला नाही . म्हणूनच रविंद्र महाजनी खूपच आवडते होते. आणि ते रसिकजनांत लोकप्रिय राहतीलच . रसिकांचे तर प्रेम राहिलच .❤️ त्याची फिल्म पाहताना मन हळवं होतं . डोळ्यात पाणी तरारलं .🥹🥺 ❤️😍🤩प्रेम वेदनाच देतं हेच खरं. 🥹🥺🥲तुमच्या फॅमिलीची ही कहाणी..🥹🥺🥲🤩
खुप खुप छान मोकळे पणाने सांगितले आणि खरेच खूप प्रेम आहे तुमचा जोडीदार सोबत गस्मिरचा आणि तुमचा खूप आभिमन वाटतो आमाला आम्ही सगळे तुमचा सोबत कायम आहोत .माझा मुलगा पण सिनेक्षत्रा मध्येच आहे मी त्याला नेहमीच गस्मिरचे उधरण देत आस्ते
मा.माधवी आई...नमस्कार वाह...खूपच छान...सुंदर आणि मनमोकळेपणाने स्पष्ट आपली मतं मांडणं यालाही धाडस असावे लागते... तुम्हीं रवींद्र सर यांच्यावर केलेले प्रेम,आदर,निष्ठा आणि समर्पित भावनेने जगलेले आयुष्य...वाह वाह...माणूस म्हणून जगणं काय असतं ते हे... आयुष्यात एवढ्या मोठ्या व वाईट घडामोडी होऊनसुद्धा न हारता,डगमगता येणाऱ्या अडचणी व परिस्थितीला सामोरे जाणे...हे फक्त तुम्हीचं करू शकता...हा आदर्श प्रत्येक नवविवाहित मुलीने किंवा बाईने घेतला पाहिजे... तुमच्या कार्याला व कर्तुत्वाला सलाम... आपले मनापासून कौतुक आणि अभिनंदन... शेवटी गश्मिर सारखा मुलगा मिळणं हे एक भाग्याचे मी एवढच म्हणेल की जिजाऊ सारखी आई व तिच्या पोटी जन्मलेला शिवबा असं नात आहे तुमचं...तुम्हाला भेटायला खूप आवडेल मला ... धन्यवाद ...🙏👏🙏
माझ्या मनाला ही मुलाखत खुप भावली.माधवीताई तुम्ही अनुभव सांगत असताना मी माझे काही अनुभव असेच आहेत हे जाणवले.फक्त व्यवसाय क्षेत्र वेगळे होते.you are great woman, संसार कसा करावा,त्याविषयीचा शेवट मला खुपचं आवडला.प्रत्येक स्त्री ने ही मुलाखत ऐकावी असे मला वाटते.🎉🎉🎉
नमस्कार . माधवीताई खूपच सुंदर मुलाखत .खरोखर तुम्ही सगळी परिस्थिती स्पष्टपणे सांगितलीत.आणि कणखरपणे हाताळलीत. विशेष म्हणजे आईने मुलीला कसे उपदेश करावेत हे खूप छान सांगितलेत .सर्व आया अशा वागल्या तरच कुटुंब व्यवस्था टिकून राहिल. तुम्हाला खूप शुभेच्छा .
