#BolBhidu #VidhanParishadResult #JayantPatil #UddhavThackeray
राज्यातल्या हाय व्होल्टेज अशा विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल अखेर हाती आले आहेत. ११ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये झालेल्या या लढतीत महायुतीचे सगळे ९ उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गटाचे पुरस्कृत आमदार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळं आपले तिन्ही उमेदवार निवडून येण्याचा विश्वास असलेल्या महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दुस-या पसंतीच्या मतदानात भाजपचे सदाभाऊ खोत, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात चुरस होती. यामध्ये जयंत पाटील यांचा पराभव झाला.
काँग्रेसची मतं फुटल्यामुळं जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात असलं तरी जयंत पाटील यांच्या पराभवाचे खरे व्हिलन उद्धव ठाकरे असल्याची चर्चा होत आहे. यामागची नेमकी कारणं काय, जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे जबाबदार कसे ठरले, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
21 авг 2024