कालपासून ३ वेळा हि आपली मुलाखत पहिली खरंच शब्द नाहीत बोलायला , आरपार च्या टीम चे खूप खूप धन्यवाद एक विनंती आहे आपल्याला शक्य असल्यास हि मुलाखत अजून बंगाली , कन्नड , तामिळ , हिंदी इंग्लिश मध्ये Dubbing करावी बाकी खूप लोकांपर्यंत हे चांगले शुद्ध विचार पोहचतील मनापासून धन्यवाद
अतिशय सुरेख मुलाखत....सगळ्या शंकांचे निरसन झाले....माधवीताई तुम्हाला मनापासून सलाम... रविंद्र सरांवर माझेही आयडियल प्रेम आहे... पण त्यांच्या पत्नी फक्त तुम्हीच होवु शकता.. हॅट्स ऑफ यू ...🤚👏🏼👏🏼
खुपच ह्यादय स्पर्शी मुलाखात. परवा चारचौघीच्या प्रयोगाच्या वेळी मधूताई बाजूच्या सिटवर होत्या….आत्ता त्यांची मुलाखात ऐंकुन त्यांच्या अभिमान वाटतोच,परंतु त्यांची आयुष्याकडे पहाण्याची पद्धत घेण्यासारखी आहे. ताई तुम्हाला सलाम. ♥️♥️
मॅडम, तुम्ही खूप धीराच्या आहात. अशा नवऱ्याशी तुम्ही एकनिष्ठ राहिलात. तुमच्यासारख्या बऱ्याच जणी आहेत. पण त्या तुमच्या इतक्या धाडसी नसतात. नवरा असतानाही आणि नसतानाही तुम्ही ज्या पद्धतीने सगळं निभावलंत ते पाहून तुम्हाला Hat's off!!🙏🙏🙏🙏🙏
Lesson in unconditional love, glad to know more about this selfless and intelligent woman who kept her family together in the face of never ending challenges
ताईंची मुलाखत ऐकून खरी सतीसावित्री आहेत. आजच्या काळातील मुलामुलींना यातून शिकण्याची गरज आहे. कसा संसार सांभाळायचा असतो ते. ताई किती छान सच्चेपणाने बोलतात. मुलेपण खूप गुणी आहेत. देव तुम्हाला बळ देवो 🙏
आज पर्यंत च्या उभ्या आयुष्यात अशी मुलाखत ऐकली नव्हती, धन्य माधवीताई तुम्ही आणि तुमची मुलें. तुमच्या बद्दल माझाही गैरसमज झाला होता,तो दुर झाला, तुमच्यात दैवी शक्ती आहे, रविन्द्रा च्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
खूपच छान मुलाखत घेतली . आणि माधवी मॅडम यांनी सगळे अनुभव, प्रसंग.. सत्य,सरळ सोप्या ओघावत्या भाषेत कोणताही आड पडदा न ठेवता सांगितले.. माधवी मॅडम आपण रवींद्र महाजनींवर आपलं आयुष्य अर्पण केलत... समर्पणाच्या भावनेने तुम्ही राहिलात.. मीरा ने कृष्णा वर प्रेम केलं तसं तुम्ही केलत..great आहात तुम्ही!! मी खूप लहान आहे . पण एकच मनापासून सांगते.. आता ते आपल्यात नाहीत .. पण थोड्या आपण कडक राहिला असता.. तर ते सावरले असते.. किंवा वाईट गोष्टींपासून दूर झाले असते.. प्रेम हे त्या व्यक्तीमध्ये विरघळून जाणे हे आहेच..पण त्या व्यक्तीला योग्य मार्गावर आणून त्याचं जीवन यशस्वी करणे सुद्धा आहे.
आता काही ladies यांना trol करतील,पण या पडद्यामागील स्त्री ने जे भोगले आहे .ते खूप सहनशक्ती पलीकडचे आहे ,,त्यात नवऱ्यावरच तीच प्रेम तसूभर ही कमी झालं नाही ,शेवटी तिच्या पुण्याईने तिचा मुलगा आज यशाच्या शिखरावर आहे ,,हीच खरी माता माऊली 🙏🙏🙏
रवींद्र सर पण असते तर कसे वागले घरचे त्यांच्याशी त्यांची बाजू पण कळली असती. ते देखणे होते , तरी पण पत्नी शी एकनिष्ठ राहिले हे पण सरांची बाजू मोठी आहे. आजकाल पुरुष स्त्रियांवर प्रे लग्न करण्यासाठी किती खोटे बोलतात परंतु सरांनी लग्न करायच्या अगोदर च माधवीजी ना सांगितले होते मी असा आहे वेळ आली तर रस्त्यावर पण रहावे लागेल . सरांना लग्न पण करायचे नव्हते च. तरीही माधवीजी नी त्यांच्याशी लग्न केले त्रास होणार माहित असतानाही मग तुम्ही काय म्हणता त्रास सहन केला केला. केला काय करायला च पाहिजे. माहित असूनही लग्न का केले.
Vijayaji ase mhanu Naka Madhavi tai ni laguna kele Ani te Neet nibhawale attaching ekhadi mulgi asati tar lagech Deveose gheun Jawabdaritun mokali zali asati te Madhavi training nahi kele
@@dhananjayjoshi5380 माधवीजी सारख्या पण देशात शेकडो बाया आहेत असतील त्रास काढून संसार करणाऱ्या जबाबदारी घेणाऱ्या . माझे पण 1992 ला लग्न झाले माझ्या नवऱ्याला ला सातशे रु पगार होता . कशी परिस्थिती होती ते आठवून खूप दुख होते.कुणा कुणाचे वेगवेगळ्या मजबुरी असतात . मी पण मुलाची शिकवण्यासाठी जबाबदारी घेऊन इंजिनिअर केले. आता मुलगा jobला लागला या पाच वर्षांत. कुणाचाही आधार नाही. नवरा मेहनत करून पण पगार खुप कमी होता. घर पण भाडयाने. तेवढया एवढया त खर्च चालविले. काय करणार कर्म करावे च लागते कर्माचे फळ भोगावे लागते. शेवटी नशिबाला दोष द्यायचा. माणूस फक्त निमित्त आहे ह्यामुळे, त्यामुळे हे मी सोसले असे म्हणून नाही चालत. मी तर माधवीजी पेक्षा खूप त्रास सहन केला किंवा करत आहेत हे बघते पण ऐकले पण . जेव्हा माधवीजी चा काळ होता तेव्हा तर जास्त सासु चा त्रास होता किंवा जीवनात आपली घरची बिकट परिस्थिती. माझ्या पेक्षा माधवीजी खूप वयाने मोठ्या आहेत. खरच प्रत्येक मनुष्य ने भगवदगीता वाचावी सर्व मनुष्य च्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. बघा धनंजय सर माझे पटत असेल तर नाही तर 🙏🙏
खूप सुंदर सांगितले यांनी... आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्याचा सगळ्या चुकीचा गोष्टी पोटात घेऊन बरोबरीने साथ देणं आणि जे काही करताहेत ते चुकीचं असून पण त्यामागे हेतू चांगलाच आहे हे प्रत्येक शब्दात म्हणणे हेच ते खरं आणि जीवापाड केलेलं प्रेम.... खूप सुंदर बोललात तुम्ही😇
माधवी ताईंच्या ' प्रेमाला खरंच उपमा नाही ' . Tough (est) Life indeed. Kudos and Respect !!! 🙏🏻❤🤗🙌😊 After Gashmir जींच्या ' नाण्याची " तिसरी" बाजू नंतर this ' चौथा अंक ' seems like a Background Music Score which cannot be seen , at times... noticed or felt maybe...but is always present there like a STRONG SUPPORT throughout enhancing the past, present and for the future .
अनेक घाव सोसून जसं देवपण यावं तसं हे व्यक्तिमत्व आहे. आदरयुक्त प्रेम वाटावं अशीच साधी सरळ आई आणि गश्मीर सारखा मुलगा. तुम्हाला शतशः नमन. आणि मुलाखत किती नजाकतीने घेतली आहे तुम्ही त्याबद्दल पण आदर 🙏🏻.
खूप सुंदर अशी मुलाखत आणि खूप सुंदर व्यक्ती महत्व. प्रेम करणे सोपं पण निभावणं किती ही खडतर आहे, कुणीही अश्या परिस्थिती ला सामोरे जात असेल तर वरील मुलखात ही नक्की पहावी. प्रत्येकाचे मत आणि परिस्थिती सारखी नसते, पण निश्चय मात्र केला तर परिस्थिला सामोरे जाण्याची हिम्मत नक्कीच मिळते. खूप सुंदर आणि प्रेरणादायी असे व्यक्तिमत्त्व
माधवी मॅडम मुलाखत खूप छान झाली. खूप परिपूर्ण झाली आहे. परमेश्वर आपल्याला आपल्या परिवाराला खूप बळ देवो. आपल्या पुढील आयुष्यासाठी आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा 🙏😊
जिंदगी में आपके दर्शन हो गए ताई, ऐसा लगा जैसे सती सावित्री को देख लिया। आपके प्रति बहुत बहुत अपनेपन से भर गई हूं। आपका बहुत बहुत धन्यवाद कि आपने इंटरव्यू दिया और आपकी यह किताब मैं जरूर पढ़ूंगी❤❤❤❤❤
सती सावित्री होती तर रवींद्र महाजनी ना सोडून का राहिली, सावित्रीने नवऱ्याचा जीव वापस आणला या बाईला तीन दिवस झाले नवरा गेला तर माहीत नाही . आणि नंतर बदनामी करते ही कसली सावित्री. का खऱ्या सावित्री ची इमेज खराब करता.
माधवी ताई... तुम्हाला शतश: प्रणाम... एवढा सोशिकपणा... खऱ्या प्रेमाचं उत्तम उदाहरण... रवींद्र सर आम्हा सगळ्यांचेच खूप लाडके होते. ते आमच्या खूप आधीच्या पिढीचे असूनही आमचं त्यांच्यावर नितांत प्रेम...मराठी मधील जितेंद्र... त्यांची ही दुसरी बाजू ऐकल्यानंतर थोडं वाईट वाटलं पण तुमच्याप्रमानेच आम्हीही ते प्रेमापोटी accept केलं. पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात येतं की त्याचंही तुमच्यावर खूप खूप प्रेम होतं, तुमच्यातली ओढ आणि bonding विलक्षण होतं पण त्यांनी पातळ कान ठेवून कोणा लोकांवर विश्वास ठेवला. स्वतःची बुद्धी आणि मनाच नाही ऐकलं. त्यांनी एकदा तरी असं केलं असतं तर आज पुस्तकाचा शेवट वेगळाच असता... तुमच्या प्रेम करण्याच्या निष्ठेला उपमा नाही, असं प्रेम फक्त तुमच्या पिढीत च पाहायला मिळतं. आणि गश्मिर सारखा मुलगा मिळणं हे तुमचंच नाही तर रविंद्र सरांच मोठं भाग्य आहे. हॅट्स ऑफ गश्मिर... आईची सहनशीलता आणि जिद्द तुझ्यात जशीच्या तशी उतरली आहे... तुझ्याबद्दल चां आदर द्विगुणित झाला...
आरपार या टीम चे मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹 ही फक्त मुलाखत नसून, जीवन जगण्यासाठीची प्रेरणा आहे. सर, आणि माधवी मॅडम आपण आपल्या शब्दांतून आमच्यासमोर एक चित्रपट साकार केला. आशा काळे, पुणे.
Yapekshahi Striya khup khup straggle kartat pan ek aadarsh stri navrayane je naw milwale chitrapat shrustit te badnam nahi karat. . Asha bayyakadun kye chngle shikyeche Aashhray wat te.
खरंच. सहज, सुंदर मुलाखत. सातवनी त्यात मोकळेपणा आणला. अचूक आणि छान प्रश्न विचारले. माधवीताईनी परिस्थिती समर्थपणे हाताळली,पतिवरचं त्यांचं नितांत प्रेम मुलाखतभर जाणवत राहिलं. त्यांना खूप शुभेच्छा. कौतुकहि.
तुम्ही लोक म्हणतात सहन केले परंतु माधवींनी अगोदर रच सांगितले आहे रवींद्र सरांनी प्रामाणिक पणाने सांगितले होते माधवीना का मी असा आहे तरीही माधवीनी सरांना स्वीकारले का तर त्यांना सहन करायचे होते म्हणून च ना मग आता कि बाउ करायचा त्याच गोष्टी बद्दल. सर्वांच्या जीवनात चढ उतार असतात संसार म्हणले कि.
@@Vpp335मेंदू नाहीच का?की गहाण ठेवला? त्या कुठे बाई करत होत्या खरं तेच् सांगितलं न? तुम्हाला कशाला मिर्ची लागली?प्रेम एकीकडे व्यवहार एकीकडे..नुसत्जया भावनेवर घर चालत का? जुगारी नवरा मिळाला /बनला की मगच कळणारे का?
@@snehamadhu5630 तु मेंदू गहाण ठेवला आहे कुणाकडे ते बघ तुला का मिरची लागली. कदाचित च एखादा माणूस प्रामाणिक पणे सांगतो कि मी असा आहे रवींद्र महाजनी सर हे लग्नाच्या अगोदर च सांगितले होते व काम नव्हते हेही माधवीजी ना माहित होते मग का लग्न केले माधवीजी नी त्रास नसता झाला आता का त्रास बद्दल बोलतात हे बरोबर नाही . वरची पण व आताची पण नीट कमेंट्स वाचा माझी मग commen sence असेल तर बोला.
हे आरपार मध्ये बोलला आहात माधवी ताई पण ते अपार प्रेम कसं असतं ते कळलं! प्रेमाची व्याख्या श्रीकृष्णाची ती पण सहज व्यक्त केलीत! खूप छान ,प्रेमळ आठवणी ,फार साधे पणाने व्यक्त केल्या! रवींद्र महाजनी किती नशीबवान होते हे आजच्या मुलाखतीतून समजले ! त्यांनाही अभिवादन !
माघवी, मी कोथरुडला रहाते. दुरूनच तुम्हाला आम्ही पहायचो पण तुमची कथा ऐकुन वाटते भेटायला पाहीजे होते. महाजनीच्या आम्ही फॅन होतो. लहान होते आमच्यापेक्षा पण अभिनय छान त्यामुळे आवडायचे तुम्हा दोघांना अंगणात बसलेले पण बऱ्याचवेळा पाहायचो. छान वाटायचे. पण त्यामागे एव्हडी व्यथा - कथा असेल वाटले नाही. God bless you and your son.
गेलेल्या माणसा बद्दल चांगलं बोलताच येत नसेल तर वाईट तरी बोलू नये, काहीच नाही तरी, एवढा मातृभक्त, सुंदर, कर्तृत्व वान मुलगा रविंद्र जी देऊन गेलेत, कुठल्याच घरंदाज महिलांना वैधव्य आल्यावर त्या अशी नवर्यावर जाहीर निंदा करत सुटत नाहीत. पती पत्नी च्या नात्यात झाकली मूठ सव्वा लाखाची. हे सेलिब्रेटी म्हणून यांच्या प्रत्येक गोष्टी चे कौतुक, आज किती माऊली होत नाही तरी नवर्याची मनापासून सेवा करतात, त्त्याना साधी सहानुभूती पण मिळत नाही.
एवढं प्रेम दाखवतात तर त्यांना काही झालं तरी एकटं का टाकलं, कुठलीही स्री असं वागत नाही, अरे रोज नाही तरी आठ दिवसांत तरी एखादा फोन नको करायला नवर्या ला, तरुण पणी त्यांचा फायदा घेतला व मरायला एकटं सोडलं.
.... आयुष्य भर अशा व्यक्ती बरोबर राहून... सहन करून... त्या विषयी बोलायच ही नाही?... रवींद्र महाजनी नी त्या सर्वांचे फोन ब्लॉक केले होते... रवींद्र जसे वागले तसच पत्नी ने वागलं असत तर...? स्त्री न च सहन कराव का? ती अजून ही त्याच्यावर प्रेम करते हे विशेष
@@umabhase97 101%खरे आहे तुमचे. मी तुमच्या मताला सहमत आहे. काही लोकांना असे बोलले ले सहन होत नाही. माणूस गेला कि निंदा करतात. आपण रवींद्र सरांचे चाहते त्यांची फॅमिली आहे अजून म्हणून तर बोलतो.
@@umabhase97 Tarun Pani yani kasa fayda ghetla?....ulat yanchya Mule ch tyancha career jhala ya hotya mhnun te ith parynt pohchle hote nhitr koni hi tyana olkhat hi nasta..mansachya disnya peksha gun faar mahtvache astat....avdha sagla bayko ne karun suddha tichya brobr pramanik nhi rahu shkle
आजकालची टवाळ पोर आणि पोरी खरच टवाळ टुकार वासनांध वृत्तीने प्रेमाकडे पाहतात ते यांच्या सारखं प्रेम असावे सर्व काही सहन आणि गहन अर्थ होता त्यात.... प्रेमाला उपमा नाही या जगण्यावर शतदा प्रेम करावे ❤❤❤
तुम्ही खरच त्यांच्यावर मनापासून प्रेम केले म्हणून सर्व छान संसार केलात ..अणि ईतक्या सहनशीलतेने..ani तुमच्या आई ला प्रणाम त्यांनी ईतके सुंदर तुमच्या वर संस्कार केले..तुमची ही नाण्याची दुसरी बाजू एकूण खरेच तुमचा खरे पणा अणि संघर्ष कळला..प्रणाम तुमच्या कार्याला आणि साधेपणाला आणि खरेपणाला❤❤❤😊
मी लहानपणापासून रविंद्र महाजनींची खूप मोठी चाहती होते आणि कायमच राहील. पण आज माधवी मॅमची मुलाखत ऐकून मला असं वाटतंय कि मी माधवीजींचीही तेवढीच चाहती झाले. कारण खऱ्या जीवनात त्याच या हिरोच्या हिरोईन होण्यायोग्य होत्या. सलाम मॅम तुम्हांला आणि तुमच्या दोन्हीही आदर्श मुलांना 🙏💐🙏
Diste tase naste mhanun jag faste. Me pan stri ahe he mala pan kalte. Sansar ha fakt dogacha nawara baykocha asto. Asha thodafar jhalea tras hot asto. Nawara dekha kalakar aslaywar bayko pan sanshey ghet aselch bolat asnar ajun kahi vagere _____mag ajun kahi vishay astat mag tumhi lok ka ek baju khari ahe mhanta. Ravindra sir ase tar khare khote samjale asete. Ani koni kahi bolo ravo sarnchi baju nahi mahit mag he samjane awaghad ahe.
नवरा असताना बोलता आले नाही, आता तरी बोलू दे. माणूस मेल्यानंतर अचानक चांगला कसा होतो? जे जस आहे ते तसे सांगितले तर त्यात नवऱ्याची बदनामी होत नाही. त्यांनी भोगलेले दुःख त्यांना व्यक्त करू द्या.
सगळ्यांच्या जिवनात चांगल्या वाईट घटना घडतात कोण पुर्ण पणे सुखी आहे म्हणुन जगाला सांगुन काय फायदा त्या यासाठी व्यक्त होतायत रविंद्र जी चा मृत्यू अशाप्रकारे झाल्यामुळे तोंड दाखवायला जागा नाही म्हणुन ते कसे वाईट होते हे सिद्ध करून दाखवायच चालले आहे तुम्ही सांगा माणुस किती वाईट वागला म्हणुन त्याच्याशी संबंध तोडायचे तो तिन दिवस मरुन पडला तरी साध फोन करून दखल घेतली नाही या मायलेकांनी गेले ते आता एवढच होत तर जिवंत असताना तोंड बंद का ठेवले मग त्यांनी पण यांचे वाभाडे काढले असते
@@pratibhakadam3336ते स्वतः isolated राहत होते. नातवाचे फोटो मुलगा पाठवायचा तर ते बंध नकोच म्हणून मुलाचा नंबर ब्लॉक केला त्यांनी,असे त्यांच्या मुलाने इंटरव्ह्यू मध्ये सांगितले.आणि पुस्तक ते जीवंत होते तेव्हा पासूनच लिखाण चालू होते,पण त्यांच्या मृत्यू नंतर काही पार्ट वाढवला
Such a well conducted interview. Both interviewer and Interviewed so respectful. Such a calming effect on us viewers Such decent families linked with the great Lokmanya Tilak, indeed are worthy families of Maharashtra 🙏
निःशब्द 👆माधवीताई सारखी सहचारिणी मिळणे हे रविंद्र सरांचे भाग्य 👏 लाखचुका पदरात घेऊन, आणि प्रेमभावनेतून सर्व त्रास सहन करावा, हयच्या पेक्षा कुठे सापडेल निक्खल प्रेमाचे प्रतीक.🫡 माधवीताईना मनापासून सलाम👏 त्यांच्या मुलांचे पण खूप कौतुक आहे कारण सुपरस्टार पिता असून सुद्धा अगदी १२ वर्षी आर्थिक जबाबदारी घेतली आणि आई सोबत खंबीरपणे पार पडली.👏 इतकं प्रगल्भ विचार . हॅट्स ऑफ मॅडम. May God give you all peace , good health and happiness in rest of your life💐💐